ETV Bharat / state

अनुदानित गोशाळेची दयनीय अवस्था, सुविधेअभावी 'गाई' मोजताहेत शेवटची घटका

सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक तांडा येथील गोशाळेत असलेल्या गुरांची संख्या शंभरपेक्षा जास्त असून शासनाकडून कोट्यवधींचा निधी मिळत असतानाही येथील गाईंची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे.

author img

By

Published : Jan 16, 2020, 6:40 PM IST

हत्ता नाईक तांडा येथील गोशाळेची दुरावस्था
हत्ता नाईक तांडा येथील गोशाळेची दुरावस्था

हिंगोली - जिल्ह्यातील हत्ता नाईक तांडा येथे असलेल्या गोशाळेतील गाईंची चारा अन् पाण्याअभावी दैनावस्था झाली आहे. या गोशाळेत कत्तलीकडे जाणाऱ्या गाईंना वाचवून या ठिकाणी आणून सोडले जाते. मात्र, त्यानंतर त्यांची काळजी घेतली जात नाही. गोठ्यातील शेण न काढता त्यावरच गाईंना कोंबले जात असल्याचा प्रकार या गोशाळेत सुरू आहे.

हत्ता नाईक तांडा येथील गोशाळेची दुरावस्था

सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक तांडा येथील गोशाळेत असलेल्या गुरांची संख्या शंभरावर आहे. गाईंच्या मलमूत्रापासून गोपालक साबण, फवारणी औषध बनविण्यात येते. मात्र, येथे असणाऱ्या गाईंची वेळेवर निगा राखत नसल्याने, हेळसांड होत आहे. गाईंसाठी परिसरात कुठेही मुबलक चारा उपलब्ध नाही, त्यामुळे अत्यवस्थ झालेल्या गाई येथे मृत्यूशी झुंज देत आहेत. अशा परिस्थितीत गाईने प्राण सोडलेच तर या मृत गाईंना रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त फेकून दिले जात असल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यात एकूण १२ गोशाळा असून, हत्ता नाईक तांडा येथील गोशाळा ही एकमेव अनुदानित शाळा आहे. एकीकडे संपूर्ण देशात गोहत्येवर बंदी असताना, गायीचे रक्षण करणाऱ्या गोशाळेतच गाईंची दैनावस्था आहे. या गोशाळेला आतापर्यंत २५- २५ हजारांचे ३ हप्ते प्राप्त झाल्याची माहिती पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त एल. एस. पवार यांनी दिली. या गोशाळेचा कारभार वरीष्ठ स्थरावर सुरू असल्याने आम्हाला तेथील काहीही कल्पना नाही. सर्वसामान्यांप्रमाणेच आमचा विभाग त्यांना सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे, असेही पवार यांनी सांगितले. तर, गाईंचे या गोशाळेमध्ये संवर्धन व्हावे या उद्देशाने शासनाने कोट्यावधी रुपयांचा निधी दिल्यानंतरही गाईंची दुर्दशा होत असून शासनाचा निधी नेमका जातोय कुठे? हा सवाल उपस्थित होत आहे.

हेही वाचा - पतीने सोडल्या नंतरही 'ती' नाही खचली, शेतातील 'सालगडी' बनून सांभाळते आईसह संसाराचा गाडा

गोशाळेचे संचालक याकडे सपशेल दुर्लक्ष करत असल्याचेही प्रकर्षाने समोर आले आहे. दरम्यान, अनुदान मिळाल्यानंतर गायराणातील गोशाळा हलवून गावालगत असलेल्या चालकांच्या शेतात गोशाळांचे शेड उभारण्यात आले आहेत. मात्र, या ठिकाणी देखील अतीशय कमी जागा असून येथील गुरांचीही भयंकर दुरावस्था होत आहे.

हेही वाचा - हिंगोली जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापतीपदी रुपाली पाटील गोरेगावकर बिनविरोध

हिंगोली - जिल्ह्यातील हत्ता नाईक तांडा येथे असलेल्या गोशाळेतील गाईंची चारा अन् पाण्याअभावी दैनावस्था झाली आहे. या गोशाळेत कत्तलीकडे जाणाऱ्या गाईंना वाचवून या ठिकाणी आणून सोडले जाते. मात्र, त्यानंतर त्यांची काळजी घेतली जात नाही. गोठ्यातील शेण न काढता त्यावरच गाईंना कोंबले जात असल्याचा प्रकार या गोशाळेत सुरू आहे.

