ETV Bharat / state

काही नाही, या सरकारला जनतेला मारायचंय; पेट्रोल दरवाढीनंतर हिंगोलीत संतप्त प्रतिक्रिया

author img

By

Published : Jul 6, 2019, 12:16 PM IST

सरकारने सर्वसामान्यांचा विचार करून दर कमी करावेत, अशी मागणी सर्वसामान्य लोक करत आहेत. पेट्रोलचे दर वाढल्याने पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

पेट्रोल दरवाढीनंतर हिंगोलीत संतप्त प्रतिक्रिया

हिंगोली - 'काही नाही, या सरकारला जनतेला मारायचंय, म्हणूनच कोणत्याही वस्तूची महाग करतंय, त्यातच पेट्रोल दरवाढ अर्थसंकल्प सादर केल्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच लागू झाल्यामुळे, हे सरकार म्हणजे खरोखरच जनतेचे कंबरडे मोडणारे सरकार आहे', अशी तिखट प्रतिक्रिया पहाटे-पहाटे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहनधारकांनी दिली. अजून काय-काय पहावे लागणार या सरकारच्या काळात हेदेखील सांगता येत नसल्याचे वाहनधारक म्हणत होते. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी इंधनाचे दर वाढल्याने हिंगोलीतील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केल्याच्या दुसऱ्याच दिवशी पेट्रोल दरवाढ लागू केली. त्यामुळे ही जनतेची केवळ 'हऱ्याशमेन्ट' आहे. तुम्हाला पेट्रोलची दरवाढ करायचीच होती, तर जनतेतून तुम्ही प्रतिक्रियाही घेऊ शकला असता. आता पेट्रोल दरवाढ केली म्हणजे तुम्ही इतरही वस्तूच्या किंमती वाढवणार! हेही निश्चित आहे. त्यामुळे आम्हाला या सरकारकडून खूप मोठी अपेक्षा होती. मात्र, काल सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे आणि त्याचे परिणाम दुसऱ्या दिवशी जाणवू लागल्यामुळे या सरकारवरील विश्वास पहिल्याच अर्थसंकल्पामुळे उडण्याची वेळ आली आहे. आज पेट्रोल-डिझेलची भाववाढ लागू केल्याने हे मात्र स्पष्ट झाले की, हे सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे नव्हे, तर उद्योजकांच्याच हिताचे आहे. आज जनता कशी हाल भोगते आणि त्यात भर म्हणून सरकार प्रत्येक वस्तूच्या किमती वाढवते, याला काही अर्थ आहे का?. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी हे सरकार खूप वेळ घेते, मात्र कोणत्या वस्तूवर भाववाढ लागू करण्यासाठी रात्रही उलटू देत नाही.

पेट्रोल दरवाढीनंतर हिंगोलीत संतप्त प्रतिक्रिया
विशेष म्हणजे आजही पेट्रोल पंप चालक पेट्रोलमध्ये भेसळ करून त्याची विक्री करतात. त्यावर कारवाई होत नाही, मात्र दरवाढ लागू करण्यासाठी एवढी घाई. एवढेच नव्हे, तर इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोलचे दर सर्वात जास्त आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीयांना हे दर परवडणारे नाहीत. त्यामुळे सरकारने सर्वसामान्यांचा विचार करून दर कमी करावेत, अशी मागणी सर्वसामान्य लोक करत आहेत. पेट्रोलचे दर वाढल्याने पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

हिंगोली - 'काही नाही, या सरकारला जनतेला मारायचंय, म्हणूनच कोणत्याही वस्तूची महाग करतंय, त्यातच पेट्रोल दरवाढ अर्थसंकल्प सादर केल्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच लागू झाल्यामुळे, हे सरकार म्हणजे खरोखरच जनतेचे कंबरडे मोडणारे सरकार आहे', अशी तिखट प्रतिक्रिया पहाटे-पहाटे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहनधारकांनी दिली. अजून काय-काय पहावे लागणार या सरकारच्या काळात हेदेखील सांगता येत नसल्याचे वाहनधारक म्हणत होते. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी इंधनाचे दर वाढल्याने हिंगोलीतील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केल्याच्या दुसऱ्याच दिवशी पेट्रोल दरवाढ लागू केली. त्यामुळे ही जनतेची केवळ 'हऱ्याशमेन्ट' आहे. तुम्हाला पेट्रोलची दरवाढ करायचीच होती, तर जनतेतून तुम्ही प्रतिक्रियाही घेऊ शकला असता. आता पेट्रोल दरवाढ केली म्हणजे तुम्ही इतरही वस्तूच्या किंमती वाढवणार! हेही निश्चित आहे. त्यामुळे आम्हाला या सरकारकडून खूप मोठी अपेक्षा होती. मात्र, काल सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे आणि त्याचे परिणाम दुसऱ्या दिवशी जाणवू लागल्यामुळे या सरकारवरील विश्वास पहिल्याच अर्थसंकल्पामुळे उडण्याची वेळ आली आहे. आज पेट्रोल-डिझेलची भाववाढ लागू केल्याने हे मात्र स्पष्ट झाले की, हे सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे नव्हे, तर उद्योजकांच्याच हिताचे आहे. आज जनता कशी हाल भोगते आणि त्यात भर म्हणून सरकार प्रत्येक वस्तूच्या किमती वाढवते, याला काही अर्थ आहे का?. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी हे सरकार खूप वेळ घेते, मात्र कोणत्या वस्तूवर भाववाढ लागू करण्यासाठी रात्रही उलटू देत नाही.

