ETV Bharat / state

कोरोना काळात जोडपे लग्न बंधनात, हनीमून ट्रिप मात्र रखडल्या

author img

By

Published : Jul 31, 2021, 7:33 PM IST

Updated : Jul 31, 2021, 7:45 PM IST

नाशिक शहरात मागील सहा महिन्यांत शेकडो जोडपे लग्न बंधनात अडकले. लग्नानंतर अनेक जण हनीमून ट्रीपचे नियोजन करतात. मात्र, कोरोनामुळे अनेक महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात निर्बंध लागू करण्यात आली. त्यामुळे असंख्य वधू-वरांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

नाशिक - जिल्ह्यात कोरोना दुसऱ्या लाटेने हाहाकार केला होता. त्यामुळे शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. अशात लग्न समारंभासाठी मोजक्याचे लोकांना उपस्थित राहण्याची मुभा होती. नागरीकांनीही शासनाच्या नियमांचे पालन करत परिवारातील लोकांमध्ये लग्नकार्य पार पाडले. मात्र, सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने नवीन जोडप्यांना हनीमून ट्रिप रद्द कराव्या लागल्याने जोडप्यांने नाराजी दिसून आली.

बोलताना व्यवसायिक

स्वप्न राहून गेले

2020 मधील मेमध्ये माझे लग्न ठरले होते. मात्र, त्यावेळी कोरोनाची पहिली लाट आल्याने घरच्यांनी एकत्रित येत सर्वानुमते लग्न 2021मध्ये करण्याचा निर्णय घेतला. यासाठी 22 एप्रिल ही तारीख धरली होती. कोरोनाची दुसरी लाट हे कधी वाटले नव्हते. मात्र, त्याच महिन्यात नाशिक जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार केला. अशात आता पुन्हा लग्न पुढे ढकलणे शक्य नव्हते म्हणून आम्ही घरातील वीस जणांच्या उपस्थित लग्न समारंभ पार पडला. लग्न झाल्यानंतर प्रत्येक जण हनीमून ट्रिपसाठी नियोजन करत असतो, आम्हीही केले होते. मात्र, त्याच महिन्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याने शासनाने कडक निर्बंध लागू केले. त्यामुळे घराबाहेर पडणे अशक्य होते म्हणून लग्नानंतरच्या हनीमून ट्रिपचे स्वप्न राहून गेल्याची खंत एक तरुणाने बोलून दाखवली.

सहा महिन्यात 463 विवाह नोंदी

कोरोना कालावधीत निर्बंध असल्याने नोंदणी विभागाला प्राधान्य देण्यात आल्याचे दिसून आले. मार्च ते जुलै, 2021 या कालावधीत नोंदणीसाठी 436 अर्ज आले होते. त्यापैकी 305 विवाहांची नोंदणी होऊ शकली. ज्यांचे वैदिक पद्धतीने विवाह झाले आहेत, असे जोडपेही नोंदणी करतात त्यांचे 51 नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले असल्याचे विवाह नोंदणी विभागाने सांगितले आहे.

अनेक हनीमून ट्रिप रद्द

कोरोनामुळे 2020 पासून पर्यटन व्यवसाय संकटात सापडला आहे, तो अद्याप सावरला नाही. दरवर्षी आम्ही आमच्या ट्रॅव्हल्स एजन्सीमार्फत अनेक सहलींचे नियोजन करत असतो. लग्न तिथी असलेल्या काळात आमच्या हनीमून ट्रिपला चांगला प्रतिसाद मिळतो. गोवा, कुल्लू, मनाली, जम्मू, काश्मीर या ठिकाणी जाण्यासाठी लग्न झालेली नवीन जोडपी उत्सूक असतात. मात्र, कोरोना काळात या ट्रिप आम्हाला रद्द करण्याची वेळ आली. अनेकांची अॅडव्हान्स रक्कम आम्हाला परत करावा लागला, असे ट्रॅव्हल व्यवसायीक दिलीपसिंह बेनिवाल यांनी सांगितले.

