ETV Bharat / state

लातुरात पाणीप्रश्न पेटला : विरोधकांची आंदोलने तर सत्ताधाऱ्यांची सावरासावर

author img

By

Published : Feb 24, 2020, 4:56 PM IST

महानगरपालिकेची महावितरणेकडे कोट्यवधीची थकबाकी आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण घरावरील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. गेल्या १५ दिवसांपासून शहरातील कोणत्याही भागाला पाणी पुरवठा न झाल्याने आता विरोधक आक्रमक झाले आहेत.

लातुरात पाणीप्रश्न पेटला
लातुरात पाणीप्रश्न पेटला

लातूर - लातूर आणि पाणी प्रश्न हे जणू समीकरणच बनले आहे. पावसाच्या कृपेमुळे लातूरकरांना १० दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे. मात्र यातही आता महापालिकेचे महाविरतणकडे वीजबिल थकीत राहिल्याने विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असून गेल्या १५ दिवसांपासून लातूर शहर निर्जळी आहे. यामुळे पाणी प्रश्नाला घेऊन विरोधक आक्रमक झाले आहेत, तर सत्ताधारी काँग्रेस सावरासावर करत आहेत.

लातुरात पाणीप्रश्न पेटला

महानगरपालिकेची महावितरणेकडे कोट्यवधीची थकबाकी आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण घरावरील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. गेल्या १५ दिवसांपासून शहरातील कोणत्याही भागाला पाणी पुरवठा न झाल्याने आता विरोधक आक्रमक झाले आहेत. शनिवारी हाच पाणीप्रश्न घेऊन मनसेच्यावतीने महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर कोरडी आंघोळ करण्यात आली होती. तर, आज भाजपच्या नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या पायरीवर बसून आंदोलन केले.

हेही वाचा - दुष्काळात तेरावा! पालिकेकडे पैसे नसल्याने पंधरा दिवसांपासून लातूरचे पाणी बंद!

विकासाच्या गप्पा मारणारे सत्ताधारी मूलभूत प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप यावेळी नगरसेवकांनी केला आहे. तर भाजपच्या काळातच थकबाकी वाढल्याचे काँग्रेसकडून सांगितले जात आहे. मात्र, या आरोप-प्रत्यारोपांमध्ये लातूरकरांचे हाल होत आहेत. सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी मनपाला किमान एका महिन्याचे बिल अदा करावे लागणार आहे. सध्या मनपाच्या तिजोरीत केवळ ४५ लाख रुपये असून महिन्याचे बिल ७५ लाख रुपये महावितरणला अदा करावे लागणार आहे. नैसर्गिक पाणीटंचाईला लातूरकर सामोरे जात असतानाच आता सुलतानी संकटही उभे येऊन ठाकले आहे. त्यामुळे हा पाणी प्रश्न त्वरित मार्गी लागावा अशी अपेक्षा लातूरकर व्यक्त करीत आहेत.

हेही वाचा - लातुरचा पाणीपुरवठा बंद... कोरड्या आंघोळीने मनसेने केला निषेध

लातूर - लातूर आणि पाणी प्रश्न हे जणू समीकरणच बनले आहे. पावसाच्या कृपेमुळे लातूरकरांना १० दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे. मात्र यातही आता महापालिकेचे महाविरतणकडे वीजबिल थकीत राहिल्याने विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असून गेल्या १५ दिवसांपासून लातूर शहर निर्जळी आहे. यामुळे पाणी प्रश्नाला घेऊन विरोधक आक्रमक झाले आहेत, तर सत्ताधारी काँग्रेस सावरासावर करत आहेत.

लातुरात पाणीप्रश्न पेटला

महानगरपालिकेची महावितरणेकडे कोट्यवधीची थकबाकी आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण घरावरील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. गेल्या १५ दिवसांपासून शहरातील कोणत्याही भागाला पाणी पुरवठा न झाल्याने आता विरोधक आक्रमक झाले आहेत. शनिवारी हाच पाणीप्रश्न घेऊन मनसेच्यावतीने महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर कोरडी आंघोळ करण्यात आली होती. तर, आज भाजपच्या नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या पायरीवर बसून आंदोलन केले.

हेही वाचा - दुष्काळात तेरावा! पालिकेकडे पैसे नसल्याने पंधरा दिवसांपासून लातूरचे पाणी बंद!

विकासाच्या गप्पा मारणारे सत्ताधारी मूलभूत प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप यावेळी नगरसेवकांनी केला आहे. तर भाजपच्या काळातच थकबाकी वाढल्याचे काँग्रेसकडून सांगितले जात आहे. मात्र, या आरोप-प्रत्यारोपांमध्ये लातूरकरांचे हाल होत आहेत. सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी मनपाला किमान एका महिन्याचे बिल अदा करावे लागणार आहे. सध्या मनपाच्या तिजोरीत केवळ ४५ लाख रुपये असून महिन्याचे बिल ७५ लाख रुपये महावितरणला अदा करावे लागणार आहे. नैसर्गिक पाणीटंचाईला लातूरकर सामोरे जात असतानाच आता सुलतानी संकटही उभे येऊन ठाकले आहे. त्यामुळे हा पाणी प्रश्न त्वरित मार्गी लागावा अशी अपेक्षा लातूरकर व्यक्त करीत आहेत.

हेही वाचा - लातुरचा पाणीपुरवठा बंद... कोरड्या आंघोळीने मनसेने केला निषेध

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.