ETV Bharat / state

भाजपला वगळून सरकार स्थापन करण्यासाठी मित्रपक्ष सकारात्मक - जयंत पाटील

author img

By

Published : Nov 22, 2019, 4:32 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत आज विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. भाजपला वगळून सरकार स्थापन व्हावे असे मित्र पक्षांनाही वाटत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील

मुंबई - सरकार स्थापन करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेची संपूर्ण माहिती आघाडीतील मित्र पक्षांना देण्यात आली असून भाजपला वगळून सरकार स्थापन व्हावे, असे मित्र पक्षांनाही वाटत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत आज विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, रिपाई कवाडे गट, समाजवादी पक्ष, जनता दल, रिपाई खरात गट, श्रमिक मुक्ती दल आदींसह इतर सर्व घटक पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते.

हेही वाचा - राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार का? वाचा काय म्हणाले जयंत पाटील...

जयंत पाटील म्हणाले, विकासासाठी आम्ही एकत्र येणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेनेसोबत आज किंवा उद्या चर्चा करणार आहे" या चर्चेनंतर, सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

मुंबई - सरकार स्थापन करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेची संपूर्ण माहिती आघाडीतील मित्र पक्षांना देण्यात आली असून भाजपला वगळून सरकार स्थापन व्हावे, असे मित्र पक्षांनाही वाटत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत आज विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, रिपाई कवाडे गट, समाजवादी पक्ष, जनता दल, रिपाई खरात गट, श्रमिक मुक्ती दल आदींसह इतर सर्व घटक पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते.

हेही वाचा - राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार का? वाचा काय म्हणाले जयंत पाटील...

जयंत पाटील म्हणाले, विकासासाठी आम्ही एकत्र येणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेनेसोबत आज किंवा उद्या चर्चा करणार आहे" या चर्चेनंतर, सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Intro:मित्रपक्ष राज्यात भाजप वगळून सरकार स्थापन करण्यास सकारात्मक-जयंत पाटील

mh-mum-01-ncp-jayantpatil-byte-7201153


(Mojoवर बाईट पाठवला आहे तो वापरावा)


मुंबई ता. २२:

सरकार स्थापन करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये जी चर्चा झाली याबाबतची संपूर्ण माहिती आघाडीतील मित्र पक्षांना देण्यात आली असून भाजप वगळून सरकार स्थापन व्हावे असे मित्र पक्षांनाही वाटत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची आघाडीतील मित्रपक्षाच्या नेत्यांसोबत आज विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली.
स्वाभिमानी शेतकरी संघटना,शेकाप, रिपाई कवाडे गट, समाजवादी पार्टी, जनता दल, रिपाई खरात गट, श्रमिक मुक्ती दल, आदींसह इतर सर्व घटक पक्षांचे नेते उपस्थित होते.त्यांच्याशी आज चर्चा केली.विकासासाठी आम्ही एकत्र येत असल्याचे सांगितले असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेस शिवसेनेबरोबर आज किंवा उद्या चर्चा करेल आणि त्यानंतर चर्चा झाल्यावर सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला जाईल असेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.Body:मित्रपक्ष राज्यात भाजप वगळून सरकार स्थापन करण्यास सकारात्मक-जयंत पाटीलConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.