ETV Bharat / state

तिवरे धरण फुटीची विशेष पथकाकडून चौकशी होणार, २ महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

अतिवृष्टीमुळं चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याची घटना घडली होती. या घटनेची चौकशी करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.

author img

By

Published : Jul 7, 2019, 9:06 AM IST

तिवरे धरण

मुंबई - अतिवृष्टीमुळं चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याची घटना घडली होती. या घटनेची चौकशी करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या निर्णयानुसार, २ महिन्यात याप्रकरणी चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश या पथकास देण्यात आले आहेत.

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण २ जुलैला फोटले होते. यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्त हानी झाली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी जलसंपदा विभागाचे सचिव तथा विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली हे पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकामध्ये जलसंधारण विभागातील मुख्य अभियंता (लघुसिंचन), रत्नागिरीचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक हे सदस्य आहेत.

काय आहे विशेष चौकशी पथकाची जाबाबदारी?

तिवरे धरण फुटीच्या कारणांचा शोध घेऊन दोषींवर जबाबदारी निश्चित करणे. त्यानुसार अनुषंगिक चौकशी करणे, लघुसिंचन तलाव, पाझर तलाव, गाव तलाव, मालगुजारी तलाव व इतर तत्सम तलावांबाबतीत भविष्यात, अशा घटना घडू नयेत, यासाठी उपाययोजना सुचविणे ही या चौकशी पथकाची जबाबदारी असणार आहे.

मुंबई - अतिवृष्टीमुळं चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याची घटना घडली होती. या घटनेची चौकशी करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या निर्णयानुसार, २ महिन्यात याप्रकरणी चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश या पथकास देण्यात आले आहेत.

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण २ जुलैला फोटले होते. यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्त हानी झाली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी जलसंपदा विभागाचे सचिव तथा विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली हे पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकामध्ये जलसंधारण विभागातील मुख्य अभियंता (लघुसिंचन), रत्नागिरीचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक हे सदस्य आहेत.

काय आहे विशेष चौकशी पथकाची जाबाबदारी?

तिवरे धरण फुटीच्या कारणांचा शोध घेऊन दोषींवर जबाबदारी निश्चित करणे. त्यानुसार अनुषंगिक चौकशी करणे, लघुसिंचन तलाव, पाझर तलाव, गाव तलाव, मालगुजारी तलाव व इतर तत्सम तलावांबाबतीत भविष्यात, अशा घटना घडू नयेत, यासाठी उपाययोजना सुचविणे ही या चौकशी पथकाची जबाबदारी असणार आहे.

Intro:Body:mh_mum_01_tivare__damenquiry_vis_7204684

तिवरे धरण फुटीची विशेष पथकाकडून चौकशी होणार

दोन महिन्यात या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश

मुंबईः अतिवृष्टीमुळं चिपळूण तालुक्यातील (जि. रत्नागिरी) तिवरे धरण फुटीचे आरोप प्रत्यारोप आणि दोषाोप सुरु असतानाच राज्य सरकारनं जिवित व वित्त हानीची सखोल उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी जलसंधारण विभागाने विशेष चौकशी पथक स्थापन केली आहे. शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या शासन निर्णयानुसार, दोन महिन्यात या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश या पथकास देण्यात आले आहेत. 

दि. २ जुलै रोजी चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटून जिवित व वित्त हानी झाली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी जलसंपदा विभागाचे सचिव तथा विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली हे पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकामध्ये जलसंधारण विभागातील मुख्य अभियंता (लघुसिंचन), रत्नागिरीचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक हे सदस्य आहेत. 

काय आहे विशेष चौकशी पथकाची जाबाबदारी?

तिवरे धरण फुटीच्या कारणांचा शोध घेऊन दोषींवर जबाबदारी निश्चित करणे, त्यानुसार अनुषंगिक चौकशी करणे, लघुसिंचन तलाव, पाझर तलाव, गाव तलाव, मालगुजारी तलाव व इतर तत्सम तलावांबाबतीत भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी उपाय योजना सुचविणे ही या चौकशी पथकाची कार्यकक्षा असणार आहे. यासंबंधीचा शासन निर्णय राज्य शासनाने काढला आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.