ETV Bharat / state

'आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी मोदींविरुद्ध कारवाईसाठी निवडणूक आयोगाच्या आदेशाची प्रतीक्षा'

योगी, मायावती, आजमखान, मेनका गांधी यांच्यावर आचारसंहिता भंगाबाबत कारवाई केली. त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निवडणूक आयोग कारवाई करणार का? याकडे आता सर्व देशाचे लक्ष लागले आहे.

author img

By

Published : Apr 19, 2019, 10:46 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीर शहीद भारतीय सैन्याच्या नावे मते मागितली. त्यामुळे आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मोदींवरील कारवाईसाठी निवडणूक आयोगाच्या आदेशाची प्रतिक्षा असल्याची माहिती अतिरिक्त निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली आहे.

उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील औसा येथील लोकसभा प्रचाराच्या जाहीर सभेत मोदी यांनी भाजप-शिवसेना युतीला मतदान करण्याचे आवाहन केले होते. 'आपका पहिला वोट पाकिस्तान के बालाकोट मे एअर स्ट्राईक करनेवाले वीर जवानो के नाम समर्पित हो सकता है क्या? आप का पहिला वोट पुलवामा मे जो वीर शहिद हुए है, उन वीर शहीदों के नाम समर्पित हो सकता है क्या?' असे मोदी प्रचार सभेत म्हणाले होते. त्यामुळे भारतीय जवानांच्या, सैन्याच्या नावावर मतदान मागितले. मोदींनी सैन्याच्या नावावर राजकारण केले असल्याचा आरोप अनेक स्तरावरून होत होता.

आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कारवाई करून गुन्हा नोंद करावा. तसेच त्यांच्यावर प्रचारबंदी घालण्यात यावी, अशी मागणीही केली जात आहे. एवढेच नाहीतर निवडणुक आयोगाने सैनिकांचा किंवा लष्कराचा वापर प्रचारात करू नका, अशा सूचना दिल्या आहेत. मात्र, मोदींनी बालाकोटमधील हवाई हल्ल्यासंदर्भात मते मागण्यासाठी केलेले विधान सकृतदर्शनी आचारसंहितेचा भंग आहे, असे उस्मानाबाद जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे.

राज्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालावर आपली प्रतिक्रिया जोडली. तसेच तो अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठविला असल्याचे दिलीप शिंदे यांनी सांगितले.

योगी, मायावती, आजमखान, मेनका गांधी यांच्यावर आचारसंहिता भंगाबाबत कारवाई केली. त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निवडणूक आयोग कारवाई करणार का? याकडे आता सर्व देशाचे लक्ष लागले आहे. एवढेच नाहीतर निवडणुक आयोगाने या चौघांवर तातडीने कारवाई केली. त्याचप्रमाणे तातडीने मोदी यांच्यावरही कारवाई व्हावी, अशा प्रतिक्रियाही सोशल मिडियावर उमटू लागल्या आहेत.

निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कोणतीही कारवाई केली अथवा त्यांना इशारा दिल्यास तो भाजपला मोठा धक्का ठरणार आहे. संपूर्ण निवडणुक प्रचाराला मोठी कलाटणी बसणार असल्याने आता निवडणूक आयोग काय निर्णय घेते? यावर निवडणुकीचे गणित अवलंबून आहे.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीर शहीद भारतीय सैन्याच्या नावे मते मागितली. त्यामुळे आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मोदींवरील कारवाईसाठी निवडणूक आयोगाच्या आदेशाची प्रतिक्षा असल्याची माहिती अतिरिक्त निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली आहे.

उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील औसा येथील लोकसभा प्रचाराच्या जाहीर सभेत मोदी यांनी भाजप-शिवसेना युतीला मतदान करण्याचे आवाहन केले होते. 'आपका पहिला वोट पाकिस्तान के बालाकोट मे एअर स्ट्राईक करनेवाले वीर जवानो के नाम समर्पित हो सकता है क्या? आप का पहिला वोट पुलवामा मे जो वीर शहिद हुए है, उन वीर शहीदों के नाम समर्पित हो सकता है क्या?' असे मोदी प्रचार सभेत म्हणाले होते. त्यामुळे भारतीय जवानांच्या, सैन्याच्या नावावर मतदान मागितले. मोदींनी सैन्याच्या नावावर राजकारण केले असल्याचा आरोप अनेक स्तरावरून होत होता.

आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कारवाई करून गुन्हा नोंद करावा. तसेच त्यांच्यावर प्रचारबंदी घालण्यात यावी, अशी मागणीही केली जात आहे. एवढेच नाहीतर निवडणुक आयोगाने सैनिकांचा किंवा लष्कराचा वापर प्रचारात करू नका, अशा सूचना दिल्या आहेत. मात्र, मोदींनी बालाकोटमधील हवाई हल्ल्यासंदर्भात मते मागण्यासाठी केलेले विधान सकृतदर्शनी आचारसंहितेचा भंग आहे, असे उस्मानाबाद जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे.

