जळगाव - जिल्ह्यातील यावल शहरातील एका दाम्पत्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना आज (दि. 17 जून) सकाळी 7 वाजेच्या सुमारास यावल शहरातील फैजपूर रस्त्यावरील एका शेतात घडली. भागवत ऊर्फ बाळू दिगंबर पाटील (वय 61 वर्षे) आणि विमलबाई भागवत पाटील (वय 54 वर्षे, दोघे रा. यावल, जि. जळगाव) अशी मृतांची नावे आहेत. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
विमलबाई आणि भागवत पाटील हे यावल शहरातील सुतारवाडा भागातील रहिवासी होते. ते बुधवारी (दि. 17 जून) सकाळी पावणेसहा वाजता वॉकसाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले होते. फैजपूर रस्त्यावरील महाविद्यालयाच्या समोर असलेल्या निर्मल चोपडे यांच्या शेतातील विहिरीत दोघांनी उडी घेऊन आत्महत्या केली.