ETV Bharat / state

Parenting Tips : पाल्याला शाळेच्या सहलीसाठी 'या' 5 टिप्स उपयोगी पडतील - 5 tips will help your child on school trip

सहलींमधून ( school trip ) मुले स्व-व्यवस्थापन, आपत्कालीन परिस्थितीत गोष्टींचे व्यवस्थापन, सामाजिक परिस्थितीशी जुळवून घेणे आणि आत्मविश्वास निर्माण करणे यासारख्या गोष्टी शिकतात. पालकांनी पाल्याच्या सहलीबाबत मुलांना कोणत्या गोष्टींची कल्पवना द्यावी हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Parenting Tips
शाळेची सहल
author img

By

Published : Oct 30, 2022, 12:39 PM IST

मुंबई : मुलांची शालेय सहल हा एक महत्त्वाचा टप्पा ( school trip ) आहे. सहलींमधून मुले स्व-व्यवस्थापन, आपत्कालीन परिस्थितीत गोष्टींचे व्यवस्थापन, सामाजिक परिस्थितीशी जुळवून घेणे आणि आत्मविश्वास निर्माण करणे यासारख्या गोष्टी शिकतात. मुलींसाठी हे अधिक महत्त्वाचे आहे कारण आजही मुलींमध्ये मुलांपेक्षा कमी सांसारिक संपर्क आहे. पालकांनी पाल्याच्या सहलीबाबत मुलांना कोणत्या गोष्टींची कल्पवना द्यावी हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सर्व तपशील मिळवा मग पाठवा : मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता पूर्वीपेक्षा जास्त त्रासदायक आहे. त्यांना समजावून सांगण्यापूर्वी सहलीशी संबंधित सर्व माहिती शाळेकडून ( school trip information ) मिळवा. शिक्षक किती आहेत, मुलं किती आहेत, कुठे जाणार आहेत, प्रवास कसा असेल, कुठे थांबतील, इ.स्वच्छतेची पूर्ण काळजी घेण्याचा सल्ला. जरी हे प्रत्येक व्यक्तीला लागू होते, परंतु घराबाहेर जाणाऱ्या मुलांसाठी तो अधिक महत्त्वाचा सल्ला बनतो. विशेषत: आता कोरोनासारख्या महामारीच्या आगमनानंतर. त्याला समजावून सांगा की प्रवासादरम्यान त्याने शक्य तितके स्वच्छ स्नानगृह वापरावे. हात पुसण्यासाठी नेहमी साबण, सॅनिटायझर, टिश्यू आणि वाइप्स ठेवा आणि त्यांचाच वापर करा. पिण्याच्या पाण्याबाबतही काळजी घ्या.

सुरक्षित रहा, सावध रहा : सुरक्षितता आणि स्मार्ट ( Be alert be safe ) सल्ला. मुलींमध्ये सहावी इंद्रिय जरा जास्त सक्रिय असली तरी काही वेळा निरागसपणा आणि अविचारीपणामुळे त्या आपल्या सुरक्षिततेची काळजी घेऊ शकत नाहीत. मुलीला तिच्या खोलीच्या दारांचे कुलूप आणि बाथरूमच्या खिडक्या इत्यादी चांगल्या बंद ठेवण्यास सांगा. अगोदर नीट तपासा. बाथरूमची कोणतीही खिडकी किंवा वेंटिलेशन किंवा दरवाजा नीट बंद नसल्यास, ते त्वरित दुरुस्त करून घेण्यास तुमच्या शिक्षकांना सांगा. कधीही एकटे जाऊ नका किंवा अंधारात उघडे बाथरूम वापरू नका.

चिन्हे ओळखा आणि सतर्क रहा : मुलांना सांगा की कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. हा सल्ला मुलांना आयुष्याच्या प्रत्येक वळणावर उपयोगी पडेल. जेव्हा ती तुमच्यापासून दूर असलेल्या शहरात असतील. तेव्हा हा सल्ला पाल्यांना तिथेही सुरक्षित ठेवण्यास मदत करेल. तिला समजावून सांगा की तिला कोणावरही सहज विश्वास ठेवण्याची गरज नाही.

अनोळखी लोकांसोबत माहिती शेअर करू नका : तुमची माहिती शेअर करणे टाळा असा सल्ला ( Do not share information with strangers ) द्या. प्रवासादरम्यान अनेकवेळा नवीन मित्र बनतात, नवीन लोकांचीही ओळख होते. हे सर्व लोक वाईट किंवा चुकीचे असतीलच असे नाही. परंतु अशा कोणत्याही व्यक्तीसोबत तुमची वैयक्तिक माहिती शेअर केल्याने ते अडचणीत येऊ शकतात. हे त्यांना पटवून द्या. अनोळखी व्यक्तीसोबत फोटो काढणे टाळा. त्यांना तुमचा मुक्काम, प्रवासाचे वेळापत्रक, तुम्ही कोठे राहता, आई-वडील काय करतात इत्यादीची माहिती देऊ नका असे सांगा.

ग्रूप सोडू नका : ग्रूप सोडून अज्ञात ठिकाणी आणि रात्री उशिरा बाहेर जाणे टाळण्याचा सल्ला ( Do not leave group ) द्या . अनेकदा तरूण वयात ऊर्जा आणि उत्साह या दोन्ही गोष्टी आपल्या शिखरावर असतात. त्यामुळेच चुका होतात. शिक्षकांना माहिती न देता, नियम मोडून अज्ञात ठिकाणी एकटेच फिरायला जाणे ही सर्वात धोकादायक आहे. बहुतेक अपघात यामुळेच होतात. ज्याच्या बातम्या आपण रोज वाचतो. त्यामुळे पाल्यांना तुमच्या ग्रुप व्यतिरिक्त किंवा एकट्याने कुठेही जाण्याची हिंमत करू नका असे सांगा.

