ETV Bharat / state

हिंगोलीत परतीच्या पावसाचा धुमाकुळ, कपाशीला मोठा फटका

जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावासाचा जोर कायम राहिल्याने, शेतात असलेले उरले सुरले सोयाबीनही वाया गेल्याचे चित्र आहे. तर कपाशीच्या पिकाला देखील मोठा फटका बसला आहे.

author img

By

Published : Oct 28, 2019, 7:47 AM IST

परतीच्या पावसामुळे हिंगोलीतील सोयाबीन आणि कापसाच्या पिकाला मोठा फटका

हिंगोली - जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे खरिपाच्या पिकाचे अतोनात नुकसान होत आहे. तर कापून टाकलेले सोयाबीन बऱ्याच भागात पाण्यावर तरंगत आहे. त्यातच रविवारी दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे उरले सुरले सोयाबीनही वाया गेले. तर कपाशीच्या पिकाला देखील मोठा फटका बसला आहे.

परतीच्या पावसामुळे हिंगोलीतील सोयाबीन आणि कापसाच्या पिकाला मोठा फटका

हेही वाचा... अमरावतीत परतीच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल; सोयाबीनला फुटली कोंब, कापूस बोंडे सडण्याचा मार्गावर

हिंगोली जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता. रात्रीच्या सुमारास तर पावसाचा वेग वाढला होता. सलग पाच ते सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे झेंडूच्या फुलासह सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. सेनगावसह जिल्ह्यातील इतर भागातही कापून टाकलेले सोयाबीन वाहून गेले आहे. सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीच्या दिवसातच शेतातील धान्याचे नुकसान झाल्याने यंदाची दिवाळी ही शेतकऱ्यांसाठी खरोखरच कडू बनली आहे.

हेही वाचा... 'तहसिल कार्यालयातील क्लर्क ते दिंडोरीचे आमदार' नरहरी झिरवाळ यांचा प्रेरणादायी प्रवास

परिसरात पावसाचे प्रमाण होते की, प्रत्येक शेतात मोठ्याप्रमाणात पाणी साचल्याचे दिसून येत आहे. मात्र एवढी भयंकर परिस्थिती निर्माण झालेली असताना देखील एकाही प्रतिनिधीने शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी देखील केलेली नाही. शेतकऱ्यांकडून नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

हिंगोली - जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे खरिपाच्या पिकाचे अतोनात नुकसान होत आहे. तर कापून टाकलेले सोयाबीन बऱ्याच भागात पाण्यावर तरंगत आहे. त्यातच रविवारी दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे उरले सुरले सोयाबीनही वाया गेले. तर कपाशीच्या पिकाला देखील मोठा फटका बसला आहे.

परतीच्या पावसामुळे हिंगोलीतील सोयाबीन आणि कापसाच्या पिकाला मोठा फटका

हेही वाचा... अमरावतीत परतीच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल; सोयाबीनला फुटली कोंब, कापूस बोंडे सडण्याचा मार्गावर

हिंगोली जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता. रात्रीच्या सुमारास तर पावसाचा वेग वाढला होता. सलग पाच ते सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे झेंडूच्या फुलासह सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. सेनगावसह जिल्ह्यातील इतर भागातही कापून टाकलेले सोयाबीन वाहून गेले आहे. सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीच्या दिवसातच शेतातील धान्याचे नुकसान झाल्याने यंदाची दिवाळी ही शेतकऱ्यांसाठी खरोखरच कडू बनली आहे.

हेही वाचा... 'तहसिल कार्यालयातील क्लर्क ते दिंडोरीचे आमदार' नरहरी झिरवाळ यांचा प्रेरणादायी प्रवास

परिसरात पावसाचे प्रमाण होते की, प्रत्येक शेतात मोठ्याप्रमाणात पाणी साचल्याचे दिसून येत आहे. मात्र एवढी भयंकर परिस्थिती निर्माण झालेली असताना देखील एकाही प्रतिनिधीने शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी देखील केलेली नाही. शेतकऱ्यांकडून नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

Intro:

हिंगोली- जिल्ह्यात मागील काही दिवसापासून पाऊस हजेरी लावत आहे त्यामुळे खरिपाच्या पिकाचे अतोनात नुकसान झालेय. तर कापून टाकलेले सोयाबीन बऱ्याच भागात पाण्यावर तरंगत आहे शेतकऱ्यांनी लावलेल्या सुडी देखील भिजत असल्याचे भयंकर चित्र सध्या दिसून येते., त्यातच आज दिवसभर पाऊस सुरू असून सायंकाळच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. त्यामुळे उरले सुरले सोयाबीन ही वाया गेलेय तर कपाशीच्या पिकाला देखील मोठा फटका बसला आहे.


Body:हिंगोली जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता रात्रीच्या सुमारास तर पावसाचा वेग वाढला होता. चलक पाच ते सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे झेंडूच्या फुलासह सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले सेनगाव सह जिल्ह्यातील इतर भागातही कापून टाकलेले सोयाबीन वाहून गेलंय तर झाकून टाकलेले चुडी देखील पूर्णता भिजूज गेलीय. खर तर सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर शेतातील धान्य विक्री करून त्यात धान्याची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नवीन कपडे घालून पूजा केली जाते. मात्र यंदाची दिवाळी ही शेतकऱ्यांसाठी खरोखरच कडूच बनलीय. सोयाबीन काढण्याची वेळेस आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पूर्णपणे पाणी फिरवलेय. उभं पीक अन कापून टाकलेली सोयाबीन डोळ्यादेखत वाहून जाताना मोठ्या जड मनाने शेतकऱ्यांना पहावे लागत आहे. Conclusion:कित्येक शेतकऱ्यांच्या सुड्याच्या सुड्या पाण्यात आहेत. एवढा पाऊस झालाय की, प्रत्येक शेतात मोठ्याप्रमाणात पाणी साचल्याचे दिसून येत आहे. शनिवारी 18 सरासरी मी.मी पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाकडे झालीय. आज झालेल्या पावसाची आकडेवारी वाढणार आहे.
एवढी भयंकर परिस्थिती निर्माण झालेली असताना देखील एक ही नवनिर्वाचित आमदाराने शेतकऱ्याच्या धुऱ्यावर किंवा नुकसानीची पाहणी देखील अजून केलेली नाही. निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी पूर्णपणे हादरूनच गेला आहे. रात्रभर विजेच्या कडकडाटसह पाऊस सुरु होता. प्रशासन स्तरावर नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांतुन होत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.