ETV Bharat / state

राष्ट्रवादीने मंगळवारी बोलावली आमदारांची बैठक; राजकीय घडामोडींना वेग

author img

By

Published : Nov 10, 2019, 12:06 AM IST

शनिवारी दुपारी शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात मंगळवारी आमदारांची मुंबईत बैठक बोलावण्याचा निर्णय झाला.

राष्ट्रवादीने मंगळवारी बोलावली आमदारांची बैठक; राजकीय घडामोडींना वेग

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची तातडीची बैठक मंगळवारी बाेलावण्यात आली आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ही बैठक होणार असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या बैठकीत आमदारांना सत्ता स्थापनेसाठी पक्षाच्या भूमिकेबद्दल निर्णय देणार आहेत. त्यानंतर पवार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची पुन्हा भेट घेणार आहेत.

शनिवारी दुपारी शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात मंगळवारी आमदारांची मुंबईत बैठक बोलावण्याचा निर्णय झाला. शिवसेना-भाजपने मतभेद सोडून एकत्र यावे आणि सरकार स्थापन करावे, या सल्ल्याशिवाय माझ्याकडे सांगण्यासारखे काही नाही, असे पवार बैठकीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना म्हणाले. तर, सिल्वर ओक बंगल्यावर सकाळी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड आदी नेते उपस्थित होते. यावेळी पवार यांनी आपल्या प्रमुख नेत्यांना सेनेच्या भूमिकेवर लक्ष ठेवून राष्ट्रवादी आपला निर्णय घेईल, असे सांगितले आहे. उद्या पवार मुंबईत असल्याने अनेक राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राम मंदिर निकालाने भाजपची स्थिती मजबूत झाली असून भाजप राज्यात मध्यावधी निवडणुका सुद्धा घेऊ शकते, अशी शंका मुंबई काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी व्यक्त केली आहे. सरकार स्थापनेचा ‘डेड लाॅक’ संपवा, असे आवाहन मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी सेना-भाजपला केले आहे. काँग्रेसमधला मोठा गट काँग्रेसने यात पडू नये याच मताचा आहे. तर, आज दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत सेनेला पाठिंबा नव्हे तर थेट सत्तेत सहभागी होण्यासाठी चर्चा झाली आहे. त्यासाठी जयपुर येथे उद्या आमदारांचे मत विचारात घेतले जाणार आहे. त्यामुळे काँग्रेस उद्या आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची तातडीची बैठक मंगळवारी बाेलावण्यात आली आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ही बैठक होणार असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या बैठकीत आमदारांना सत्ता स्थापनेसाठी पक्षाच्या भूमिकेबद्दल निर्णय देणार आहेत. त्यानंतर पवार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची पुन्हा भेट घेणार आहेत.

शनिवारी दुपारी शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात मंगळवारी आमदारांची मुंबईत बैठक बोलावण्याचा निर्णय झाला. शिवसेना-भाजपने मतभेद सोडून एकत्र यावे आणि सरकार स्थापन करावे, या सल्ल्याशिवाय माझ्याकडे सांगण्यासारखे काही नाही, असे पवार बैठकीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना म्हणाले. तर, सिल्वर ओक बंगल्यावर सकाळी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड आदी नेते उपस्थित होते. यावेळी पवार यांनी आपल्या प्रमुख नेत्यांना सेनेच्या भूमिकेवर लक्ष ठेवून राष्ट्रवादी आपला निर्णय घेईल, असे सांगितले आहे. उद्या पवार मुंबईत असल्याने अनेक राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राम मंदिर निकालाने भाजपची स्थिती मजबूत झाली असून भाजप राज्यात मध्यावधी निवडणुका सुद्धा घेऊ शकते, अशी शंका मुंबई काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी व्यक्त केली आहे. सरकार स्थापनेचा ‘डेड लाॅक’ संपवा, असे आवाहन मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी सेना-भाजपला केले आहे. काँग्रेसमधला मोठा गट काँग्रेसने यात पडू नये याच मताचा आहे. तर, आज दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत सेनेला पाठिंबा नव्हे तर थेट सत्तेत सहभागी होण्यासाठी चर्चा झाली आहे. त्यासाठी जयपुर येथे उद्या आमदारांचे मत विचारात घेतले जाणार आहे. त्यामुळे काँग्रेस उद्या आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Intro:राष्ट्रवादीने मंगळवारी बोलावली आमदारांची बैठक

mh-mum-01-ncp-mla-mitting-7201153

(कृपया फाईल फुटेज वापरावेत)


मुंबई, ता. ९ :

राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी आपल्या आमदारांची तातडीची बैठक बाेलावली आहे.
मंगळवारी 12 नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ही बैठक होणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या बैठकीत राष्ट्रवादीच्या आमदारांना सत्ता स्थापनेसाठी पक्षाच्या भूमिकेबद्दल निर्णय देणार आहेत. त्यानंतर लगेच शरद पवार हे लवकरच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची पुन्हा भेट घेणार असल्याचे सांगण्यात येते.
शनिवारी दुपारी शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात आपल्या आमदारांची मंगळवारी (दि.१२) मुंबईत बैठक बोलावण्याचा निर्णय झाला. शिवसेना-भाजपने मतभेद सोडून एकत्र यावे व सरकार स्थापावे, या सल्ल्याशिवाय माझ्याकडे सांगण्यासारखे काही नाही, असे पवार बैठकीनंतर प्रसिद्धी माध्यमांना म्हणाले. तर सिल्वर ओक बंगल्यावर सकाळी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार,धनंजय मुंडे, छगन भुजबळ, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, आदी नेते उपस्थित होते, यावेळी पवार यांनी आपल्या प्रमुख नेत्यांना सेनेच्या भूमिकेवर लक्ष ठेवून राष्ट्रवादी आपला निर्णय घेईल असेच सांगितले असून उद्या मुंबईत पवार असल्याने अनेक राजकीय घडामोडी त्यांच्या बंगल्यावर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राम मंदिर निकालाने भाजपची स्थिती मजबूत झाली असून भाजप राज्यात मध्यावधी निवडणुका सुद्धा घेऊ शकते, अशी शंका मुंबई काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी व्यक्त केली आहे. सरकार स्थापनेचा ‘डेड लाॅक’ संपवा, असे आवाहन मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी सेना-भाजपला केले आहे. एकुण, काँग्रेसमधल्या मोठ्या गटाला अजूनही सेना-भाजपने सरकार स्थापावे व काँग्रेसने यात पडू नये असेच वाटते. तर आज दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत काँग्रेसने राज्यात सेनेला पाठिंबा नव्हे तर थेट सत्तेत सहभागी होण्यासाठी चर्चा झाली असून त्यासाठी जयपुर येथे उद्या आमदारांचे मत विचारात घेतले जाणार आहे. त्यामुळे काँग्रेस उद्या आपली भूमिका ही स्पष्ट करणार असल्याचे सांगण्यात येते.





Body:राष्ट्रवादीने मंगळवारी बोलावली आमदारांची बैठकConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.