ETV Bharat / state

मागील सरकारच्या काळात नेते, चेल्या-चपाट्यांचीच गरिबी दूर झाली; नितीन गडकरींची काँग्रेसवर घणाघाती टीका

काँग्रेसने सर्वसामान्यांची गरिबी हटविण्याचा विश्वास दिला होता. पण काँग्रेसच्या काळात केवळ मुठभर नेते आणि त्यांच्या चेल्या-चपाट्यांचीच गरिबी दूर झाल्याची टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केली.

author img

By

Published : Apr 17, 2019, 12:16 AM IST

भुसावळ येथील सभेत बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

जळगाव - भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसचे सरकार आले. काँग्रेसने सर्वसामान्यांची गरिबी हटविण्याचा विश्वास दिला होता. पण काँग्रेसच्या काळात केवळ मुठभर नेते आणि त्यांच्या चेल्या-चपाट्यांचीच गरिबी दूर झाल्याची टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आज भुसावळात केली.

भुसावळ येथील सभेत बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान झाले. त्यांनी रशियाचे सोशल कम्युनिस्ट मॉडेल आपल्या देशाच्या विकासाकरता वापरून देशाची गरिबी हटविण्याचा विश्वास दिला होता. त्यानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या, त्यांनीही गरिबी हटाव हाच नारा दिला. नंतर राजीव गांधी आले. सोनिया गांधी आल्यावर मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. त्यांनीही गरिबी हटाव हाच नारा दिला. आता पंडितजींचे पणतू देखील गरिबी हटाव हाच नारा देत आहेत. असे म्हणत नाव न घेता त्यांनी राहुल गांधीवर टीका केली.

रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजीमंत्री एकनाथ खडसे, आमदार चैनसुख संचेती, हरिभाऊ जावळे, संजय सावकारे, उमेदवार रक्षा खडसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदू महाजन, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे आदी उपस्थित होते.

जळगाव - भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसचे सरकार आले. काँग्रेसने सर्वसामान्यांची गरिबी हटविण्याचा विश्वास दिला होता. पण काँग्रेसच्या काळात केवळ मुठभर नेते आणि त्यांच्या चेल्या-चपाट्यांचीच गरिबी दूर झाल्याची टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आज भुसावळात केली.

भुसावळ येथील सभेत बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान झाले. त्यांनी रशियाचे सोशल कम्युनिस्ट मॉडेल आपल्या देशाच्या विकासाकरता वापरून देशाची गरिबी हटविण्याचा विश्वास दिला होता. त्यानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या, त्यांनीही गरिबी हटाव हाच नारा दिला. नंतर राजीव गांधी आले. सोनिया गांधी आल्यावर मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. त्यांनीही गरिबी हटाव हाच नारा दिला. आता पंडितजींचे पणतू देखील गरिबी हटाव हाच नारा देत आहेत. असे म्हणत नाव न घेता त्यांनी राहुल गांधीवर टीका केली.

रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजीमंत्री एकनाथ खडसे, आमदार चैनसुख संचेती, हरिभाऊ जावळे, संजय सावकारे, उमेदवार रक्षा खडसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदू महाजन, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे आदी उपस्थित होते.

Intro:Feed send to FTP
जळगाव
आपल्या देशाला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसचे सरकार आले. काँग्रेसने सर्वसामान्यांची गरिबी हटविण्याचा विश्वास दिला होता. पण काँग्रेसच्या काळात काँग्रेसचे नेते, चमचे आणि चेल्या-चपाट्यांचीच गरिबी दूर झाली, अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज भुसावळात काँग्रेसवर केली.Body:रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजीमंत्री एकनाथ खडसे, आमदार चैनसुख संचेती, हरिभाऊ जावळे, संजय सावकारे, उमेदवार रक्षा खडसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदू महाजन, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ऍड. रोहिणी खडसे आदी उपस्थित होते.

