ETV Bharat / state

करीम लाला आणि इंदिरा गांधी यांची भेट ठरवून झाली नाही - बलजीत परमार

author img

By

Published : Jan 16, 2020, 5:57 PM IST

Updated : Jan 16, 2020, 11:42 PM IST

संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा इंदिरा गांधी यांच्याशी कुठलाही संबंध नसल्याचे ज्येष्ठ पत्रकार बलजीत परमार यांनी म्हटले आहे. परमार यांच्याशी या संदर्भात अधिक संवाद साधला ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी महेश बागल यांनी.

बलजीत परमार
बलजीत परमार

मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांनी अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याची भेट तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासोबत झाली होती, असे वक्तव्य केले. यावर राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला होता. नंतर संजय राऊत यांनी त्यांचे वक्तव्य मागे घेतले. मात्र, संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा इंदिरा गांधी यांच्याशी कुठलाही संबंध नसल्याचे ज्येष्ठ पत्रकार बलजीत परमार यांनी म्हटले आहे. 1960 ते 80 च्या दरम्यान मुंबईत करीम लाला याच्यासह हाजी मस्तान आणि वरदराजन मुदलियार यांचे वर्चस्व होते. यापैकी कोणीही केंद्रातील राजकारण्यांसोबत संपर्क ठेवून नव्हता, असे परमार यांनी म्हटले आहे.

करीम लाला आणि इंदिरा गांधी यांची कधीही भेट झाली नाही

तो फोटो केवळ योगायोग -

इंदिरा गांधी आणि करीम लाला यांचा एक फोटो समोर आला आहे. मात्र, तो फोटो केवळ एक योगायोग असल्याचे बलजीत परमार यांनी सांगितले.

एकेकाळी मुंबईतील काळ्या धंद्यांवर अधिराज्य गाजवणारी ही तिकडी कोण होती? -

कोण होता करीम लाला?
करीम लालाचे खरे नाव अब्दुल करीम शेरखान असे होते. 1911 मध्ये अफगाणिस्तानमध्ये कुनार प्रांतात करीम लालाचा जन्म झाला होता. 1920 च्या दरम्यान तो आपल्या कुटुंबीयांसोबत अफगाणिस्तानमधून मुंबईत दाखल झाला. त्यानंतर 1960 ते 1980 चा काळ करीम लालाने गाजवला. सुरुवातीला मुंबईतील डॉकमध्ये काम करणारा करीम लाला काही काळानंतर दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार येथील पठाण टोळीमध्ये सामील झाला. ही टोळी मुंबईतील गुजराती, मारवाडी व्यापाऱ्यांनी इतरांना दिलेले कर्ज वसूल करण्यासाठी काम करत होती.

हेही वाचा - जम्मू-काश्मीर : आणखी पाच नेते कैदेतून मुक्त, ३७० लागू करण्याच्या पार्श्वभूमीवर केली होती अटक


काही काळानंतर करीम लाला हा स्वतः पठाण टोळीचा म्होरक्या झाला. या टोळीने स्मगलिंग, अंमली पदार्थांची तस्करी, खंडणी, कॉन्ट्रॅक्ट किलिंग, जुगाराचे अड्डे चालवणे आणि बळजबरी संपत्तीवर कब्जा करणे, यासारखे गुन्हे करण्यास सुरुवात केली. साठच्या दशकात मुंबईत पठाण टोळीचा मोठा दबदबा होता. मात्र, 70 च्या दशकात करीम लाला याला प्रतिस्पर्धी म्हणून हाजी मस्तान आणि वरदराजन हे उतरले. तिघांनी बोलणी करून धंदा करण्यासाठी मुंबईचे तीन हिस्से करून घेतले.

