ETV Bharat / state

Hanuman Birth Place Controversy : किष्किंधा पीठाचे महंत गोविंदानंद यांना पोलीसांकडून नोटीस

author img

By

Published : May 30, 2022, 7:43 PM IST

हनुमानाचा जन्म किष्किंधा मध्येच झाला, असा दावा किष्किंदचे महंत गोविंदानंद ( Mahant Govindanand ) यांनी केला आहे. हनुमान जन्मस्थळावर कोणाशीही, कोणत्याही चर्चेसाठी तयार असल्याचा दावा गोविंदानंद यांनी ( Hanuman Birth Place Controversy ) केला. या चर्चेसाठी गोविंदानंद त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले असून त्यांनी नाशिकच्या महंत, पुरोहित, पुजारी, अभ्यासक यांना अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा पुरावा द्यावा, असे आव्हान त्यांनी केले आहे.

Hanuman Birth Place Controversy
किष्किंधा पीठाचे महंत गोविंदानंद

नाशिक - किष्किंधा पीठाचे महंत गोविंदानंद यांना पोलिसांकडून प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे. हनुमानाचा जन्म किष्किंधा मध्येच झाला, असा दावा किष्किंदचे महंत गोविंदानंद ( Mahant Govindanand ) यांनी केला आहे. हनुमान जन्मस्थळावर कोणाशीही, कोणत्याही चर्चेसाठी तयार असल्याचा दावा गोविंदानंद यांनी ( Hanuman Birth Place Controversy ) केला. या चर्चेसाठी गोविंदानंद त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले असून त्यांनी नाशिकच्या महंत, पुरोहित, पुजारी, अभ्यासक यांना अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा पुरावा द्यावा, असे आव्हान त्यांनी केले आहे.

Hanuman Birth Place Controversy
पोलिसांनी दिलेली नोटीस

अंजनेरीचे ग्रामस्थ आक्रमक - हनुमंतांचे जन्मस्थान अंजनेरी की किष्किंधा हा वाद पेटला असून गोविंदानंद महाराजांविरोधात अंजनेरीतील गावकरी आक्रमक झाले आहे. गोविंदानंद महाराज यांनी अंजनेरी किल्ल्यावर येण्याचे आव्हान ग्रामस्थांनी दिले आहे. गोविंदानंद महाराज यांनी कर्नाटकातिल किष्किंधा पर्वत हनुमंताचे स्थान असल्याचा दावा केला असून त्यासाठी पुराव्यानिशी चर्चेची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे अंजनेरी गाम्रस्थ आक्रमक झाले आहे. अंजनेरीतील अंजनी माता मंदिरात गावकरी आणि साधूसंतांची बैठक झाली. अंजनेरी हेच जन्मस्थळ असून वेळ पडल्यास न्यायालयीन लढाई देखील लढवण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.




काय आहे प्रकरण - नाशिकमधील अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान असल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला आहे. महंत गोविंदानंद त्र्यंबकेश्वर येथे हनुमानाच्या जन्मस्थानावरील वैज्ञानिक पुरावे आणि दाव्यांवर चर्चा करण्यासाठी आले आहेत. त्यांनी धर्मग्रंथ, वेद आणि पुराणांच्या संदर्भात दाखले देऊन जन्मभूमीच्या दाव्यावर पुढे येऊन चर्चा करण्याचे आवाहन त्यांनी केले. महंत गोविंदानंद स्वामी यांनी एकप्रकारे नाशिकच्या संत महंतांना अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान असल्याचे सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे. किष्किंधा मठाधिपतीने हनुमानाचे जन्मस्थान अंजनेरी नसून किष्किंधा असल्याचा दावा केला आहे.

Hanuman Birth Place Controversy
पोलिसांनी दिलेली नोटीस

'या' ठिकाणी जन्म झाल्याचा दावा - नाशिकमधील महंत आणि साधू यांचे मात्र त्यांच्या जन्मस्थानापेक्षा वेगळे मत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी शृंगेरी, द्वारका येथील शंकराचार्य आणि रामजन्मभूमी ट्रस्टच्या उपासकांचीही भेट घेतली आणि 20-20 दिवस या विषयावर चर्चा केली. त्यांची संमती मिळाली, गुजरातमधील डांग जिल्ह्यातील डोंगर, नाशिकमधील अंजनेरी, कर्नाटकातील किष्किंधा किंवा हरियाणातील काही ठिकाणी हनुमानाचा जन्म झाल्याचा दावा केला जात होता. आंध्र प्रदेशातील तिरुपती देवस्थानच्या माध्यमातून विकसित होत असलेल्या हनुमान जन्मभूमीचे प्रकरण थेट न्यायालयात गेले असताना, न्यायालयाच्या आदेशानुसार तिरुपती देवस्थानने एक पाऊल मागे घेतले आहे.