गडकरी पुढे म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान झाले. त्यांनी रशियाचं जे सोशल कम्युनिस्ट मॉडेल होते, ते आर्थिक मॉडेल आपल्या देशाच्या विकासाकरिता वापरून देशाची गरिबी हटविण्याचा विश्वास दिला होता. त्यानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या, त्यांनीही गरिबी हटाव हाच नारा दिला. नंतर राजीव गांधी आले. सोनिया गांधी आल्यावर मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. त्यांनीही गरिबी हटाव हाच नारा दिला. आता पंडितजींचे पणतू देखील गरिबी हटाव हाच नारा देत आहेत. परंतु खरच गरिबी हटली का? काँग्रेसच्या काळात दलित, अल्पसंख्याकांची, शेतकऱ्यांची गरिबी हटली का, हा प्रश्नच आहे. काँग्रेसच्या काळात खरंच कोणाची गरीब हटली असेल तर ती काँग्रेसच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची तसंच चमच्यांची आणि चेल्या-चपाट्यांची हटली, अशी टीका करत गडकरींनी काँग्रेसच्या 70 वर्षांच्या कारभाराची वाभाडे काढली.

काँग्रेसचा इतिहास विश्वासघात आणि बेईमानीचा-

काँग्रेसचा 70 ते 72 वर्षांचा इतिहास म्हणजे विश्वासघात आणि बेईमानीचा इतिहास आहे. या इतिहासात शेतकरी आत्महत्या करायला लागला. गावागावात प्यायला पाणी नाही, शेतीला पाणी नाही. दुष्काळ पडलेला आहे. काँग्रेस सरकारच्या काळात 70 हजार कोटी रुपयांची विमाने घ्यायला यांच्याकडे पैसे होते. सरकारने विमाने घ्यायची काय गरज होती. हेच पैसे जर सिंचनासाठी, पाणी योजनांसाठी खर्च केले असते तर आज दुष्काळाची वेळ आली नसती. पण चुकीचे नियोजन, चुकीची धोरणे, दूरदृष्टी नसलेले नेतृत्व हीच काँग्रेसची शोकांतिका होती, असेही गडकरी म्हणाले.

मी 17 लाख कोटी रुपयांची कामे केली-

भाजप सरकारच्या कार्यकाळात मी 17 लाख कोटी रुपयांची कामे केली. 11 लाख कोटी रुपयांची रस्त्यांची कामे केली. 5 लाख कोटी रुपयांची पोर्ट, शिपींगमध्ये कामे केली. 1 लाख कोटी रुपयांची नमामी गंगा आणि वॉटर रिसोर्सेसची कामे केली. अजून 8 ते 10 लाख कोटी रुपयांची कामे करू शकलो असतो, असा दावाही यावेळी गडकरींनी केला. या देशात पैशांची कमी नाही तर कमी आहे ती योग्य नेतृत्वाची, योग्य दृष्टिकोणाची, असेही ते म्हणाले.Conclusion:काँग्रेसने संविधानाच्या धज्ज्या उडवल्या-

'सबका साथ, सबका विकास' या घोषणेनुसार भाजपनं सर्वांचा विकास करण्याचा प्रयत्न केलाय. एक तरी योजना सांगा की ज्यात आम्ही जातीयवादाच्या आधारावर, सांप्रदायिकतेच्या आधारावर मुस्लिमांवर, दलितांवर अन्याय केला. आमच्याबद्दल अपप्रचार केला की बाबासाहेबांची घटना मोडणार आहे. बाबासाहेबांची घटना 80 वेळा तोडण्याचं काम काँग्रेसने केलं. आणीबाणीच्या काळात घटनेच्या धज्ज्या उडवल्या. प्रधानमंत्री दोषी असेल तरी तिच्यावर कारवाई करता येणार नाही म्हणून घटनादुरुस्ती केली. तेच काँग्रेसवाले आज प्रचार करत आहेत की, बाबासाहेबांची घटना आम्ही बदलणार. बाबासाहेबांची घटना बदलण्याचा प्रश्नच येत नाही. हिंदू, मुस्लीम, जैन, बौद्ध किंवा ख्रिश्चन असो, आम्ही कोण्या धर्माच्या, जातीच्या विरुद्ध नाहीत. भाजपचा एकच विचार आहे की, कोणताही माणूस हा जातीने श्रेष्ठ नसतो तर तो त्याच्या गुणाने श्रेष्ठ असतो. या समाजातील अस्पृश्यता, जातीयता, सांप्रदायिकता नष्ट करून मानवतेच्या आधारावर समाजाचा विकास झाला पाहिजे, हीच आमची संकल्पना आहे, असं सांगत गडकरींनी भाजपवर होणाऱ्या जातीयवादाच्या आरोपांचे खंडन केलं.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.