ETV Bharat / state

लातूरमध्ये वाढत्या उन्हामुळे मतांचा टक्का घसरला ; दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत केवळ १२ टक्केच मतदान

author img

By

Published : Apr 18, 2019, 6:24 PM IST

Updated : Apr 18, 2019, 8:52 PM IST

लातूरमध्ये वाढत्या उन्हामुळे मतांचा टक्का घसरला आहे.

मतदान केंद्र

लातूर - लोकसभा मतदार संघासाठी आज मतदान पार पडत आहे. मात्र, वाढत्या उन्हामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम झाला आहे. दुपारी १ वाजेपर्यंत ३४ टक्के तर ४ वाजेपर्यंत ४५ टक्के मताची टक्केवारी होती. त्यामुळे ३ तासांमध्ये केवळ १२ टक्के मतदान झाले असल्याचे दिसत आहे.

मतदान केंद्र

लातुरकरांनी सकाळी मतदान केंद्रांवर गर्दी केली होती. त्यामुळे ग्रामीण भागात मतांचा टक्का वाढला होता. मात्र, दुपारी १ नंतर पारा ४० अंश सेल्सिअसवर गेल्याने मतदान केंद्रांवर कमालीचा शुकशुकाट पाहायला मिळाला. शिवाय काही ठिकाणी मतदारांचे नाव यादीत नसल्याने त्यांची तारांबळ उडाली. या मतदार संघात एकूण मतदार संख्या १८ लाख ८३ हजार ५३५ असून दुपारी साडे चारपर्यंत ८३ हजार ६०५ मतदारांनी आपला हक्क बजावला होता. शिवाय सकाळच्या तुलनेत मतदान कमी झाले असून आता ५ वाजेनंतर पुन्हा मतदान प्रक्रियेला वेग येईल, अशी आशा आहे.

ज्या गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला. त्याठिकाणी जिल्हाधिकारी जी श्रीकांत तसेच निवडणूक निर्णय अधिकारी हे नागरिकांची मनधरणी करत आहेत. मताचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन गावोगावी फिरत आहेत. त्यामुळे याचा काय परिणाम होईल हे ६ वाजल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

लातूर - लोकसभा मतदार संघासाठी आज मतदान पार पडत आहे. मात्र, वाढत्या उन्हामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम झाला आहे. दुपारी १ वाजेपर्यंत ३४ टक्के तर ४ वाजेपर्यंत ४५ टक्के मताची टक्केवारी होती. त्यामुळे ३ तासांमध्ये केवळ १२ टक्के मतदान झाले असल्याचे दिसत आहे.

मतदान केंद्र

लातुरकरांनी सकाळी मतदान केंद्रांवर गर्दी केली होती. त्यामुळे ग्रामीण भागात मतांचा टक्का वाढला होता. मात्र, दुपारी १ नंतर पारा ४० अंश सेल्सिअसवर गेल्याने मतदान केंद्रांवर कमालीचा शुकशुकाट पाहायला मिळाला. शिवाय काही ठिकाणी मतदारांचे नाव यादीत नसल्याने त्यांची तारांबळ उडाली. या मतदार संघात एकूण मतदार संख्या १८ लाख ८३ हजार ५३५ असून दुपारी साडे चारपर्यंत ८३ हजार ६०५ मतदारांनी आपला हक्क बजावला होता. शिवाय सकाळच्या तुलनेत मतदान कमी झाले असून आता ५ वाजेनंतर पुन्हा मतदान प्रक्रियेला वेग येईल, अशी आशा आहे.

ज्या गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला. त्याठिकाणी जिल्हाधिकारी जी श्रीकांत तसेच निवडणूक निर्णय अधिकारी हे नागरिकांची मनधरणी करत आहेत. मताचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन गावोगावी फिरत आहेत. त्यामुळे याचा काय परिणाम होईल हे ६ वाजल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

Intro:लातूर : लातूर लोकसभा मतदार संघासाठी आज मतदान पार पडत असून बदलत्या वातावरणाचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे. दुपारी 1 पर्यंत 34 टक्के तर 4 पर्यंत 45 टक्के मताची टक्केवारी होती. त्यामुळे 3 तासमध्ये केवळ 12 टक्के मतदान झाले असल्याचे दिसून येत आहे.


Body:लातूरकरांनी सकाळच्या प्रहरी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. ग्रामीण भागातही मताचा टक्का वाढला होता. मात्र दुपारी1 नंतर पारा 40 अंश सेल्सिअस वर गेल्याने मतदान केंद्रावर कमालीचा शुकशुकाट पाहवयास मिळत होता. शिवाय काही ठिकाणी मतदारांचे नाव यादीत नसल्याने त्यांची तारांबळ उडाली होती. एकूण मतदार संख्या 18 लाख 83 हजार 535 असून दुपारी साडे चारपर्यंत 83 हजार 605 मतदारांनी आपला हक्क बजावला होता. शिवाय सकाळच्या तुलनेत मतदान कमी झाले असून आता 5 नंतर पुन्हा मतदान प्रक्रियेला वेग येईल असा आशावाद व्यक्त होत आहे.


Conclusion:ज्या गावानी मतदानावर बहिष्कार टाकला होता त्याठिकाणी जिल्हाधिकारी जी श्रीकांत तसेच निवडणूक निर्णय अधिकारी हे नागरिकांची मनधरणी करीत आहेत. मताचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन गावोगावी फिरत असून याचा काय परिणाम होईल हे 6 नंतरच स्पष्ट होणार आहे. ग्रामीण भागात अधिकचे मतदान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
Last Updated : Apr 18, 2019, 8:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.