ETV Bharat / state

नांदेडमध्ये पावसाची रिमझिम; नागरिकांना दिलासा

author img

By

Published : Jun 22, 2019, 12:52 PM IST

अनेक दिवसांपासून उकाड्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

नांदेडमध्ये पावसाची रिमझिम

नांदेड - शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून काही भागात जोरदार, तर काही ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

नांदेडमध्ये पावसाची रिमझिम

खरीपाची पेरणी करायची असल्याने बळीराजा पावसाच्या प्रतिक्षेत आहे. काही शेतकऱ्यांनी तर धुळपेरणी देखील केली आहे. मात्र, शुक्रवारी रिमझिम बरसल्या सरींचा फायदा या धुळपेरणीला होणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच हवामान खात्याने १-२ दिवसात मोठ्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरी खरिपाच्या पेरणीसाठी सज्ज झाल्याचे चित्र आहे. शिवाय अनेक दिवसांपासून उकाड्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

नांदेड - शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून काही भागात जोरदार, तर काही ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

नांदेडमध्ये पावसाची रिमझिम

खरीपाची पेरणी करायची असल्याने बळीराजा पावसाच्या प्रतिक्षेत आहे. काही शेतकऱ्यांनी तर धुळपेरणी देखील केली आहे. मात्र, शुक्रवारी रिमझिम बरसल्या सरींचा फायदा या धुळपेरणीला होणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच हवामान खात्याने १-२ दिवसात मोठ्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरी खरिपाच्या पेरणीसाठी सज्ज झाल्याचे चित्र आहे. शिवाय अनेक दिवसांपासून उकाड्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

Intro:नांदेड - जिल्हयात पावसाची हजेरी.

अँकर - नांदेड जिल्ह्यात रात्री पासून काही भागात जोरदार पाऊस तर काही ठिकाणी भुरभुर पाऊस सुरु झाला आहे.पावसामुळे वातावरणात आद्रता निर्माण झाली आहेBody:असून,त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला. नांदेड सह हिमायतनगर,धर्माबाद, मुखेडात पावसाने हजेरी लावली होती.खरीपाची पेरणीच्या तयारीत असलेला बळीराजा मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहे जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी धुळपेरणी केली असून,या पावसामुळे धुळपेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.Conclusion:हवामान मोठ्या विभागाने पावसाची शक्यता वर्तवल्याने जिल्ह्यातील शेतकरी खरीपाच्या पेरणीला सज्ज झाले आहेत.यंदा जिल्ह्यात सोयाबीनच्या क्षेत्रात मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.