ETV Bharat / state

लातूरच्या माकणीत वीज कोसळून महिलेचा मृत्यू

लातूरच्या माकणीत बुधवारी दुपारी अंगावर वीज पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अरुणाबाई बाबुराव पाटील (वय ५५) असे मृत महिलेचे नाव आहे.

author img

By

Published : Oct 31, 2019, 4:25 AM IST

Updated : Oct 31, 2019, 7:06 AM IST

लातूरच्या माकणीत वीज कोसळून महिलेचा मृत्यू

लातूर - बुधवारी दुपारच्या सुमारास देवणी तालुक्यातील माकणी येथे अंगावर वीज पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अरुणा बाबुराव पाटील (वय ५५) असे मृत महिलेचे नाव आहे.

हेही वाचा - नागपूर: पाणीपुरी विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला, संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडिओ व्हायरल

परतीच्या पावसाने लातूर जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मिटला असला तरी खरीपातील सोयाबीन आणि इतर पिकांचे नुकसान होत आहे. बुधवारी अरुणा पाटील शेताकडे जनावरे घेऊन गेल्या होत्या. दुपारी 4 च्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटसह पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, जनावरे गोठ्याकडे घेऊन येत असताना त्यांच्या अंगावर वीज पडली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात तीन मुली, पती असा परिवार आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात त्यांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

लातूर - बुधवारी दुपारच्या सुमारास देवणी तालुक्यातील माकणी येथे अंगावर वीज पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अरुणा बाबुराव पाटील (वय ५५) असे मृत महिलेचे नाव आहे.

हेही वाचा - नागपूर: पाणीपुरी विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला, संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडिओ व्हायरल

परतीच्या पावसाने लातूर जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मिटला असला तरी खरीपातील सोयाबीन आणि इतर पिकांचे नुकसान होत आहे. बुधवारी अरुणा पाटील शेताकडे जनावरे घेऊन गेल्या होत्या. दुपारी 4 च्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटसह पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, जनावरे गोठ्याकडे घेऊन येत असताना त्यांच्या अंगावर वीज पडली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात तीन मुली, पती असा परिवार आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात त्यांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Intro:मकणीत वीज कोसळून महिलेचा मृत्यू
लातूर : गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस होत आहे. बुधवारी देवणी तालुक्यातील माकणी येथे सायंकाळी शेतामध्ये काम करीत असताना अचानक विजेचा कडकडाटसह पावसाला सुरुवात झाली. यामध्ये वीज अंगावर पडून अरुणाबाई पाटील यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Body:जिल्ह्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मिटला असला तरी या पावसाने खरिपातील सोयाबीन आणि इतर पिकांचे नुकसान होत आहे. बुधवारी अरुणाबाई ह्या शेताकडे जनावरे घेऊन गेल्या होत्या. अचानक दुपारी 4 च्या सुमारस विजेचा कडकडाट आणि पावसाला सुरुवात झाली. जनावरे गोठ्याककडे घेऊन येत असताना त्यांच्या अंगावर वीज पडली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अरुणाबाई बाबुराव पाटील या 55 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुली, पती असा परिवार आहे.Conclusion: ऐन सणासुदीत त्यांच्या जाण्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
Last Updated : Oct 31, 2019, 7:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.