हेही वाचा - Corona Vaccination: नाशकात लसीकरणाचा विक्रम; एका दिवसात तब्बल ४४ हजार जणांचे लसीकरण

नाशिक - जिल्ह्यात कोरोना दुसऱ्या लाटेने हाहाकार केला होता. त्यामुळे शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. अशात लग्न समारंभासाठी मोजक्याचे लोकांना उपस्थित राहण्याची मुभा होती. नागरीकांनीही शासनाच्या नियमांचे पालन करत परिवारातील लोकांमध्ये लग्नकार्य पार पाडले. मात्र, सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने नवीन जोडप्यांना हनीमून ट्रिप रद्द कराव्या लागल्याने जोडप्यांने नाराजी दिसून आली.

बोलताना व्यवसायिक

स्वप्न राहून गेले

2020 मधील मेमध्ये माझे लग्न ठरले होते. मात्र, त्यावेळी कोरोनाची पहिली लाट आल्याने घरच्यांनी एकत्रित येत सर्वानुमते लग्न 2021मध्ये करण्याचा निर्णय घेतला. यासाठी 22 एप्रिल ही तारीख धरली होती. कोरोनाची दुसरी लाट हे कधी वाटले नव्हते. मात्र, त्याच महिन्यात नाशिक जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार केला. अशात आता पुन्हा लग्न पुढे ढकलणे शक्य नव्हते म्हणून आम्ही घरातील वीस जणांच्या उपस्थित लग्न समारंभ पार पडला. लग्न झाल्यानंतर प्रत्येक जण हनीमून ट्रिपसाठी नियोजन करत असतो, आम्हीही केले होते. मात्र, त्याच महिन्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याने शासनाने कडक निर्बंध लागू केले. त्यामुळे घराबाहेर पडणे अशक्य होते म्हणून लग्नानंतरच्या हनीमून ट्रिपचे स्वप्न राहून गेल्याची खंत एक तरुणाने बोलून दाखवली.

सहा महिन्यात 463 विवाह नोंदी

कोरोना कालावधीत निर्बंध असल्याने नोंदणी विभागाला प्राधान्य देण्यात आल्याचे दिसून आले. मार्च ते जुलै, 2021 या कालावधीत नोंदणीसाठी 436 अर्ज आले होते. त्यापैकी 305 विवाहांची नोंदणी होऊ शकली. ज्यांचे वैदिक पद्धतीने विवाह झाले आहेत, असे जोडपेही नोंदणी करतात त्यांचे 51 नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले असल्याचे विवाह नोंदणी विभागाने सांगितले आहे.

अनेक हनीमून ट्रिप रद्द

कोरोनामुळे 2020 पासून पर्यटन व्यवसाय संकटात सापडला आहे, तो अद्याप सावरला नाही. दरवर्षी आम्ही आमच्या ट्रॅव्हल्स एजन्सीमार्फत अनेक सहलींचे नियोजन करत असतो. लग्न तिथी असलेल्या काळात आमच्या हनीमून ट्रिपला चांगला प्रतिसाद मिळतो. गोवा, कुल्लू, मनाली, जम्मू, काश्मीर या ठिकाणी जाण्यासाठी लग्न झालेली नवीन जोडपी उत्सूक असतात. मात्र, कोरोना काळात या ट्रिप आम्हाला रद्द करण्याची वेळ आली. अनेकांची अॅडव्हान्स रक्कम आम्हाला परत करावा लागला, असे ट्रॅव्हल व्यवसायीक दिलीपसिंह बेनिवाल यांनी सांगितले.

हेही वाचा - Corona Vaccination: नाशकात लसीकरणाचा विक्रम; एका दिवसात तब्बल ४४ हजार जणांचे लसीकरण

Last Updated : Jul 31, 2021, 7:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.