हेही वाचा - Hanuman Birth Place Controversy : अंजनेरी ग्रामस्थांकडून रास्ता रोको; गोविंदानंद महाराजांचा रथ रोखला

हेही वाचा - Hanuman Birthplace Controversy : 'हनुमान जन्मस्थानाचा वाद निरर्थक, देशात शेतकरी, महागाई असे अनेक प्रश्न आहेत'

नाशिक - किष्किंधा पीठाचे महंत गोविंदानंद यांना पोलिसांकडून प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे. हनुमानाचा जन्म किष्किंधा मध्येच झाला, असा दावा किष्किंदचे महंत गोविंदानंद ( Mahant Govindanand ) यांनी केला आहे. हनुमान जन्मस्थळावर कोणाशीही, कोणत्याही चर्चेसाठी तयार असल्याचा दावा गोविंदानंद यांनी ( Hanuman Birth Place Controversy ) केला. या चर्चेसाठी गोविंदानंद त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले असून त्यांनी नाशिकच्या महंत, पुरोहित, पुजारी, अभ्यासक यांना अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा पुरावा द्यावा, असे आव्हान त्यांनी केले आहे.

Hanuman Birth Place Controversy
पोलिसांनी दिलेली नोटीस

अंजनेरीचे ग्रामस्थ आक्रमक - हनुमंतांचे जन्मस्थान अंजनेरी की किष्किंधा हा वाद पेटला असून गोविंदानंद महाराजांविरोधात अंजनेरीतील गावकरी आक्रमक झाले आहे. गोविंदानंद महाराज यांनी अंजनेरी किल्ल्यावर येण्याचे आव्हान ग्रामस्थांनी दिले आहे. गोविंदानंद महाराज यांनी कर्नाटकातिल किष्किंधा पर्वत हनुमंताचे स्थान असल्याचा दावा केला असून त्यासाठी पुराव्यानिशी चर्चेची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे अंजनेरी गाम्रस्थ आक्रमक झाले आहे. अंजनेरीतील अंजनी माता मंदिरात गावकरी आणि साधूसंतांची बैठक झाली. अंजनेरी हेच जन्मस्थळ असून वेळ पडल्यास न्यायालयीन लढाई देखील लढवण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.




काय आहे प्रकरण - नाशिकमधील अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान असल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला आहे. महंत गोविंदानंद त्र्यंबकेश्वर येथे हनुमानाच्या जन्मस्थानावरील वैज्ञानिक पुरावे आणि दाव्यांवर चर्चा करण्यासाठी आले आहेत. त्यांनी धर्मग्रंथ, वेद आणि पुराणांच्या संदर्भात दाखले देऊन जन्मभूमीच्या दाव्यावर पुढे येऊन चर्चा करण्याचे आवाहन त्यांनी केले. महंत गोविंदानंद स्वामी यांनी एकप्रकारे नाशिकच्या संत महंतांना अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान असल्याचे सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे. किष्किंधा मठाधिपतीने हनुमानाचे जन्मस्थान अंजनेरी नसून किष्किंधा असल्याचा दावा केला आहे.

Hanuman Birth Place Controversy
पोलिसांनी दिलेली नोटीस

'या' ठिकाणी जन्म झाल्याचा दावा - नाशिकमधील महंत आणि साधू यांचे मात्र त्यांच्या जन्मस्थानापेक्षा वेगळे मत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी शृंगेरी, द्वारका येथील शंकराचार्य आणि रामजन्मभूमी ट्रस्टच्या उपासकांचीही भेट घेतली आणि 20-20 दिवस या विषयावर चर्चा केली. त्यांची संमती मिळाली, गुजरातमधील डांग जिल्ह्यातील डोंगर, नाशिकमधील अंजनेरी, कर्नाटकातील किष्किंधा किंवा हरियाणातील काही ठिकाणी हनुमानाचा जन्म झाल्याचा दावा केला जात होता. आंध्र प्रदेशातील तिरुपती देवस्थानच्या माध्यमातून विकसित होत असलेल्या हनुमान जन्मभूमीचे प्रकरण थेट न्यायालयात गेले असताना, न्यायालयाच्या आदेशानुसार तिरुपती देवस्थानने एक पाऊल मागे घेतले आहे.

हेही वाचा - Hanuman Birth Place Controversy : अंजनेरी ग्रामस्थांकडून रास्ता रोको; गोविंदानंद महाराजांचा रथ रोखला

हेही वाचा - Hanuman Birthplace Controversy : 'हनुमान जन्मस्थानाचा वाद निरर्थक, देशात शेतकरी, महागाई असे अनेक प्रश्न आहेत'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.