ETV Bharat / state

कोरोनामुळे पालक गमावलेल्या २४ बालकांना आर्थिक मदत, योजनांचाही मिळणार लाभ- जिल्हाधिकारी मांढरे

author img

By

Published : Jul 30, 2021, 6:39 AM IST

कोरोना काळात एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे सर्वेक्षण करतांना ज्या बालकांचा सांभाळ त्यांचे नातेवाईक करत असतील त्यांच्या एकूण आर्थिक परिस्थितीचा देखील विचार करण्यात यावा. याअंतर्गत अनाथ झालेल्या बालकांचा सांभाळ करणाऱ्या ज्या नातेवाईकांची आर्थिक परिस्थिती बेताची असेल, अशा बालकांना स्वयंसेवी संस्थांच्या बालकाश्रमात ठेवण्यासाठी नातेवाईकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे.,

जिल्हाधिकारी मांढरे
जिल्हाधिकारी मांढरे

नाशिक - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे ज्या बालकांच्य‍ा दोन्ही पालकांचा मृत्यू झाला अशा १८ वर्षापर्यंतच्या २४ बालकांना प्रत्येकी पाच लाख रुपये सहाय्य मुदत ठेवीच्या स्वरूपात मंजुर करण्यात आले आहेत. संबंधित बालकांचे पालनपोषण व्यवस्थितरित्या होण्यासाठी ही आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बालकांची काळजी व संरक्षण कृतीदलाच्या आढावा बैठकीत ही मदत मंजूर करण्यात आली आहे.

बालसंगोपन निधीच्या माध्यमातून तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी. कोरोना काळात एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे सर्वेक्षण करतांना ज्या बालकांचा सांभाळ त्यांचे नातेवाईक करत असतील त्यांच्या एकूण आर्थिक परिस्थितीचा देखील विचार करण्यात यावा. याअंतर्गत अनाथ झालेल्या बालकांचा सांभाळ करणाऱ्या ज्या नातेवाईकांची आर्थिक परिस्थिती बेताची असेल, अशा बालकांना स्वयंसेवी संस्थांच्या बालकाश्रमात ठेवण्यासाठी नातेवाईकांचे समुपदेशन करण्यात यावे. जेणेकरून संबंधित बालकांचा सर्वांगिण विकास होऊन त्यांचे पालन व्यवस्थितरित्या होण्यासाठी मदत होईल. तसेच जे नातेवाईक अथवा कुटूंबातील सदस्य बालकांचे संगोपन करण्यासाठी इच्छुक नाहीत, अशा बालकांना देखील बालगृहात दाखल करण्यासाठी योग्यती कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिल्या आहेत.

अनाथ बालकांचे पुनर्वसन आणि सर्वांगिण विकासासाठी संबंधित बालक आणि जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी यांच्या नावे सामायिक बँक खात्यावर एक रकमी पाच लाख रुपये मुदत ठेवीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा माहिला आणि बाल विकास यंत्रणेने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक सर्व कार्यवाही करावी. याकरीता आरोग्य यंत्रणेचे सहकार्य घेण्यात यावे. त्याचप्रमाणे महिला व बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या बालसंगोपन योजनांचा लाभ या बालकांना होण्यासाठी नियोजन करण्यात यावे, अशा सूचना देखील जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत. प्रशासनाकडून अशा सर्व बालकांचा शोध जरी घेतला जाणार असला तरी नागरिकांना देखील याबाबत काही माहिती असल्यास त्यांनी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले.

कोरोना संसर्गामुळे पालक गमावलेली एकूण ८६१ बालके..

जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे पालक गमावलेली एकूण ८६१ बालके असून त्यापैकी शून्य ते १८ वयोगटातील २४ बालकांनी आपली दोन्ही पालक गमावली आहे. याच वयोगटातील ७७८ बालकांनी एक पालक गमावले आहे. त्याचप्रमाणे १९ ते २३वर्षे वयोगटातील ९ बालकांनी दोन्ही पालक तर याच वयोगटातील ५० बालकांनी आपले एक पालक गमावले आहेत. यातील ३९६ बालकांना बाल संगोपन योजनांचा लाभ मंजुर करण्यात आला आहे. तसेच या पाल्यांसंदर्भात वारस नोंदणी व शिधापत्रिकांच्या लाभासाठी कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुरेखा पाटील यांनी बैठकीत दिली आहे.

नाशिक - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे ज्या बालकांच्य‍ा दोन्ही पालकांचा मृत्यू झाला अशा १८ वर्षापर्यंतच्या २४ बालकांना प्रत्येकी पाच लाख रुपये सहाय्य मुदत ठेवीच्या स्वरूपात मंजुर करण्यात आले आहेत. संबंधित बालकांचे पालनपोषण व्यवस्थितरित्या होण्यासाठी ही आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बालकांची काळजी व संरक्षण कृतीदलाच्या आढावा बैठकीत ही मदत मंजूर करण्यात आली आहे.

बालसंगोपन निधीच्या माध्यमातून तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी. कोरोना काळात एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे सर्वेक्षण करतांना ज्या बालकांचा सांभाळ त्यांचे नातेवाईक करत असतील त्यांच्या एकूण आर्थिक परिस्थितीचा देखील विचार करण्यात यावा. याअंतर्गत अनाथ झालेल्या बालकांचा सांभाळ करणाऱ्या ज्या नातेवाईकांची आर्थिक परिस्थिती बेताची असेल, अशा बालकांना स्वयंसेवी संस्थांच्या बालकाश्रमात ठेवण्यासाठी नातेवाईकांचे समुपदेशन करण्यात यावे. जेणेकरून संबंधित बालकांचा सर्वांगिण विकास होऊन त्यांचे पालन व्यवस्थितरित्या होण्यासाठी मदत होईल. तसेच जे नातेवाईक अथवा कुटूंबातील सदस्य बालकांचे संगोपन करण्यासाठी इच्छुक नाहीत, अशा बालकांना देखील बालगृहात दाखल करण्यासाठी योग्यती कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिल्या आहेत.

अनाथ बालकांचे पुनर्वसन आणि सर्वांगिण विकासासाठी संबंधित बालक आणि जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी यांच्या नावे सामायिक बँक खात्यावर एक रकमी पाच लाख रुपये मुदत ठेवीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा माहिला आणि बाल विकास यंत्रणेने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक सर्व कार्यवाही करावी. याकरीता आरोग्य यंत्रणेचे सहकार्य घेण्यात यावे. त्याचप्रमाणे महिला व बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या बालसंगोपन योजनांचा लाभ या बालकांना होण्यासाठी नियोजन करण्यात यावे, अशा सूचना देखील जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत. प्रशासनाकडून अशा सर्व बालकांचा शोध जरी घेतला जाणार असला तरी नागरिकांना देखील याबाबत काही माहिती असल्यास त्यांनी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले.

कोरोना संसर्गामुळे पालक गमावलेली एकूण ८६१ बालके..

जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे पालक गमावलेली एकूण ८६१ बालके असून त्यापैकी शून्य ते १८ वयोगटातील २४ बालकांनी आपली दोन्ही पालक गमावली आहे. याच वयोगटातील ७७८ बालकांनी एक पालक गमावले आहे. त्याचप्रमाणे १९ ते २३वर्षे वयोगटातील ९ बालकांनी दोन्ही पालक तर याच वयोगटातील ५० बालकांनी आपले एक पालक गमावले आहेत. यातील ३९६ बालकांना बाल संगोपन योजनांचा लाभ मंजुर करण्यात आला आहे. तसेच या पाल्यांसंदर्भात वारस नोंदणी व शिधापत्रिकांच्या लाभासाठी कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुरेखा पाटील यांनी बैठकीत दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.