ETV Bharat / state

ज्यांच्या गाडीवर कायम लाल दिवा राहिला ते स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात, जयंत पाटलांचा नाईकांना टोला

author img

By

Published : Sep 15, 2019, 3:28 PM IST

Updated : Sep 15, 2019, 3:57 PM IST

पवारसाहेबांच्या आशिर्वादाने ज्यांच्या गाडीवर कायम लाल दिवा राहिला असे लोक स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात जात आहेत. अशा लोकांना येत्या काळात नवी मुंबईची जनता नक्कीत धडा शिकवेल असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गणेश नाईक यांच्यावर निशाणा साधला.

जयंत पाटील

मुंबई - पवारसाहेबांच्या आशिर्वादाने ज्यांच्या गाडीवर कायम लाल दिवा राहिला, असे लोक स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात जात आहेत. अशा लोकांना येत्या काळात नवी मुंबईची जनता नक्कीच धडा शिकवेल असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गणेश नाईक यांच्यावर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आयोजीत नवी मुंबईच्या मेळाव्यात जयंत पाटील बोलत होते.

नगरसेवक जात आहेत म्हणून त्यांच्या मागे मी चाललो आहे, असे सांगणारे लोक कधीच नेते होऊ शकत नाहीत. स्वार्थापोटी पक्ष सोडून जाणार्‍या लोकांना नवी मुंबईची जनता कधीच लक्षात ठेवणार नाही. त्यांना येत्या काळात नक्कीच धडा शिकवेल असे पाटील म्हणाले. अनेकजण तर कोणत्या ना कोणत्या चौकशीच्या भीतीने जात आहेत. एका बाजूला सत्ता उपभोगता आणि दुसरीकडे सत्ता गेल्यावर दुसर्‍या पक्षात जाता असे म्हणत पाटील यांनी पक्षांतर करणाऱ्यांना लक्ष्य केले.


मंदीचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला
भारतातील मंदीचा सर्वात जास्त फटका हा आपल्या महाराष्ट्राला बसत आहे. दोन कोटी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतो म्हणणार्‍या सरकाराच्या काळात रोजगार तर मिळालाच नाही मात्र, अनेकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. तेव्हा आपण कोणाच्या पाठीशी राहायचे ते आता आपण ठरवले पाहिजे असेही पाटील म्हणाले.

भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच देशाच्या अर्थकारणात मंदीचा परिणाम दिसत आहे. मंदी सामान्य माणसाच्या घराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही सांगत होतो की नोटबंदी, GST सारखे चुकीचे निर्णय घेण्यात आल्याचेही पाटील म्हणाले.

मुंबई - पवारसाहेबांच्या आशिर्वादाने ज्यांच्या गाडीवर कायम लाल दिवा राहिला, असे लोक स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात जात आहेत. अशा लोकांना येत्या काळात नवी मुंबईची जनता नक्कीच धडा शिकवेल असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गणेश नाईक यांच्यावर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आयोजीत नवी मुंबईच्या मेळाव्यात जयंत पाटील बोलत होते.

नगरसेवक जात आहेत म्हणून त्यांच्या मागे मी चाललो आहे, असे सांगणारे लोक कधीच नेते होऊ शकत नाहीत. स्वार्थापोटी पक्ष सोडून जाणार्‍या लोकांना नवी मुंबईची जनता कधीच लक्षात ठेवणार नाही. त्यांना येत्या काळात नक्कीच धडा शिकवेल असे पाटील म्हणाले. अनेकजण तर कोणत्या ना कोणत्या चौकशीच्या भीतीने जात आहेत. एका बाजूला सत्ता उपभोगता आणि दुसरीकडे सत्ता गेल्यावर दुसर्‍या पक्षात जाता असे म्हणत पाटील यांनी पक्षांतर करणाऱ्यांना लक्ष्य केले.


मंदीचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला
भारतातील मंदीचा सर्वात जास्त फटका हा आपल्या महाराष्ट्राला बसत आहे. दोन कोटी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतो म्हणणार्‍या सरकाराच्या काळात रोजगार तर मिळालाच नाही मात्र, अनेकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. तेव्हा आपण कोणाच्या पाठीशी राहायचे ते आता आपण ठरवले पाहिजे असेही पाटील म्हणाले.

भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच देशाच्या अर्थकारणात मंदीचा परिणाम दिसत आहे. मंदी सामान्य माणसाच्या घराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही सांगत होतो की नोटबंदी, GST सारखे चुकीचे निर्णय घेण्यात आल्याचेही पाटील म्हणाले.

Intro:बारामतीत ३७० कलम लागू आहे का ? - मुख्यमंत्री

बारामतीत घोषणाबाजी करणारे फक्त सात लोक होते. सात लोकांवर लाठीचार्ज करावा लागतो का? ते पळून गेले. आमचे सात लोक पवारांच्या सभेत जाऊन घोषणा देऊ लागले तर? एवढी का पायाखालची जमीन सरकलीय? बारामतीत दुसऱ्या कुठल्या पक्षाच्या नेत्यांनी सभा घेऊ नये का ? बारामतीत काय३७० कलम लागू आहे का? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

भाजपची महाजनादेश यात्रा शनिवारी बारामती येथे होती. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे म्हटले जात होते..त्यावर मुख्यमंत्री बोलत होते..Body:मुख्यमंत्री म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आमच्या शहरात यावं, सभा घ्यावी आम्ही त्यांना सहकार्य करतो..फक्त सात कार्यकर्ते सभा उधळण्याचा प्रयत्न करत होते..पोलीस येताच ते पळून गेले..कोणावरही लाठीचार्ज झाला नाही..Conclusion:पुणेकरांची दिलगिरी व्यक्त करतो
महाजनादेश यात्रेला काल पुण्यात येण्यास उशीर झाला..येन गर्दीच्या वेळी यात्रा पुण्यात दाखल झाली..लोकांनीही प्रचंड प्रतिसाद दिला...उशिरा प्रवेश केल्यामुळे अनेकांची गैरसोय झाली.. त्यामुळे मी पुणेकरांची दिलगिरी व्यक्त करतो..पुणेकरांनी दिलेला प्रतिसाद हा अभूतपूर्व होता..


Last Updated : Sep 15, 2019, 3:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.