ETV Bharat / state

संभाजी ब्रिगेडने वामन पुतळा जाळून राजकीय पुढाऱ्यांचा केला निषेध

काढणीला आलेले खरीपाचे पीक परतीच्या पावसाने हिरावून नेले. याबाबत जिल्ह्यातील एकाही नेत्याने आवाज उठवला नाही. लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील आणि जिल्ह्याचे करते-धरते आम्हीच म्हणून मिरवणारे आमदार अमित देशमुख यांनीही शासन दरबारी शेतकऱ्यांचा प्रश्न मांडलेला नाही.

author img

By

Published : Oct 29, 2019, 5:18 PM IST

संभाजी ब्रिगेड

लातूर - नैसर्गिक आपत्ती आणि महागाईमुळे राज्यात अनेक ठिकाणी बळीराजाने दिवाळी साजरी केली नाही. मात्र, राजकीय नेते सत्ता संघर्ष आणि खुर्चीच्या मागे लागले आहेत. संभाजी ब्रिगेडने याचा निषेध व्यक्त करत लातूर शहरातील शिवाजी चौकात वामन पुतळा दहन केला.

संभाजी ब्रिगेडने वामनाचा पुतळा जाळून राजकीय पुढाऱ्यांचा निषेध केला


संभाजी ब्रिगेडने दिवाळी पाडव्याच्या दिवशी 'ईडा पिडा टळो बळीचे राज्य येवो', अशा घोषणा दिल्या. सोबतच हलगी वाजवत शहरातून मिरवणूक काढली. सध्या राज्यासह लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत राजकीय पुढाऱ्यांचे सत्तेच्या लालसेपोटी शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईकडे लक्षच नाही.

हेही वाचा - ...अखेर कुटुंबीयांच्या आदोलनानंतर अधिकारी निलंबीत, डीसीपी सौरभ त्रिपाठींचे आदेश


काढणीला आलेले खरीपाचे पीक परतीच्या पावसाने हिरावून नेले. याबाबत जिल्ह्यातील एकाही नेत्याने आवाज उठवला नाही. लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील आणि जिल्ह्याचे करते-धरते आम्हीच म्हणून मिरवणारे आमदार अमित देशमुख यांनीही शासन दरबारी शेतकऱ्यांचा प्रश्न मांडलेला नाही. शेतकऱ्यांच्या घरी दिवाळी साजरी झाली नाही. विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले नवनिर्वाचित आमदार मात्र सत्कार घेत मिरवत आहेत, असे आरोप संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष अनिल जाधव यांनी केला.

लातूर - नैसर्गिक आपत्ती आणि महागाईमुळे राज्यात अनेक ठिकाणी बळीराजाने दिवाळी साजरी केली नाही. मात्र, राजकीय नेते सत्ता संघर्ष आणि खुर्चीच्या मागे लागले आहेत. संभाजी ब्रिगेडने याचा निषेध व्यक्त करत लातूर शहरातील शिवाजी चौकात वामन पुतळा दहन केला.

संभाजी ब्रिगेडने वामनाचा पुतळा जाळून राजकीय पुढाऱ्यांचा निषेध केला


संभाजी ब्रिगेडने दिवाळी पाडव्याच्या दिवशी 'ईडा पिडा टळो बळीचे राज्य येवो', अशा घोषणा दिल्या. सोबतच हलगी वाजवत शहरातून मिरवणूक काढली. सध्या राज्यासह लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत राजकीय पुढाऱ्यांचे सत्तेच्या लालसेपोटी शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईकडे लक्षच नाही.

हेही वाचा - ...अखेर कुटुंबीयांच्या आदोलनानंतर अधिकारी निलंबीत, डीसीपी सौरभ त्रिपाठींचे आदेश


काढणीला आलेले खरीपाचे पीक परतीच्या पावसाने हिरावून नेले. याबाबत जिल्ह्यातील एकाही नेत्याने आवाज उठवला नाही. लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील आणि जिल्ह्याचे करते-धरते आम्हीच म्हणून मिरवणारे आमदार अमित देशमुख यांनीही शासन दरबारी शेतकऱ्यांचा प्रश्न मांडलेला नाही. शेतकऱ्यांच्या घरी दिवाळी साजरी झाली नाही. विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले नवनिर्वाचित आमदार मात्र सत्कार घेत मिरवत आहेत, असे आरोप संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष अनिल जाधव यांनी केला.

Intro:दिवाळीसारखा सन महागाई बेकारी यामुळे आज बळीराजा साजरा करत आणि नाही राजकीय नेते सत्ता संघर्ष खुर्ची लालसेच्या मागे लागले आहेत याचा निषेध करत आज शहरातील शिवाजी चौकात वामन पुतळा दहन करत संभाजी ब्रिगेडने निषेध व्यक्त केला.. Body:ईडा पिडा टळो बळीच राज्य येओ म्हणत संभाजी ब्रिगेडने निलंगा येथिल चौकात वामनाचा पुतळा जाळला.....

निलंगा/प्रतिनिधी

संभाजी ब्रिगेडच्या वतीने दिवाळीच्या पाडव्या दिवशी ईडा पिडा टळो बळीचे राज्य येओ अशा घोषणा देत हालगी वाजवत शहरात मिरवणूक काढली व वामनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले....

सध्या राज्यासह लातूर उस्मानाबाद बिड नांदेड जिल्ह्यातील ब-याच बागात दुष्काळी परिस्थिती आहे अनेक भागात पाऊस कमी प्रमाणात पडला असून खरीप काही प्रमाणात आला माञ येणारी रबी ही मोठ्या संकटात आहे राजकीय पुढारी सत्ता खुर्ची लालसेपोटी शेतकरी नुकसानभरपाई कडे लक्ष देत नाहीत हातातोंडाशी आलेला खरीपाचा घास परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या थोंडातून हिरावून घेतला आहे परंतू या जिल्ह्यातील एकाही नेत्याने या विषयी आवाज उठवला नाही लातूरचे पालकमंञी संभाजीराव पाटील असतील किंवा जिल्ह्याचे करतेधरते आम्हीच म्हणून मिरवणारे आमदार अमित देशमुख यांनी अद्यापही शासन दरबारी आवाज उठवला नाही बळीराजा वर्षातला सर्वात मोठा सन दिवाळी न करता शेतात जे उरले सुरले पिके काढण्यासाठी तारावरची कसरत करत आहे अनेक शेतकऱ्यांच्या घरी तर दिवाळीच साजरी झाली नाही पण गेल्या आठवड्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले नवनिर्वाचित आमदार माञ हळद लावलेल्या नवरदेवा प्रमाण सत्कार घेत मिरवत आहेत एकीकडे सनासुदीत बळीराजा उपाशी मरतोय अन हे सत्कार घेत फिरत आहेत असा निषेद व्यक्त करत संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष अनिल जाधव व त्यांच्या सर्व पदाधिका-यानी आज निलंगा शहरातील छञपती शिवाजी महाराज चौकात वामन दहन करत निष्क्रिय सरकारचा व शासनाचा निषेध केला बळीराजाला आनंदाचे सुखाचे दिवस येण्यासाठी वामन दहन केल्याचे सांगितलेConclusion:यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने शहरात वामनाच्या पुतळ्याची हालगी वाजवत घोषणा देत मिरवणूक काढण्यात आली यावेळी संभाजी ब्रिगेडचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.