नंतर वाढत्या वयामुळे करीम लालाने पठाण टोळीची कमान पुतण्या समद खान याच्याकडे सोपवली. त्यानंतर त्याने हॉटेल व्यवसायासह, ट्रान्सपोर्ट आणि पासपोर्टच्या व्यवसायाकडे लक्ष दिले. करीम लाला आठवड्यातून एकदा स्वतःचा जनता दरबार भरवत असे. त्या ठिकाणी तो गरजूंना पैशांची मदत करत असे. काही प्रकरणात तो त्याच्या टोळीच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवण्याचाही प्रयत्न करत होता. त्यावेळी बॉलिवूड कलाकारांसह काही राजकारणीही करीम लालाच्या संपर्कात होते. मात्र, त्याची उघड चर्चा तो कधीही करत नव्हता, असे बलजीत परमार यांनी सांगितले. 19 फेब्रुवारी 2002 ला लालाचा मुंबईत मृत्यू झाला. अमिताभ बच्चन यांच्या जंजिर या चित्रपटातील अभिनेता प्राण यांनी केलेली 'शेरखान' ही भूमिका करीम लालावर आधारित होती.

हाजी मस्तान -
मुंबईमध्ये 1960 ते 80 च्या काळामध्ये हाजी मस्तान हा सुद्धा नावाजलेला माफिया म्हणून ओळखला जात होता. मूळचा तामिळनाडूचा असलेला हाजी मस्तान यांचा जन्म 1926 ला झाला होता. मात्र, त्याने कुटुंबीयांसोबत आपले बस्तान मुंबईतील भेंडी बाजार येथे बसवले होते. मुंबई आणि गुजरातच्या समुद्रकिनारी सर्वात मोठे तस्करीचे जाळे चालवण्यासाठी हाजी मस्तान ओळखला जात होता. त्यातून मिळालेल्या पैशातून त्यांनी बॉलीवूडमध्ये चित्रपट निर्मिती आणि रिअल इस्टेटचा व्यवसाय करण्यास सुरुवात केली. मस्तान हा पोलीस प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी यांच्यासोबत नेहमी चांगले संबंध ठेवून होता, असेही परमार यांनी सांगितले. त्याने आपले प्रतिस्पर्धी करीम लाला आणि वरदराजन यांच्यासोबतही त्याने चांगले संबंध प्रस्थापित केले. आणीबाणीच्या काळामध्ये हाजी मस्तानला तुरुंगात पाठवण्यात आले. तत्कालीन नेते जयप्रकाश नारायण यांच्याकडून प्रभावित होऊन हाजी मस्तानने हिंदी शिकण्यास सुरुवात केली होती, असे सांगितले जाते. तुरुंगातून सुटल्यानंतर 1980च्या दशकामध्ये हाजी मस्तान याने राजकारणात प्रवेश करून स्वतःचा 'दलित मुस्लीम सुरक्षा महासंघ' पक्ष काढला. पुढे याचे नाव 'भारतीय मायनॉरिटी सुरक्षा महासंघ' असे करण्यात आले. 25 जून 1994 ला हाजी मस्तानचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

वरदराजन मुदलियार -
मुंबईतील व्हिक्टोरिया टर्मिनसवर (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) वरदराजन मुदलियार हा हमाल म्हणून काम करत होता. तामिळनाडू येथील मद्रास(चेन्नई)मधील तुतिकोरिन येथे 1926 ला वरदराजनचा जन्म झाला होता. अंडरवर्ल्डमध्ये मोठे होण्यासाठी वरदराजन हा बिस्मिल्ला शहा बाबा दर्ग्यावर नेहमी गरिबांना अन्नाचे वाटप करत होता. मुंबईतील माटुंगा परिसर हा वरदराजनचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. 1980 च्या काळात वरदराजनच्या टोळीतील शेकडो जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती, तर काही जणांचे एन्काऊंटर करण्यात आले. वरदराजन याने जुगाराचे अड्डे आणि अनधिकृत दारूचे अड्डे चालवून स्वतःचे बस्तान बसवले होते. यासाठी हाजी मस्तानने त्याला मोठी मदत केली. नंतर मात्र पोलिसांच्या करवाईला कंटाळून त्याने मुंबई सोडून गाव गाठले होते. तेथेच 2 जानेवारी 1988 ला वरदराजनचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मात्र, आपला अंत्यविधी मुंबईतच व्हावा अशी, वरदराजनची ईच्छा होती. यासाठी स्वतः हाजी मस्तान याने चार्टर्ड विमानाने त्याचे शव मुंबईतील माटुंगा येथे आणून त्यावर अंत्यविधी केला, असेही परमार यांनी सांगितले.

मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांनी अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याची भेट तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासोबत झाली होती, असे वक्तव्य केले. यावर राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला होता. नंतर संजय राऊत यांनी त्यांचे वक्तव्य मागे घेतले. मात्र, संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा इंदिरा गांधी यांच्याशी कुठलाही संबंध नसल्याचे ज्येष्ठ पत्रकार बलजीत परमार यांनी म्हटले आहे. 1960 ते 80 च्या दरम्यान मुंबईत करीम लाला याच्यासह हाजी मस्तान आणि वरदराजन मुदलियार यांचे वर्चस्व होते. यापैकी कोणीही केंद्रातील राजकारण्यांसोबत संपर्क ठेवून नव्हता, असे परमार यांनी म्हटले आहे.

करीम लाला आणि इंदिरा गांधी यांची कधीही भेट झाली नाही

तो फोटो केवळ योगायोग -

इंदिरा गांधी आणि करीम लाला यांचा एक फोटो समोर आला आहे. मात्र, तो फोटो केवळ एक योगायोग असल्याचे बलजीत परमार यांनी सांगितले.

एकेकाळी मुंबईतील काळ्या धंद्यांवर अधिराज्य गाजवणारी ही तिकडी कोण होती? -

कोण होता करीम लाला?
करीम लालाचे खरे नाव अब्दुल करीम शेरखान असे होते. 1911 मध्ये अफगाणिस्तानमध्ये कुनार प्रांतात करीम लालाचा जन्म झाला होता. 1920 च्या दरम्यान तो आपल्या कुटुंबीयांसोबत अफगाणिस्तानमधून मुंबईत दाखल झाला. त्यानंतर 1960 ते 1980 चा काळ करीम लालाने गाजवला. सुरुवातीला मुंबईतील डॉकमध्ये काम करणारा करीम लाला काही काळानंतर दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार येथील पठाण टोळीमध्ये सामील झाला. ही टोळी मुंबईतील गुजराती, मारवाडी व्यापाऱ्यांनी इतरांना दिलेले कर्ज वसूल करण्यासाठी काम करत होती.

हेही वाचा - जम्मू-काश्मीर : आणखी पाच नेते कैदेतून मुक्त, ३७० लागू करण्याच्या पार्श्वभूमीवर केली होती अटक


काही काळानंतर करीम लाला हा स्वतः पठाण टोळीचा म्होरक्या झाला. या टोळीने स्मगलिंग, अंमली पदार्थांची तस्करी, खंडणी, कॉन्ट्रॅक्ट किलिंग, जुगाराचे अड्डे चालवणे आणि बळजबरी संपत्तीवर कब्जा करणे, यासारखे गुन्हे करण्यास सुरुवात केली. साठच्या दशकात मुंबईत पठाण टोळीचा मोठा दबदबा होता. मात्र, 70 च्या दशकात करीम लाला याला प्रतिस्पर्धी म्हणून हाजी मस्तान आणि वरदराजन हे उतरले. तिघांनी बोलणी करून धंदा करण्यासाठी मुंबईचे तीन हिस्से करून घेतले.

