ETV Bharat / state

लेखणी बंद आंदोलनंतरही मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरळीत सुरू

author img

By

Published : Oct 2, 2020, 12:42 AM IST

मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या अंतिम वर्ष सत्राच्या परीक्षा आजपासून सुरू झाल्या. या विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये, विद्यापीठ शैक्षणिक विभाग आणि दूर व मुक्त अध्ययन संस्थेतील विद्यार्थी या परीक्षांना प्रविष्ठ झाले होते.

लेखणी बंद आंदोलनंतरही मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरळीत सुरू
लेखणी बंद आंदोलनंतरही मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरळीत सुरू

मुंबई - राज्यातील विद्यापीठांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन पुकारले असतानाही आज मुंबई विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या आणि एटीकेटीच्या परीक्षांना सुरळीत सुरुवात झाली. काही अपवाद वगळता दिवसभरातील या परीक्षा सुरळीत पार पडल्या असल्याची माहिती विद्यापीठकडून सायंकाळी देण्यात आली. मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या अंतिम वर्ष सत्राच्या परीक्षा आजपासून सुरू झाल्या. या विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये, विद्यापीठ शैक्षणिक विभाग आणि दूर व मुक्त अध्ययन संस्थेतील विद्यार्थी या परीक्षांना प्रविष्ठ झाले होते. चारही विद्याशाखेअंतर्गत विविध अभ्यासक्रम आणि विषयांच्या परीक्षा आज सुरळीत पार पडल्या.

अत्यंत सुलभ अशा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विद्यापीठाने आणि महाविद्यालयांनी ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरुपात परीक्षा घेतल्या. परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना नमूना प्रश्न पत्र व त्यांच्या सराव परीक्षाही घेण्यात आल्या होत्या. काही विषयांच्या सराव परीक्षा अजूनही घेतल्या जाणार आहेत. काही अपरिहार्य किंवा तांत्रिक कारणास्तव एखादा विद्यार्थी परीक्षेला बसू शकला नसेल अशा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुन्हा संधी दिली जाणार असल्याचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

बॅकलॉग म्हणजेच एटीकेटी आणि नियमित परीक्षांच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाने विद्याशाखानिहाय महाविद्यालयांचे ९४ समूह तयार केले आहेत. दरदिवशीच्या परीक्षांविषयक घडामोडी आणि अनुषंगिक बाबींसाठी विद्यापीठाने कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली निरीक्षण समिती तयार केली असून या समितीमध्ये प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांच्यासह सर्व अधिष्ठाता, सहाय्यक अधिष्ठाता, जिल्हानिहाय समन्वयक, प्राचार्य, शिक्षणतज्ज्ञ यांचा समावेश आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षांना प्रविष्ठ असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्यासाठी विद्यापीठ आणि महाविद्यालये विशेष प्रयत्न करीत आहेत. आज पार पडलेल्या परीक्षांना समूह महाविद्यालयांनी त्यांच्या वेळापत्रकानुसार परीक्षांचे यशस्वी आयोजन करण्यात आल्याचेही डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

मुंबई - राज्यातील विद्यापीठांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन पुकारले असतानाही आज मुंबई विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या आणि एटीकेटीच्या परीक्षांना सुरळीत सुरुवात झाली. काही अपवाद वगळता दिवसभरातील या परीक्षा सुरळीत पार पडल्या असल्याची माहिती विद्यापीठकडून सायंकाळी देण्यात आली. मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या अंतिम वर्ष सत्राच्या परीक्षा आजपासून सुरू झाल्या. या विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये, विद्यापीठ शैक्षणिक विभाग आणि दूर व मुक्त अध्ययन संस्थेतील विद्यार्थी या परीक्षांना प्रविष्ठ झाले होते. चारही विद्याशाखेअंतर्गत विविध अभ्यासक्रम आणि विषयांच्या परीक्षा आज सुरळीत पार पडल्या.

अत्यंत सुलभ अशा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विद्यापीठाने आणि महाविद्यालयांनी ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरुपात परीक्षा घेतल्या. परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना नमूना प्रश्न पत्र व त्यांच्या सराव परीक्षाही घेण्यात आल्या होत्या. काही विषयांच्या सराव परीक्षा अजूनही घेतल्या जाणार आहेत. काही अपरिहार्य किंवा तांत्रिक कारणास्तव एखादा विद्यार्थी परीक्षेला बसू शकला नसेल अशा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुन्हा संधी दिली जाणार असल्याचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

बॅकलॉग म्हणजेच एटीकेटी आणि नियमित परीक्षांच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाने विद्याशाखानिहाय महाविद्यालयांचे ९४ समूह तयार केले आहेत. दरदिवशीच्या परीक्षांविषयक घडामोडी आणि अनुषंगिक बाबींसाठी विद्यापीठाने कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली निरीक्षण समिती तयार केली असून या समितीमध्ये प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांच्यासह सर्व अधिष्ठाता, सहाय्यक अधिष्ठाता, जिल्हानिहाय समन्वयक, प्राचार्य, शिक्षणतज्ज्ञ यांचा समावेश आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षांना प्रविष्ठ असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्यासाठी विद्यापीठ आणि महाविद्यालये विशेष प्रयत्न करीत आहेत. आज पार पडलेल्या परीक्षांना समूह महाविद्यालयांनी त्यांच्या वेळापत्रकानुसार परीक्षांचे यशस्वी आयोजन करण्यात आल्याचेही डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.