ETV Bharat / state

'पोलीस आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना म्हाडाच्या योजनेमध्ये २० टक्के घरे राखीव' - jitendra avhad latest pc

लवकरच म्हाडा बिल्डर म्हणून अनेक सरकारी जागावर इमारती उभ्या करेल. त्यासाठी तयारीही सुरु आहे. तसेच मुंबईतील पत्रा चाळीचा विकास करण्यासाठी आम्ही आढावा बैठकी सोबत त्यासाठी अनेक निर्णय घेत आहे, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.

Minister jitendra avhad
जितेंद्र आव्हाड (गृहनिर्माणमंत्री)
author img

By

Published : Jan 24, 2020, 4:27 PM IST

Updated : Jan 24, 2020, 4:38 PM IST

मुंबई - पोलीस कर्मचारी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्यासाठी प्रत्येकी १० टक्के घरे म्हाडाच्या सर्व योजनांमध्ये राखीव ठेवले जातील, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज (शुक्रवारी) येथे केली. आव्हाड यांच्या घोषणेमुळे यापुढे पोलिसांना म्हाडाच्या लॉटरीमध्ये दहा टक्के आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना 10 टक्के घरे राखीव राहणार आहेत. मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आव्हाड बोलत होते. यावेळी त्यांनी म्हाडाकडून अनेक प्रकल्पांचा आढावा घेतला.

आव्हाड पुढे म्हणाले, लवकरच म्हाडा बिल्डर म्हणून अनेक सरकारी जागावर इमारती उभ्या करेल. त्यासाठी तयारीही सुरू आहे. तसेच मुंबईतील पत्रा चाळीचा विकास करण्यासाठी आम्ही आढावा बैठकी सोबत त्यासाठी अनेक निर्णय घेत आहोत. पुढील दीड महिन्यात या पत्रा चाळीचा विकासाचा मार्ग मोकळा होईल, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - मुंबईत वंचित आघाडीच्या बंदला संमिश्र प्रतिसाद; उपनगरात बसवर दगडफेक

घरे बांधताना किंवा नवीन प्रकल्प उभे करताना म्हाडाचे एक पैशाचेही नुकसान न करता विकास करणार आहे. सर्व प्रमुख बँकांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक मुख्यमंत्री आणि शरद पवारांनी घ्यावी, अशी विनंती केली आहे. राज्यातील गृहनिर्माण क्षेत्राला बळ देण्यासाठी ही मोहीम सुरु करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई, ठाण्यात काही आरक्षण टाकता येते का याचा विचार केला जात आहे. तसेच यामुळे राज्यातील लोकांना परवडणारी घरे देता येतील, असेही आव्हाड म्हणाले.

हेही वाचा - वंचितकडून आज 'महाराष्ट्र बंद'... मनमाड शहरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

15 वर्ष अडकलेल्या शांतीसागर प्रकल्पाला चालना दिली आहे. तर घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर हा प्रकल्पाचे 15 दिवसात भूमीपूजन केले जाईल. तसेच तीन वर्षापेक्षा जास्त काळ बंद झालेल्या योजना रद्द करता येतील का याचा विचार केला जाणार असल्याचे ते म्हणाले. एसआरए प्रकल्पात आता फॉरवर्ड ट्रेडिंग यापुढे कुठेही करु देणार नाही. एक जण प्रकल्प घेतो आणि त्याचे तुकडे-तुकडे करून दुसऱ्यांना देतो. म्हणून एसआरए आणि म्हाडामध्ये पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले.

मुंबई - पोलीस कर्मचारी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्यासाठी प्रत्येकी १० टक्के घरे म्हाडाच्या सर्व योजनांमध्ये राखीव ठेवले जातील, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज (शुक्रवारी) येथे केली. आव्हाड यांच्या घोषणेमुळे यापुढे पोलिसांना म्हाडाच्या लॉटरीमध्ये दहा टक्के आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना 10 टक्के घरे राखीव राहणार आहेत. मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आव्हाड बोलत होते. यावेळी त्यांनी म्हाडाकडून अनेक प्रकल्पांचा आढावा घेतला.

