ETV Bharat / state

...तर पोलिसी खाक्या दाखवा - गृहमंत्री

राज्यात विविध ठिकाणी नागरिका पोलिसांना जुमानत नाहीत. अशा नागरिकांना प्रथम प्रेमाने समजवा नाही ऐकले तर पोलिसी खाक्या दाखवा, असा आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना दिले आहेत.

author img

By

Published : Apr 29, 2020, 5:43 PM IST

गृहमंत्री अनिल देशमुख
गृहमंत्री अनिल देशमुख

नाशिक - राज्यात १५६ ठिकाणी पोलिसांवर हल्ले झाले असून या प्रकरणी ५५० हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. मालेगावमध्ये पोलिसांवर हल्ले होत आहेत. त्यांना प्रेमाच्या भाषेने समजून सांगा. तरीदेखील समजले नाही तर पोलिसी खाक्या दाखवा, असे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना दिले.

बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख
मालेगाव करोनाचे हाॅटस्पाॅट ठरत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमक देणार आहे. कोणत्याही परिस्थितीत पोलिसांवर हल्ले खपवून घेणार नाही. हल्ले करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे देशमुख यांनी सांगितले.

परप्रांतिय कामगारांना त्यांच्या राज्यात पाठविण्याची व्यवस्था केली जात आहे. याबाबत संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचेही गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यासह मालेगावातील परिस्तितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे हे आज नाशिक दौऱ्यावर आले आहे. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दादा भुसे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्तीत होते.

हेही वाचा - नाशिक पोलिसांनी गाणे वाजवून वधू-वरास दिल्या लग्नाच्या शुभेच्छा

नाशिक - राज्यात १५६ ठिकाणी पोलिसांवर हल्ले झाले असून या प्रकरणी ५५० हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. मालेगावमध्ये पोलिसांवर हल्ले होत आहेत. त्यांना प्रेमाच्या भाषेने समजून सांगा. तरीदेखील समजले नाही तर पोलिसी खाक्या दाखवा, असे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना दिले.

बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख
मालेगाव करोनाचे हाॅटस्पाॅट ठरत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमक देणार आहे. कोणत्याही परिस्थितीत पोलिसांवर हल्ले खपवून घेणार नाही. हल्ले करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे देशमुख यांनी सांगितले.

परप्रांतिय कामगारांना त्यांच्या राज्यात पाठविण्याची व्यवस्था केली जात आहे. याबाबत संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचेही गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यासह मालेगावातील परिस्तितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे हे आज नाशिक दौऱ्यावर आले आहे. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दादा भुसे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्तीत होते.

हेही वाचा - नाशिक पोलिसांनी गाणे वाजवून वधू-वरास दिल्या लग्नाच्या शुभेच्छा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.