ETV Bharat / state

हिंगोलीत विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस;रब्बी पिकांचे नुकसान

author img

By

Published : Mar 28, 2020, 8:13 PM IST

कोरोनामुळे देशभर संचारबंदी लागू करण्यात आली असल्याने शेतकऱ्यांचा शेतीमाल शेतातच पडून आहे. या नुकसानीचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांसमोर अवकाळी पावसाने पुन्हा नवीन संकट उभे केले आहे. हिंगोलीत शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसाने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

untimely rain in hingoli
हिंगोलीत विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस

हिंगोली - एकीकडे कोरोनाचे तर दुसरीकडे बेमोसमी पावसाचे संकट शेतकऱ्यावर येऊन ठेपले आहे. हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रब्बी पिकांसह फळवर्गीय अन् भाजीपाला पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.

untimely rain in hingoli
हिंगोलीत विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस

शेतकरी हा निसर्गासमोर दरवर्षीच हतबल होत आहे. त्याला यंदाही निसर्गाने सोडले नाही. आधीच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने त्याच्या शेतीच्या मालाची ने-आन वाहतूक बंदीमुळे थांबली आहे. त्यामुळे भाजीपाला शेतकरी आपल्या गुरांना चारत आहेत. शहरी ठिकाणी आता कधी-कधी नगर पालिकेच्या वतीने भाजीपाला विक्रीस मुभा दिलेली असल्याने कुठे दिलासा मिळालाय.

हिंगोलीत विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस

मात्र, आज अचानक हजेरी लावलेल्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. तर रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पावसाळ्यासारखीच परिस्थिती दिसून येत आहे. मात्र नेहमी प्रमाणे पाऊस सुरू होताच विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना उकड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

हिंगोली - एकीकडे कोरोनाचे तर दुसरीकडे बेमोसमी पावसाचे संकट शेतकऱ्यावर येऊन ठेपले आहे. हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रब्बी पिकांसह फळवर्गीय अन् भाजीपाला पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.

untimely rain in hingoli
हिंगोलीत विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस

शेतकरी हा निसर्गासमोर दरवर्षीच हतबल होत आहे. त्याला यंदाही निसर्गाने सोडले नाही. आधीच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने त्याच्या शेतीच्या मालाची ने-आन वाहतूक बंदीमुळे थांबली आहे. त्यामुळे भाजीपाला शेतकरी आपल्या गुरांना चारत आहेत. शहरी ठिकाणी आता कधी-कधी नगर पालिकेच्या वतीने भाजीपाला विक्रीस मुभा दिलेली असल्याने कुठे दिलासा मिळालाय.

हिंगोलीत विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस

मात्र, आज अचानक हजेरी लावलेल्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. तर रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पावसाळ्यासारखीच परिस्थिती दिसून येत आहे. मात्र नेहमी प्रमाणे पाऊस सुरू होताच विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना उकड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.