पेट्रोल दरवाढीनंतर हिंगोलीत संतप्त प्रतिक्रिया
विशेष म्हणजे आजही पेट्रोल पंप चालक पेट्रोलमध्ये भेसळ करून त्याची विक्री करतात. त्यावर कारवाई होत नाही, मात्र दरवाढ लागू करण्यासाठी एवढी घाई. एवढेच नव्हे, तर इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोलचे दर सर्वात जास्त आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीयांना हे दर परवडणारे नाहीत. त्यामुळे सरकारने सर्वसामान्यांचा विचार करून दर कमी करावेत, अशी मागणी सर्वसामान्य लोक करत आहेत. पेट्रोलचे दर वाढल्याने पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
Intro:काहीच नाही या सरकारला जनतेला मारायचं म्हणूनच कोणत्याही वस्तूची महागाई करतंय, त्यातच पेट्रोल दरवाढ अर्थसंकल्प सादर केल्याच्या दुसऱ्या दिवशी पासूनच लागू झाल्यामुळे, हे सरकार म्हणजे खरोखरच जनतेचे कंबरडे मोडणारा सरकार आहे. अशी तिखट प्रतिक्रिया पहाटे-पहाटे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी घेऊन येणाऱ्या वाहनधारकांनी दिली. अजून काय काय पहावे लागणार या सरकारच्या काळात हे देखील सांगता येत नसल्याचे वाहनधारक म्हणत होते.


Body:अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केल्याच्या दुसऱ्याच दिवशी पेट्रोल दरवाढ लागू केली. त्यामुळे ही जनतेची केवळ 'हऱ्याशमेन्ट' आहे तुम्हाला पेट्रोलचे दर वाढ करायचेच होते, तर जनतेतून तुम्ही प्रतिक्रियाही घेऊ शकले असते. आता पेट्रोल दरवाढ केली म्हणजे तुम्ही इतरही वस्तूच्या किंमती वाढवणार! हे मात्र निश्चित. त्यामुळे आम्हाला या सरकार कडून खूप मोठी अपेक्षा होती. मात्र काल सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे आणि त्याचे परिणाम दुसऱ्या दिवशी जाणवू लागल्यामुळे या सरकारवरील विश्वास पहिल्याच अर्थसंकल्पामुळे उडण्याची वेळ आलीय. आज पेट्रोल डिझेलची भाववाढ लागू केल्याने हे मात्र स्पष्ट झाले की हे सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे नव्हे तर उद्योजकांच्याच हिताचे आहे. आज जनता कशी हाल भोगते आणि त्यात भर म्हणून सरकार प्रत्येक वस्तूच्या किमती वाढवते याला काही अर्थ आहे का. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी हे सरकार खूप वेळ घेते मात्र कोणत्या वस्तूवर भाव वाढ लागू करण्यासाठी रात्रही उलटू देत नाही.


Conclusion:विशेष म्हणजे आजही पेट्रोल पंप चालक पेट्रोलमध्ये फॅशन करून त्याची विक्री करतात त्यावर कारवाई करण्याच्या नावाने बोंबाबोंब मात्र दरवाढ लागू करण्यासाठी एवढी घाई. एवढेच नव्हे तर इतर राज्याच्या तुलनेत आपल्या राज्यात पेट्रोलचे दर हे सर्वाधिक जास्त आहेत त्यामुळे मध्यमवर्गीयांना हे दर परवडणारे नाहीत त्यामुळे सरकारने सर्वसामान्यांचा विचार करून रात्र तुमच लागू केलेले वाढीव दर कमी करावे एवढीच अपेक्षा या सरकारकडे वाहन धारक करीत आहेत. सकाळी सकाळी पेट्रोल पंपावर वाहने घेऊन पेट्रोल टाकण्यासाठी येणाऱ्या वाहनधारकांचे पेट्रोलचे दर भावून डोकेच सरकले पाहावयास मिळाले. त्यामुळे बहुतांश वाहन धारकांचे चेहरे पेट्रोल दरवाढ पाहून रागानेच फणफणलेल्या अवस्थेत दिसून येत होते. काहींना तर या सरकार बद्दल काय बोलावं हेच कळेनासे चित्र होते.


व्हिज्युअल ftp केले आहेत. बातमित वापरावेत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.