मुंबई : मुलांची शालेय सहल हा एक महत्त्वाचा टप्पा ( school trip ) आहे. सहलींमधून मुले स्व-व्यवस्थापन, आपत्कालीन परिस्थितीत गोष्टींचे व्यवस्थापन, सामाजिक परिस्थितीशी जुळवून घेणे आणि आत्मविश्वास निर्माण करणे यासारख्या गोष्टी शिकतात. मुलींसाठी हे अधिक महत्त्वाचे आहे कारण आजही मुलींमध्ये मुलांपेक्षा कमी सांसारिक संपर्क आहे. पालकांनी पाल्याच्या सहलीबाबत मुलांना कोणत्या गोष्टींची कल्पवना द्यावी हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सर्व तपशील मिळवा मग पाठवा : मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता पूर्वीपेक्षा जास्त त्रासदायक आहे. त्यांना समजावून सांगण्यापूर्वी सहलीशी संबंधित सर्व माहिती शाळेकडून ( school trip information ) मिळवा. शिक्षक किती आहेत, मुलं किती आहेत, कुठे जाणार आहेत, प्रवास कसा असेल, कुठे थांबतील, इ.स्वच्छतेची पूर्ण काळजी घेण्याचा सल्ला. जरी हे प्रत्येक व्यक्तीला लागू होते, परंतु घराबाहेर जाणाऱ्या मुलांसाठी तो अधिक महत्त्वाचा सल्ला बनतो. विशेषत: आता कोरोनासारख्या महामारीच्या आगमनानंतर. त्याला समजावून सांगा की प्रवासादरम्यान त्याने शक्य तितके स्वच्छ स्नानगृह वापरावे. हात पुसण्यासाठी नेहमी साबण, सॅनिटायझर, टिश्यू आणि वाइप्स ठेवा आणि त्यांचाच वापर करा. पिण्याच्या पाण्याबाबतही काळजी घ्या.

सुरक्षित रहा, सावध रहा : सुरक्षितता आणि स्मार्ट ( Be alert be safe ) सल्ला. मुलींमध्ये सहावी इंद्रिय जरा जास्त सक्रिय असली तरी काही वेळा निरागसपणा आणि अविचारीपणामुळे त्या आपल्या सुरक्षिततेची काळजी घेऊ शकत नाहीत. मुलीला तिच्या खोलीच्या दारांचे कुलूप आणि बाथरूमच्या खिडक्या इत्यादी चांगल्या बंद ठेवण्यास सांगा. अगोदर नीट तपासा. बाथरूमची कोणतीही खिडकी किंवा वेंटिलेशन किंवा दरवाजा नीट बंद नसल्यास, ते त्वरित दुरुस्त करून घेण्यास तुमच्या शिक्षकांना सांगा. कधीही एकटे जाऊ नका किंवा अंधारात उघडे बाथरूम वापरू नका.

चिन्हे ओळखा आणि सतर्क रहा : मुलांना सांगा की कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. हा सल्ला मुलांना आयुष्याच्या प्रत्येक वळणावर उपयोगी पडेल. जेव्हा ती तुमच्यापासून दूर असलेल्या शहरात असतील. तेव्हा हा सल्ला पाल्यांना तिथेही सुरक्षित ठेवण्यास मदत करेल. तिला समजावून सांगा की तिला कोणावरही सहज विश्वास ठेवण्याची गरज नाही.

अनोळखी लोकांसोबत माहिती शेअर करू नका : तुमची माहिती शेअर करणे टाळा असा सल्ला ( Do not share information with strangers ) द्या. प्रवासादरम्यान अनेकवेळा नवीन मित्र बनतात, नवीन लोकांचीही ओळख होते. हे सर्व लोक वाईट किंवा चुकीचे असतीलच असे नाही. परंतु अशा कोणत्याही व्यक्तीसोबत तुमची वैयक्तिक माहिती शेअर केल्याने ते अडचणीत येऊ शकतात. हे त्यांना पटवून द्या. अनोळखी व्यक्तीसोबत फोटो काढणे टाळा. त्यांना तुमचा मुक्काम, प्रवासाचे वेळापत्रक, तुम्ही कोठे राहता, आई-वडील काय करतात इत्यादीची माहिती देऊ नका असे सांगा.

ग्रूप सोडू नका : ग्रूप सोडून अज्ञात ठिकाणी आणि रात्री उशिरा बाहेर जाणे टाळण्याचा सल्ला ( Do not leave group ) द्या . अनेकदा तरूण वयात ऊर्जा आणि उत्साह या दोन्ही गोष्टी आपल्या शिखरावर असतात. त्यामुळेच चुका होतात. शिक्षकांना माहिती न देता, नियम मोडून अज्ञात ठिकाणी एकटेच फिरायला जाणे ही सर्वात धोकादायक आहे. बहुतेक अपघात यामुळेच होतात. ज्याच्या बातम्या आपण रोज वाचतो. त्यामुळे पाल्यांना तुमच्या ग्रुप व्यतिरिक्त किंवा एकट्याने कुठेही जाण्याची हिंमत करू नका असे सांगा.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.