नंतर वाढत्या वयामुळे करीम लालाने पठाण टोळीची कमान पुतण्या समद खान याच्याकडे सोपवली. त्यानंतर त्याने हॉटेल व्यवसायासह, ट्रान्सपोर्ट आणि पासपोर्टच्या व्यवसायाकडे लक्ष दिले. करीम लाला आठवड्यातून एकदा स्वतःचा जनता दरबार भरवत असे. त्या ठिकाणी तो गरजूंना पैशांची मदत करत असे. काही प्रकरणात तो त्याच्या टोळीच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवण्याचाही प्रयत्न करत होता. त्यावेळी बॉलिवूड कलाकारांसह काही राजकारणीही करीम लालाच्या संपर्कात होते. मात्र, त्याची उघड चर्चा तो कधीही करत नव्हता, असे बलजीत परमार यांनी सांगितले. 19 फेब्रुवारी 2002 ला लालाचा मुंबईत मृत्यू झाला. अमिताभ बच्चन यांच्या जंजिर या चित्रपटातील अभिनेता प्राण यांनी केलेली 'शेरखान' ही भूमिका करीम लालावर आधारित होती.

हाजी मस्तान -
मुंबईमध्ये 1960 ते 80 च्या काळामध्ये हाजी मस्तान हा सुद्धा नावाजलेला माफिया म्हणून ओळखला जात होता. मूळचा तामिळनाडूचा असलेला हाजी मस्तान यांचा जन्म 1926 ला झाला होता. मात्र, त्याने कुटुंबीयांसोबत आपले बस्तान मुंबईतील भेंडी बाजार येथे बसवले होते. मुंबई आणि गुजरातच्या समुद्रकिनारी सर्वात मोठे तस्करीचे जाळे चालवण्यासाठी हाजी मस्तान ओळखला जात होता. त्यातून मिळालेल्या पैशातून त्यांनी बॉलीवूडमध्ये चित्रपट निर्मिती आणि रिअल इस्टेटचा व्यवसाय करण्यास सुरुवात केली. मस्तान हा पोलीस प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी यांच्यासोबत नेहमी चांगले संबंध ठेवून होता, असेही परमार यांनी सांगितले. त्याने आपले प्रतिस्पर्धी करीम लाला आणि वरदराजन यांच्यासोबतही त्याने चांगले संबंध प्रस्थापित केले. आणीबाणीच्या काळामध्ये हाजी मस्तानला तुरुंगात पाठवण्यात आले. तत्कालीन नेते जयप्रकाश नारायण यांच्याकडून प्रभावित होऊन हाजी मस्तानने हिंदी शिकण्यास सुरुवात केली होती, असे सांगितले जाते. तुरुंगातून सुटल्यानंतर 1980च्या दशकामध्ये हाजी मस्तान याने राजकारणात प्रवेश करून स्वतःचा 'दलित मुस्लीम सुरक्षा महासंघ' पक्ष काढला. पुढे याचे नाव 'भारतीय मायनॉरिटी सुरक्षा महासंघ' असे करण्यात आले. 25 जून 1994 ला हाजी मस्तानचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

वरदराजन मुदलियार -
मुंबईतील व्हिक्टोरिया टर्मिनसवर (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) वरदराजन मुदलियार हा हमाल म्हणून काम करत होता. तामिळनाडू येथील मद्रास(चेन्नई)मधील तुतिकोरिन येथे 1926 ला वरदराजनचा जन्म झाला होता. अंडरवर्ल्डमध्ये मोठे होण्यासाठी वरदराजन हा बिस्मिल्ला शहा बाबा दर्ग्यावर नेहमी गरिबांना अन्नाचे वाटप करत होता. मुंबईतील माटुंगा परिसर हा वरदराजनचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. 1980 च्या काळात वरदराजनच्या टोळीतील शेकडो जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती, तर काही जणांचे एन्काऊंटर करण्यात आले. वरदराजन याने जुगाराचे अड्डे आणि अनधिकृत दारूचे अड्डे चालवून स्वतःचे बस्तान बसवले होते. यासाठी हाजी मस्तानने त्याला मोठी मदत केली. नंतर मात्र पोलिसांच्या करवाईला कंटाळून त्याने मुंबई सोडून गाव गाठले होते. तेथेच 2 जानेवारी 1988 ला वरदराजनचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मात्र, आपला अंत्यविधी मुंबईतच व्हावा अशी, वरदराजनची ईच्छा होती. यासाठी स्वतः हाजी मस्तान याने चार्टर्ड विमानाने त्याचे शव मुंबईतील माटुंगा येथे आणून त्यावर अंत्यविधी केला, असेही परमार यांनी सांगितले.

