ETV Bharat / state

हिंगणघाट जळीतकांड : पीडितेच्या मृत्यूनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी केले शांततेचे आवाहन - hinganghat jalitkand latest news

गृहमंत्री यांनी पीडितेच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. याप्रकरणात वेगाने कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना दिले आहे. म्हणून नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केले आहे.

vivek bhimanvar (collector, wardha)
विवेक भिमानवर (जिल्हाधिकारी, वर्धा)
author img

By

Published : Feb 10, 2020, 10:50 AM IST

नागपूर - वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची आज (सोमवारी) सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन वर्ध्याचे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केले आहे.

विवेक भिमनवार (जिल्हाधिकारी, वर्धा)

राज्यातील लोकांच्या संवेदना कुटुंबासोबत आहेत. हा खटला जलद गती न्यायालयात चालवावण्याची नागरिकांची मागणी रास्त आहे. काही वेळापूर्वीच कुटुंबाशी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संवाद साधला. याप्रकरणात वेगाने आणि कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना दिले आहे, असेही ते म्हणाले. म्हणून नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन जिल्हाधिकारी भिमनवार यांनी केले आहे.

हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : अखेर झुंज संपली, आज सकाळी पीडितेचा मृत्यू

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नांदोरी चौकात सोमवारी (३ फेब्रुवारी)ला प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आले होते. यामध्ये ती ४० टक्के भाजली होती. तसेच तिचा चेहरा, श्वसननलिका पूर्णपणे जळाली होती. तिच्यावर नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, अखेर आज आठव्या दिवशी सोमवारीच तिची मृत्यूशी झुंज संपली.

नागपूर - वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची आज (सोमवारी) सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन वर्ध्याचे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केले आहे.

विवेक भिमनवार (जिल्हाधिकारी, वर्धा)

राज्यातील लोकांच्या संवेदना कुटुंबासोबत आहेत. हा खटला जलद गती न्यायालयात चालवावण्याची नागरिकांची मागणी रास्त आहे. काही वेळापूर्वीच कुटुंबाशी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संवाद साधला. याप्रकरणात वेगाने आणि कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना दिले आहे, असेही ते म्हणाले. म्हणून नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन जिल्हाधिकारी भिमनवार यांनी केले आहे.

हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : अखेर झुंज संपली, आज सकाळी पीडितेचा मृत्यू

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नांदोरी चौकात सोमवारी (३ फेब्रुवारी)ला प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आले होते. यामध्ये ती ४० टक्के भाजली होती. तसेच तिचा चेहरा, श्वसननलिका पूर्णपणे जळाली होती. तिच्यावर नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, अखेर आज आठव्या दिवशी सोमवारीच तिची मृत्यूशी झुंज संपली.

Intro:बाईट


Body:बाईट- विवेक भिमानवर - जिल्हाधिकारी वर्धा


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.