राज्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालावर आपली प्रतिक्रिया जोडली. तसेच तो अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठविला असल्याचे दिलीप शिंदे यांनी सांगितले.

योगी, मायावती, आजमखान, मेनका गांधी यांच्यावर आचारसंहिता भंगाबाबत कारवाई केली. त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निवडणूक आयोग कारवाई करणार का? याकडे आता सर्व देशाचे लक्ष लागले आहे. एवढेच नाहीतर निवडणुक आयोगाने या चौघांवर तातडीने कारवाई केली. त्याचप्रमाणे तातडीने मोदी यांच्यावरही कारवाई व्हावी, अशा प्रतिक्रियाही सोशल मिडियावर उमटू लागल्या आहेत.

निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कोणतीही कारवाई केली अथवा त्यांना इशारा दिल्यास तो भाजपला मोठा धक्का ठरणार आहे. संपूर्ण निवडणुक प्रचाराला मोठी कलाटणी बसणार असल्याने आता निवडणूक आयोग काय निर्णय घेते? यावर निवडणुकीचे गणित अवलंबून आहे.

Intro:Body:MH_EC_MCC_ModiSpeech19.4.19

मोदींवरील कारवाईसाठी आयोगाच्या आदेशाची प्रतिक्षा

मुंबई : वीर शहीद भारतीय सैन्याच्या नावे मतदान मागून व त्याचे राजकारण करून आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कारवाईसाठी निवडणुक आयोगाकडून आदेशाची प्रतिक्षा असल्याचे अतिरिक्त निवडणुक अधिकारी दिलीप शिंदे यांनी म्हटलं आहे.


9 एप्रिल रोजी उस्मानाबाद व औसा लोकसभा प्रचाराच्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेने भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीला मतदान करण्याचे आव्हान केले . पंतप्रधान म्हणाले की, आपका पहिला वोट पाकीस्तान के बालाकोट मे एअर स्ट्राईक करनेवाले वीर जवानो के नाम समर्पित हो सकता है क्या, आप का पहिला वोट पुलगामा मे जो वीर शहिद हुवे है उन वीर शहीदों के नाम आप का वोट समर्पित हो सकता है क्या ? असे म्हणून वीर शहीद भारतीय जवान सैन्यांच्या नावावर मतदान मागितले आणि भारत देशाच्या शहीद जवानाच्या नावाचा व कार्याचा वापर करून नियमाचे उल्लंघन केले आहे. सैन्यांच्या नावावर राजकारण करणार्या नरेंद्र मोदी यांच्यावर
आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कारवाई करून गुन्हा नोंद करावा व नरेंद्र मोदी यांच्यावर प्रचारबंदी घालून यापुढे प्रचार करण्यास कायमस्वरूपी बंदी घालावी अशी मागणी केली आहे .

निवडणुक आयोगाने सैनिकांचा किंवा लष्कराचा प्रचारात वापर करु नका, अशा सूचना दिल्या आहेत. औसा येथे झालेल्या सभेमध्ये बालाकोटमधील हवाई हल्ल्यासंदर्भात मत मागितल्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले विधान सकृतदर्शनी आचारसंहिता भंग आहे, असे उस्मानाबाद जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांनी निवडणुक आयोगाकडे सादर केलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे.

निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांनी आपले मत बालाकोटमध्ये हल्ला करणाऱ्यांना आणि पुलवामामध्ये हुतात्मा झालेल्या जवानांना समर्पित करावे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औसा येथील सभेत केले होते. त्यांच्या या विधानामुळे आचारसंहितेचा भंग झाला असल्याचे निवडणुक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र मुख्य निर्णय अधिकारी यांना अहवाल पाठविला आहे. राज्य निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालावर आपली प्रतिक्रिया जोडून तो अहवाल निवडणुक आयोगाकडे पाठविला आहे, असं दिलीप शिंदे म्हणाले. त्यावर आता निवडणुक आयोगाने निर्णय घ्यायचा आहे.

ज्या प्रमाणे योगी, मायावती, आजमखान, मेनका गांधी यांना आचारसंहिता भंगाबाबत कारवाई केली. त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निवडणुक आयोग कारवाई करणार का, याकडे आता सर्व देशाचे लक्ष लागले आहे.

निवडणुक आयोगाने या चौघांवर ज्या प्रमाणे तातडीने कारवाई केली. तशीच तातडीने मोदी यांच्यावरही कारवाई व्हावी, अशा प्रतिक्रिया सोशल मिडियावर उमटू लागल्या आहेत.

निवडणुक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कोणतीही कारवाई केली अथवा त्यांना इशारा दिला तरी तो भाजपाला मोठा धक्का ठरणार आहे. संपूर्ण निवडणुक प्रचाराला मोठी कलाटणी बसणार असल्याने आता निवडणुक आयोग काय निर्णय घेते, यावर निवडणुकीचे गणित अवलंबून आहे.




Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.