Intro:शिवसेना नेते संजय राऊत यांनी अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याची भेट तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासोबत झाली होती अस वक्तव्य केल्यानंतर यावर राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र या नंतर संजय राऊत यांनी त्यांचे वक्तव्य मागे घेतले आहे. मात्र संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा इंदिरा गांधी यांच्याशी कुठलाही संबंध नसल्याचं ज्येष्ठ पत्रकार बलजीत परमार यांनी म्हटलेले आहे. 1960 ते 80 च्या दरम्यान मुंबईत करीम लाला याच्यासह हाजी मस्तान व वर्धाराजन मुदलियार यांचं वर्चस्व होत. मात्र यापैकी कोणीही केंद्रातील राजकारण्यांसोबत सोबत संपर्क ठेवून नव्हता असे त्यांनी म्हटले आहे आहे. त्यांच्याशी या संदर्भात अधिक संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी.


Body:करीम लाला --

ज्या करीम लाला बद्दल शिवसेना नेते संजय राऊत हे बोलत आहे त्या करीम लाला च खरं नाव अब्दुल करीम शेरखान असे होते. 1911 मध्ये अफगाणिस्तानमध्ये कुनार प्रांतात करीम लाला चा जन्म झालेला होता. तर त्याचा मृत्यू 19 फेब्रुवारी 2002 रोजी मुंबईत झाला. 1920 च्या दरम्यान आपल्या कुटुंबियांसोबत अफगाणिस्तानमधून मुंबईत दाखल झाल्यानंतर 1960 ते 1980 चा काळ हा करीम लालाने गाजवला होता . सुरवातीला मुंबईतील डॉक मध्ये काम करणाऱ्या करीम लाला हा काही काळानंतर दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार येथील पठाण गॅंग मध्ये शामिल झाला . ही गॅंग मुंबईतील गुजराती , मारवाडी व्यापाऱ्यांनी इतरांना दिलेले कर्ज वसूल करण्यासाठी काम करत होती.

काही काळानंतर करीम लाला हा स्वतः पठाण गॅंग चा म्होरक्या झाल्यानंतर या टोळीने स्मगलिंग, अमली पदार्थांची तस्करी, खंडणी , कॉन्ट्रॅक्ट किलिंग , जुगाराचे अड्डे चालवणे व बळजबरी संपत्तीवर कब्जा करणे अशासारखे गुन्हे करण्यास सुरुवात केली. साठच्या दशकात मुंबईत पठाण गॅंग चा मोठा दबदबा होता. मात्र 70 च्या दशकात करीम लाला याला प्रतिस्पर्धी म्हणून हाजी मस्तान आणि वर्धाराजन यांच्या सह बोलणी मुंबईत त्यांचा काळा धंदा करण्यासाठी मुंबईचे 3 हिस्से करून घेतले होते.

70 च्या दशकात वाढत्या वयामुळे करीम लाला याने त्याच्या पठाण गॅंग ची कमान त्याच्या पुतण्या समद खान याच्या कडे सोपावलीने त्यानंतर त्याने त्याचे दोन हॉटेल व्यवसायासह , ट्रान्स्पोर्ट , पासपोर्ट च्या व्यवसायाकडे लक्ष दिले. करीम लाला हा स्वतः आठवड्यातून स्वतःचा जनता दरबार भरवीत असे ज्या ठिकाणी तो गरजूंना पैशांची मदत करीत असे. काही प्रकरणात तो त्याच्या पठाण गॅंग च्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडविण्याचाही प्रयत्न करीत होता. करीम लाला यांच्या संपर्कात त्यावेळचे बॉलिवूड कलाकारांसह काही राजकारणीही होते. मात्र त्याची उघड चर्चा मात्र तो कधीही करीत नव्हता . अमिताभ बच्चन यांच्या जंजिर या चित्रपटातील शेरखान ही भूमिका कारीलाला याच्यावरच आधारित होती.


