ETV Bharat / state

हिंगोलीत तापमानाचा पारा ४३ अंशांवर, रस्त्यावर शुकशुकाट

जिल्ह्यात आज तापमानाचा पारा ४३ अंशांवर गेल्यामुळे हिंगोलीकर चांगलेच हैराण झाले होते.

author img

By

Published : Apr 25, 2019, 11:29 PM IST

जलतरण करताना मुले

हिंगोली - तापमान वाढीमुळे संपूर्ण महाराष्ट्र हैराण झाला आहे. बुधवारी ४२ अंश आणि आज ४३ अंशावर तापमानाचा पारा चढल्याने हिंगोलीकर चांगलेच हैराण झाले होते. त्यामुळे ते जलतरणाचा आधार घेताना दिसत आहेत. तर दुपारच्या वेळी सर्वाधिक ऊन लागत असल्याने, बरेच जण घराबाहेर पडणे टाळत होते. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे.

जिल्ह्यात मे महिन्यात तापमानाचा पारा ४३ ते ४५ अंशावर जाऊन पोहोचतो. मात्र, या वर्षी उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात जिह्याचे तापमान ४३ अंशावर जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे हिंगोलीकर आज चांगलेच घामाघूम झाले. यावेळी शहरातील बऱ्याच पालकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी जलतरणाचा आधार घेतला.

जलतरण करताना मुले

विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग वाढत्या तापमानाने होरपळून निघत असतानाच जिल्ह्यातही सकाळी ९ वाजल्यापासूनच सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे गर्दीने नेहमीच भरून राहणाऱ्या रस्त्यावर मोठा शुकशुकाट दिसून आला. वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी मात्र अनेकांनी रसवंती तसेच शीतपेयाच्या दुकानात गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

जिल्ह्याला पाणीटंचाईचे ग्रहण

जस-जसे तापमान वाढत आहे, तस-तसे जिल्ह्यातील जलसाठे कोरडे पडत आहेत. त्यामुळे आज घडीला ३० ते ४० च्या वर गावांची भिस्त ही पाण्याच्या टँकरवर आहे. जिह्यातील बऱ्याच गावातील ग्रामस्थ पाणीटंचाईला कंटाळून गावे सोडून देण्याच्या तयारीत आहेत. तर टँकर सुरू असलेल्या गावात, महिला पुरुष टँकरच्या प्रतीक्षेत बसल्याचे भयंकर चित्र आहे.

हिंगोली - तापमान वाढीमुळे संपूर्ण महाराष्ट्र हैराण झाला आहे. बुधवारी ४२ अंश आणि आज ४३ अंशावर तापमानाचा पारा चढल्याने हिंगोलीकर चांगलेच हैराण झाले होते. त्यामुळे ते जलतरणाचा आधार घेताना दिसत आहेत. तर दुपारच्या वेळी सर्वाधिक ऊन लागत असल्याने, बरेच जण घराबाहेर पडणे टाळत होते. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे.

जिल्ह्यात मे महिन्यात तापमानाचा पारा ४३ ते ४५ अंशावर जाऊन पोहोचतो. मात्र, या वर्षी उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात जिह्याचे तापमान ४३ अंशावर जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे हिंगोलीकर आज चांगलेच घामाघूम झाले. यावेळी शहरातील बऱ्याच पालकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी जलतरणाचा आधार घेतला.

जलतरण करताना मुले

विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग वाढत्या तापमानाने होरपळून निघत असतानाच जिल्ह्यातही सकाळी ९ वाजल्यापासूनच सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे गर्दीने नेहमीच भरून राहणाऱ्या रस्त्यावर मोठा शुकशुकाट दिसून आला. वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी मात्र अनेकांनी रसवंती तसेच शीतपेयाच्या दुकानात गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

जिल्ह्याला पाणीटंचाईचे ग्रहण

जस-जसे तापमान वाढत आहे, तस-तसे जिल्ह्यातील जलसाठे कोरडे पडत आहेत. त्यामुळे आज घडीला ३० ते ४० च्या वर गावांची भिस्त ही पाण्याच्या टँकरवर आहे. जिह्यातील बऱ्याच गावातील ग्रामस्थ पाणीटंचाईला कंटाळून गावे सोडून देण्याच्या तयारीत आहेत. तर टँकर सुरू असलेल्या गावात, महिला पुरुष टँकरच्या प्रतीक्षेत बसल्याचे भयंकर चित्र आहे.

Intro:हिंगोली जिल्ह्याच्या तापमानात तीन ते चार दिवसांपासून वाढ झाली आहे. काल ४२ अंश अन आज ४३ अंशावर तापमानाचा पारा चढल्याने हिंगोलीकर चांगलेच हैराण झाले होते. वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी हिंगोलीकरानी जलतरणीकाचा आधार घेतला. तर दुपारच्या वेळी सर्वाधिक जास्त ऊन लागत असल्याने, बरेच जण घराबाहेर पडणे टाळत होते. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत होता.


Body:यंदा एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा वाढत आहे. एरवी मे महिन्यात तापमानाचा पारा ४३, ते ४५ अंश वर जाऊन पोहोचत असे, मात्र या वर्षी उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. एप्रिल च्याच शेवटच्या आठवड्यात एवढे तापमान वाढले आहे, चक्क ४३ अंशावर जाऊन पोहोचलेय. त्यामुळे हिंगोलीकर आज चांगलेच घामाघूम झाले होते. त्यामुळे बऱ्याच पालकांनी उन्हपासून बचाव करण्यासाठी चक्क जलतरणीकेचा आधार घेतला. सुर्य आग ओकत होता. त्यामुळे ज्याची त्याची आप - आपल्या परीने उन्हापासून बचाव करण्यासाठी धडपड सूरु असल्याचे पहावयास मिळाले. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग वाढत्या तापमानाने होरपळून निघत असतानाच हिंगोली जिल्ह्यात ही सकाळी नऊ वाजल्यापासूनच सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे गर्दीने नेहमीच भरून राहणाऱ्या रस्त्यावर ही मोठा शुकशुकाट दिसुन येत होता. वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी मात्र अनेकांनी रसवंती तसेच शितपेयाच्या दुकानात एकच गर्दी झाल्याचे पाहवयास मिळाले.


Conclusion:एकंदरीत हिंगोली जिल्हा दर वर्षीच चांगला तापतोय. अशा परिस्थितीतच हिंगोली जिल्ह्याला पाणीटंचाईचे ग्रहण आहे. जस जसे तापमान वाढत आहे तसा तसे जिल्ह्यातील जलसाठे कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे आज घडीला ३० ते ४० च्या वर गावांची भिस्त ही पाण्याच्या टँकरवर आहे. बऱ्याच गावातील ग्रामस्थ पाणीटंचाईला कंटाळून गावे सोडून देण्याच्या तयारीत आहेत. तर टॅंकर सुरू असलेल्या गावात, महिला पुरुष टँकर च्या प्रतीक्षेत बसल्याचे भयंकर चित्र आहे.

स्वीमिंग करतानाचे अन टँकर चे पाणी भरतानाचा व्हिज्युअल ftp केले आहेत.
बातमीत वापरावेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.