ETV Bharat / state

वानराच्या मृत्यूने 'आनंद'वाडी शोकाकुल ; अंत्यविधीनंतरच पेटल्या चुली

वानर हा हनुमानाचा अवतार असतो, अशी गावकऱ्यांची श्रद्धा असते. त्यातच त्याचा मृत्यू शनिवारी झाल्याने त्याच्यावर विधीवत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला.

author img

By

Published : Mar 4, 2019, 7:15 PM IST

वानर अंत्यसंस्कार

लातूर - विजेच्या धक्क्याने एक वानर लातूर जिल्ह्यतील आनंदवाडी येथे मृत्युमुखी पडले होते. वानराच्या मृत्युमुळे आनंदवाडीतील ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली. दिवसभर गावातील एकही चूल पेटली नाही. वानरावर अंत्यसंस्कार करुन ग्रामस्थांनी त्याला निरोप दिला. वानराविषयी संवेदनशीलता दाखविल्याने आनंदवाडीकर जिल्ह्यात सर्वांच्या कौतुकास पात्र ठरले आहेत.


अहमदपूर तालुक्यातील आनंदवाडी हे एक ते दीड हजार लोकवस्ती असलेले गाव. शनिवारी पाण्याच्या शोधात गाव शिवारात घुसलेल्या एका वानराचा विज तारेच्या धक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने आनंदवाडीचे वातावरण शोकाकुल झाले. येथील ग्रामस्थांनी त्या मृत वानराला बैलगाडीत घालून थेट गावातील हनुमान मंदीर परिसरात आणले. शनिवार आणि हनुमानाचे वंशज समजले जाणाऱ्या वानराचा मृत्यू यामुळे वानराला कुठे टाकून न देता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला.


अंत्यदर्शनासाठी वानराचा मृतदेह मारुती मंदिराच्या समोर ठेवण्यात आले. गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने अंत्यदर्शन घेतले. भजनी मंडळींनी भजन करुन वानराला आदरांजली वाहिली. त्यानंतर मारुती मंदिराच्या परिसरात खड्डा खोदून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लातूर - विजेच्या धक्क्याने एक वानर लातूर जिल्ह्यतील आनंदवाडी येथे मृत्युमुखी पडले होते. वानराच्या मृत्युमुळे आनंदवाडीतील ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली. दिवसभर गावातील एकही चूल पेटली नाही. वानरावर अंत्यसंस्कार करुन ग्रामस्थांनी त्याला निरोप दिला. वानराविषयी संवेदनशीलता दाखविल्याने आनंदवाडीकर जिल्ह्यात सर्वांच्या कौतुकास पात्र ठरले आहेत.


अहमदपूर तालुक्यातील आनंदवाडी हे एक ते दीड हजार लोकवस्ती असलेले गाव. शनिवारी पाण्याच्या शोधात गाव शिवारात घुसलेल्या एका वानराचा विज तारेच्या धक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने आनंदवाडीचे वातावरण शोकाकुल झाले. येथील ग्रामस्थांनी त्या मृत वानराला बैलगाडीत घालून थेट गावातील हनुमान मंदीर परिसरात आणले. शनिवार आणि हनुमानाचे वंशज समजले जाणाऱ्या वानराचा मृत्यू यामुळे वानराला कुठे टाकून न देता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला.


अंत्यदर्शनासाठी वानराचा मृतदेह मारुती मंदिराच्या समोर ठेवण्यात आले. गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने अंत्यदर्शन घेतले. भजनी मंडळींनी भजन करुन वानराला आदरांजली वाहिली. त्यानंतर मारुती मंदिराच्या परिसरात खड्डा खोदून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Intro:वानराच्या मृत्यूने 'आनंद'वाडी शोकाकुल ; अंत्यविधीनंतरच पेटल्या चुली
लातूर - एकीकडे जंगली पशु-पक्षासह पाळीव प्राण्याशी माणूस निर्दयीपणे वागत असताना दुसरीकडे लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी येथील ग्रामस्थांनी जंगली प्राण्याविषयी दाखवून दिलेल्या संवेदशिलतेने एक नवा आदर्श घालून दिला आहे. विजेच्या धक्याने मृत्यूमुखी झालेल्या वानराचे विधीवत अंत्यसंस्कार करून त्याला अखेरचा निरोप दिला. एवढेच नव्हे तर शोकाकुल आनंदवाडीत अंत्यविधीनंतरच चुली पेटल्या हे विशेष.
Body:अहमदपूर तालुक्यातील आनंदवाडी हे एक ते दीड हजार लोकवस्ती असलेले गाव. शनिवारी पाण्याच्या शोधात गाव शिवारात घुसलेल्या एका वानराचा विज तारेच्या धक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने आनंदवाडी परिसरात सर्वत्र वातावरण शोकाकुल झाले. येथील ग्रामस्थांनी त्या मृत वानराला बैलगाडीत घालून थेट गावातील हनुमान मंदीर परिसरात आणले. ऐन शनिवार आणि हनुमानाचे वंशज समजले जाणाऱ्या वानराचा मृत्यू यामुळे वानराला कुठे टाकुन ने देता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्धार गावकर्यांनी घेतला. त्यानंतर सर्व कार्यक्रम विधिवत पार पाडण्याचे निश्चित झाले. मृत वानराला हनुमान मंदिर परीसरात आणल्याची वार्ता सबंध गावभर पसरली आणि अवघ्या काही वेळातच गावकर्यांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली व वानरांचे अंत्यदर्शन घेतले. मंदीराच्या परिसरातच वानराच्या अंत्यसंस्कारची तयारी सुरू होती. याच दरम्यान मंदिरात भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. गावातील स्त्री- परुष व आबालवृद्धांनी वानराचे दर्शन घेतले व त्यानंतर हनुमान मंदिराच्या परिसरातच खड्डा खोदून अंत्यसंस्कार करण्यात आले.
वानराच्या मृत्यूमुळे शोकाकुल आनंदवाडी गावात शनिवारी एकही चूल पेटली नाही. Conclusion:वानराला शेवटचा निरोप दिल्यानंतर गावातील चुली पेटल्या.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.