आव्हाड पुढे म्हणाले, लवकरच म्हाडा बिल्डर म्हणून अनेक सरकारी जागावर इमारती उभ्या करेल. त्यासाठी तयारीही सुरू आहे. तसेच मुंबईतील पत्रा चाळीचा विकास करण्यासाठी आम्ही आढावा बैठकी सोबत त्यासाठी अनेक निर्णय घेत आहोत. पुढील दीड महिन्यात या पत्रा चाळीचा विकासाचा मार्ग मोकळा होईल, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - मुंबईत वंचित आघाडीच्या बंदला संमिश्र प्रतिसाद; उपनगरात बसवर दगडफेक

घरे बांधताना किंवा नवीन प्रकल्प उभे करताना म्हाडाचे एक पैशाचेही नुकसान न करता विकास करणार आहे. सर्व प्रमुख बँकांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक मुख्यमंत्री आणि शरद पवारांनी घ्यावी, अशी विनंती केली आहे. राज्यातील गृहनिर्माण क्षेत्राला बळ देण्यासाठी ही मोहीम सुरु करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई, ठाण्यात काही आरक्षण टाकता येते का याचा विचार केला जात आहे. तसेच यामुळे राज्यातील लोकांना परवडणारी घरे देता येतील, असेही आव्हाड म्हणाले.

हेही वाचा - वंचितकडून आज 'महाराष्ट्र बंद'... मनमाड शहरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

15 वर्ष अडकलेल्या शांतीसागर प्रकल्पाला चालना दिली आहे. तर घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर हा प्रकल्पाचे 15 दिवसात भूमीपूजन केले जाईल. तसेच तीन वर्षापेक्षा जास्त काळ बंद झालेल्या योजना रद्द करता येतील का याचा विचार केला जाणार असल्याचे ते म्हणाले. एसआरए प्रकल्पात आता फॉरवर्ड ट्रेडिंग यापुढे कुठेही करु देणार नाही. एक जण प्रकल्प घेतो आणि त्याचे तुकडे-तुकडे करून दुसऱ्यांना देतो. म्हणून एसआरए आणि म्हाडामध्ये पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले.

Intro:पोलिस आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना म्हाडात २० टक्के घरे राखीव - जितेंद्र आव्हाड

mh-mum-01-ncp-jitendraaavad-mhada-press-7201153

(यासाठीचे फुटे ज mojo वर पाठवले आहेत)

मुंबई, ता. २४
पोलीस कर्मचारी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्यासाठी प्रत्येकी १० टक्के घरे म्हाडाच्या सर्व योजनांमध्ये राखीव ठेवले जातील अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज मुंबईत केली.
आव्हाड यांच्या घोषणेमुळे यापुढे पोलिसांना म्हाडाच्या लॉटरी मध्ये दहा टक्के आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना 10 टक्के घरे राखीव राहणार आहेत.
मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आव्हाड यांनी म्हाडाकडून अनेक प्रकल्पांचा आढावा घेतला जात आहे. लवकरच म्हाडा बिल्डर म्हणून अनेक सरकारी जागावर इमारती उभ्या करेल. त्यासाठी तयारीही सुरू असल्याची माहिती दिली. मुंबईतील पत्रा शाळेचा विकास करण्यासाठी आम्ही आढावा बैठकी सोबतच त्यासाठीच्या अनेक निर्णय घेत असून पुढील दीड महिन्यात पत्रा चाळीचा विकासाचा मार्ग मोकळा होईल असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.
घरे बांधताना किंवा नवीन प्रकल्प उभे करताना म्हाडाचं एक पैशाचंही नुकसान न करता विकास करणार आहे. सर्व प्रमुख बँकांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक मुख्यमंत्री आणि शरद पवारांनी घ्यावी अशी विनंती केली आहे. राज्यातील गृहनिर्माण क्षेत्राला बळ देण्यासाठी ही मोहीम सुरू करतोय. मुंबई, ठाण्यात काही आरक्षणं टाकता येतायत का याचा विचार करतोय त्यामुळे राज्यातील लोकांना परवडणारी घरं देता येतील असेही आव्हाड म्हणाले.15 वर्ष अडकलेल्या शांतीसागर प्रकल्पाला चालना दिली आहे तर घाटकोपर इथ रमाबाई आंबेडकर इथं हा प्रकल्प आहे. 15 दिवसात या प्रकल्पाचं भूमीपूजन केलं जाईल. तसेच तीन वर्षापेक्षा जास्त काळ बंद झालेल्या योजना रद्द करता येतील का याचा विचार केला जाईल. एसआरए प्रकल्पात आता फॉरवर्ड ट्रेडिंग यापुढे कुठेही करू देणार नाही. एक जण प्रकल्प घेतो आणि त्याचे तुकडे-तुकडे करून दुसऱ्यांना देतो.एसआरए आणि म्हाडामध्ये पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हाडा बिल्डर आहे, त्यामुळे यापुढे.म्हाडा आपले प्रकल्प उभे करणार असल्याचे अव्हाड म्हणाले.Body:पोलिस आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना म्हाडात २० टक्के घरे राखीव - जितेंद्र आव्हाड
Conclusion:
Last Updated : Jan 24, 2020, 4:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.