ETV Bharat / state

शेतकऱ्यांचे पिकविम्यासाठी रास्तारोको आंदोलन, मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा

author img

By

Published : Sep 19, 2019, 7:32 PM IST

लातूर जिल्ह्यातील शेतकरी भर पावसाळ्यात दुष्काळाशी सामना करत आहेत. त्यातच गतवर्षीच्या खरीप पीक विम्याची रक्कम अजूनही शेतकऱ्यांच्या पदरी पडलेली नाही. यंदाचाही खरीप विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन आज लातूर-बार्शी रोडवरील गाधवड येथील चौकामध्ये रास्तारोको करण्यात आला होता.

शेतकऱ्यांचे पिकविम्यासाठी रास्तारोको आंदोलन

लातूर - जिल्ह्यातील गाधवड ग्रामस्थांनी पिकविमा मिळण्याच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन केले. प्रश्न मार्गी न लागल्यास येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. ग्रामस्थांच्या या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचाही पाठिंबा होता.

शेतकऱ्यांचे पिकविम्यासाठी रास्तारोको आंदोलन

जिल्ह्यातील शेतकरी भर पावसाळ्यात दुष्काळाशी सामना करत आहे. त्यातच गतवर्षीच्या खरीप पीक विम्याची रक्कम अजूनही शेतकऱ्यांच्या पदरी पडलेली नाही. यंदाचाही खरीप विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन आज लातूर-बार्शी रोडवरील गाधवड येथील चौकामध्ये रास्तारोको करण्यात आला होता. छावणी नाहीतर जिल्हा प्रशासनाने दावणीला चारा द्यावा, पावसाअभावी खरीप हंगामाचे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई द्यावी, गतवर्षीची पीकविमा रक्कम त्वरित खात्यावर जमा करावी. तसेच चालू खरीप पीक विमाही देण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सत्तार पटेल यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

शेतकरी बैलगाडी, जनावरे घेऊन या रास्तारोकोमध्ये सहभागी झाले होते. तब्बल दोन हे आंदोलन चालले. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीतील मतदानावर तांदुळजा मंडळातील सर्व गावातील शेतकरी बहिष्कार टाकतील. शिवाय नेतेमंडळीला गावबंदी करतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण कुलकर्णी उपस्थित होते.

लातूर - जिल्ह्यातील गाधवड ग्रामस्थांनी पिकविमा मिळण्याच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन केले. प्रश्न मार्गी न लागल्यास येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. ग्रामस्थांच्या या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचाही पाठिंबा होता.

शेतकऱ्यांचे पिकविम्यासाठी रास्तारोको आंदोलन

जिल्ह्यातील शेतकरी भर पावसाळ्यात दुष्काळाशी सामना करत आहे. त्यातच गतवर्षीच्या खरीप पीक विम्याची रक्कम अजूनही शेतकऱ्यांच्या पदरी पडलेली नाही. यंदाचाही खरीप विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन आज लातूर-बार्शी रोडवरील गाधवड येथील चौकामध्ये रास्तारोको करण्यात आला होता. छावणी नाहीतर जिल्हा प्रशासनाने दावणीला चारा द्यावा, पावसाअभावी खरीप हंगामाचे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई द्यावी, गतवर्षीची पीकविमा रक्कम त्वरित खात्यावर जमा करावी. तसेच चालू खरीप पीक विमाही देण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सत्तार पटेल यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

शेतकरी बैलगाडी, जनावरे घेऊन या रास्तारोकोमध्ये सहभागी झाले होते. तब्बल दोन हे आंदोलन चालले. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीतील मतदानावर तांदुळजा मंडळातील सर्व गावातील शेतकरी बहिष्कार टाकतील. शिवाय नेतेमंडळीला गावबंदी करतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण कुलकर्णी उपस्थित होते.

Intro:बाईट : सत्तार पटेल ( प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना)

'स्वाभिमानी' चा निर्धार : .. अन्यथा तांदुळजा मंडळातील शेतकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार
लातूर : निवडणुकीच्या तोंडावर त्रस्त ग्रामस्थांकडून मतदानावर बहिष्काराचे अस्त्र बाहेर काढले जात आहे. अनेक वेळा रस्त्याचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न घेऊन ग्रामस्थ रस्त्यावर उतरतात मात्र, लातूर तालुक्यातील गाधवड ग्रामस्थांनी पीकविमा मिळावा याकरिता केलेल्या रास्तारोको मध्ये प्रश्न मार्गी न लागल्यास आगामी विधानसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. ग्रामस्थांच्या या रास्तारोकोमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघनेचाही पाठींबा होता. Body:जिल्ह्यातील शेतकरी भर पावसाळ्यात दुष्काळाशी सामना करीत आहे. यातच गतवर्षीच्या खरीप पीक विम्याची रक्कम अजूनही शेतकऱ्यांच्या पदरी पडलेली नाही तर यंदाचाही खरीप विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन आज लातूर - बार्शी रोडवरील गाधवड येथील चौकामध्ये रास्ता रोको करण्यात आला होता. छावणी नाही तर जिल्हा प्रशासनाने दावणीला चारा द्यावा, पावसाअभावी खीर हंगामाचे नुकसान झाले असून त्याची भरपाई द्यावी, गतवर्षीचा पीक विमा रक्कम त्वरित खात्यावर अदा करावी तसेच चालू खरीप पीक विमाही देण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सत्तर पटेल यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती. शेतकरी बैलगाडी, जनावरे घेऊन या रास्तारोको मध्ये सहभागी झाले होते. दोन तास रास्ता रोको केल्याने या मार्गवर दुतर्फा वाहनांच्या रंग लागल्या होत्या. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीतील मतदानावर तांदुळजा मंडळातील सर्व गावचे शेतकरी बहिष्कार टाकतील शिवाय नेतेमंडळीला गावबंदी केली असा इशाराही यावेळी देण्यात आला. Conclusion:यावेळी गावचे शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण कुलकर्णी उपस्थित होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.