Conclusion:हाजी मस्तान -

मुंबईत 1960 ते 80 च्या काळामध्ये हाजी मस्तान हा सुद्धा नावाजलेला माफिया म्हणून ओळखला जात होता. मूळचा तामिळनाडूचा असलेला हाजी मस्तान यांचा जन्म 1926 रोजी झाला होता . मात्र त्याने त्याचे बस्तान त्याच्या कुटुंबीयांसोबत मुंबईतील भेंडी बाजार येथे बसवले होते. मुंबई, गुजरातच्या समुद्रकिनारी सर्वात मोठं तस्करीत जाळ चालवणारा हाजी मस्तान म्हणून ओळखला जात होता .त्यातून मिळालेल्या पैशातून त्यांनी बॉलीवूडमध्ये चित्रपट निर्मिती व रिअल इस्टेटमध्ये व्यवसाय करण्यास सुरुवात केली होती. हाजी मस्तान हा पोलीस प्रशासकीय अधिकारी व राजकारणी यांच्या समवेत नेहमी चांगले संबंध ठेवून होता. या बरोबरच त्यांचे प्रतिस्पर्धी करीम लाला व वर्धाराजन यांच्यासोबत ही त्याने चांगले संबंध प्रस्थापित केले होते . असे सांगितले जाते की आणीबाणीच्या काळामध्ये हाजी मस्तान याला तुरुंगात पाठविण्यात आल्यानंतर तत्कालीन नेते जयप्रकाश नारायण यांच्याकडून प्रभावित होत , हाजी मस्तान याने हिंदी शिकण्यास सुरुवात केली होती . तुरुंगातून सुटल्यानंतर 1980च्या काळांमध्ये हाजी मस्तान यांनी राजकारणात प्रवेश करत स्वतःची दलित मुस्लीम सुरक्षा महासंघ अशा पक्ष काढला. याचं पुढे जाऊन नाव भारतीय मायनॉरिटी सुरक्षा महासंघ असं करण्यात आलं. 25 जून 1994 साली हाजी मस्तान यच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं


वर्धाराजन मुदलियार---


मुंबईतील व्हीकटोरिया टर्णिमस ज्यास आता छत्रपती शिवाजी महाराज टर्णिमस म्हणून ओळखले जाते या ठिकाणी सुरवातीला वर्धाराजन मुदलियार हा हमाल म्हणून काम करीत होता. तामिळनाडू येथील मद्रास ( आताचे चेन्नई ) मधील तुतिकोरिन या ठिकाणी 1926 मध्ये वर्धाराजन याचा जन्म झाला होता. अंडरवर्ल्ड मध्ये मोठे होण्यासाठी वर्धाराजन हा बिस्मिल्लाह शहा बाबा दर्ग्यावर नेहमी गरिबांना अन्नाचं वाटप करीत होता. मुंबईतील माटुंगा परिसर हा वर्धाराजन याचा बालेकिल्ला म्हणुन ओळखला जात होता. 1980 च्या काळात वर्धाराजन याच्या टोळीतील शेकडो जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती तर काही जणांचे एन्काऊंटर करण्यात आले होते. वर्धाराजन याने जुगाराचे अड्डे व अनधिकृत दारूचे अड्डे चालवून स्वतःचे मोठे बस्तान बसविले होते. यासाठी हाजी मस्तान याने त्यास मोठी मदत केली होती. मात्र पोलिसांच्या करवाईला कंटाळून त्याने मुंबई सोडून तामिळनाडू येथील त्याचे गाव गाठले होते. 2 जानेवारी 1988 रोजी वर्धाराजन याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मात्र मुंबईतच त्याच्यावर अंतिम संस्कार व्हावेत म्हणून वर्धाराजन याची इच्छा होती. या साठी स्वतः हाजी मस्तान याने चार्टर्ड विमानाणे त्याचे शव मुंबईतील माटुंगा येथे आणून त्यावर अंतिम संस्कार केले.
Last Updated : Jan 16, 2020, 11:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.