हत्ता नाईक तांडा येथील गोशाळेची दुरावस्था

सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक तांडा येथील गोशाळेत असलेल्या गुरांची संख्या शंभरावर आहे. गाईंच्या मलमूत्रापासून गोपालक साबण, फवारणी औषध बनविण्यात येते. मात्र, येथे असणाऱ्या गाईंची वेळेवर निगा राखत नसल्याने, हेळसांड होत आहे. गाईंसाठी परिसरात कुठेही मुबलक चारा उपलब्ध नाही, त्यामुळे अत्यवस्थ झालेल्या गाई येथे मृत्यूशी झुंज देत आहेत. अशा परिस्थितीत गाईने प्राण सोडलेच तर या मृत गाईंना रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त फेकून दिले जात असल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यात एकूण १२ गोशाळा असून, हत्ता नाईक तांडा येथील गोशाळा ही एकमेव अनुदानित शाळा आहे. एकीकडे संपूर्ण देशात गोहत्येवर बंदी असताना, गायीचे रक्षण करणाऱ्या गोशाळेतच गाईंची दैनावस्था आहे. या गोशाळेला आतापर्यंत २५- २५ हजारांचे ३ हप्ते प्राप्त झाल्याची माहिती पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त एल. एस. पवार यांनी दिली. या गोशाळेचा कारभार वरीष्ठ स्थरावर सुरू असल्याने आम्हाला तेथील काहीही कल्पना नाही. सर्वसामान्यांप्रमाणेच आमचा विभाग त्यांना सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे, असेही पवार यांनी सांगितले. तर, गाईंचे या गोशाळेमध्ये संवर्धन व्हावे या उद्देशाने शासनाने कोट्यावधी रुपयांचा निधी दिल्यानंतरही गाईंची दुर्दशा होत असून शासनाचा निधी नेमका जातोय कुठे? हा सवाल उपस्थित होत आहे.

हेही वाचा - पतीने सोडल्या नंतरही 'ती' नाही खचली, शेतातील 'सालगडी' बनून सांभाळते आईसह संसाराचा गाडा

गोशाळेचे संचालक याकडे सपशेल दुर्लक्ष करत असल्याचेही प्रकर्षाने समोर आले आहे. दरम्यान, अनुदान मिळाल्यानंतर गायराणातील गोशाळा हलवून गावालगत असलेल्या चालकांच्या शेतात गोशाळांचे शेड उभारण्यात आले आहेत. मात्र, या ठिकाणी देखील अतीशय कमी जागा असून येथील गुरांचीही भयंकर दुरावस्था होत आहे.

हेही वाचा - हिंगोली जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापतीपदी रुपाली पाटील गोरेगावकर बिनविरोध

Intro:*

हिंगोली- जिल्ह्यातील हत्ता नाईक तांडा येथे असलेल्या गोशाळेतील गायीचे चाऱ्या अभावी अन पाण्याअभावी मोठे हाल सुरू आहेत. एवढेच नव्हे तर कधी शेण न काढता त्यावरच गायींना गोठ्यात कोंबले जातेय. हा भयंकर प्रकार पाहून अंगावर खरोखरच शहारे उभे राहतात. कत्तलीकडे जाणाऱ्या गायीला वाचवून या ठिकाणी आणून सोडले जातेय. मात्र येथे तर त्यांच गुरांची भयंकर हेळसांड होत असल्याचे दिसून आलेय.

Body:सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक तांडा येथील गोशाळेचे हे मन हेलावून टाकणारे दृश्य आहे. खर तर भाजप सरकारने विविध योजना राबवित कायदे ही घालून दिलेत. मात्र हत्ता नाईक तांडा येथील गोशाळेत नियमांची का पायमल्ली होत असावी? हा प्रश्न पडल्या शिवाय राहत नाही. या ठिकाणी गायीची संख्या शंभर च्या वर आहे, गायीच्या मलमूत्रा पासून, गोपालक साबण, फवारणी औषध बनवितात. मात्र गोशाळेतील गायीची वेळेवर निगा राखत नसल्याने, गायीची मोठी हेळसांड होत आहे. एवढेच काय तर अत्यवस्थ झालेल्या गायी येथे मृत्यूशी झुंज देत आहेत. शिवाय गायीसाठी परिसरात कुठे ही मुबलक चारा दिसून आला नाही. त्यामुळे अशाच परिस्थितीत गायीने प्राण सोडलेच तर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याऐवजी मृत गायी रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त फेकुन दिल्या जात असल्याचे दिसुन आले. त्यामुळे या ठिकाणी गायीची किती हेळसांड असेल ? हे शब्दात सांगण्याची अजिबात गरज नाही. अजून खळबळजनक बाब म्हणजे या गोशाळेचा कारभार हा वरीष्ठस्तरांवर सुरू असल्याने आम्हाला तेथील काही ही कल्पना नसते, सर्वसामान्या प्रमाणेच आमचा विभाग त्याना सेवा देण्याचा प्रयत्न करतोय. तर त्या गोशाळेला आतापर्यंत 25 - 25 हजाराचे तीन हप्ते प्राप्त झाल्याची माहिती. पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त एल. एस. पवार यांनी सांगितले. जिल्ह्यात एकूण 12 गोशाळा असून, हत्ता नाईक तांडा येथील एकमेव अनुदानित शाळा आहे. एकीकडे संपुर्ण देशात गोहत्यावर बंदी असताना, गायीचे रक्षण करणाऱ्या गोशाळेत अशी दिवसा ढवळ्या गोहत्या होत असेल तर यावरून दुर्दैव कोणते? हा सवाल उपस्थित होत आहे. शासन कोट्यावधी रुपयाचा निधी या गोशाळेसाठी देत आहे. उद्देश हाच की गाईंचे या गोशाळेमध्ये संवर्धन व्हावे . मात्र खरोखरच एवढा कोट्यावधी रुपयांचा निधी दिल्यानंतरही गाईंची अशी हेळसांड होत असेल तर शासनाचा निधी पाण्यात गेल्या सारखाच वाटत आहे. गोशाळेतील गायीची प्रचंड हेळसांड होत असल्याने शासनाला का पाझर फुटत नसावा? हा ही एक प्रश्न उपस्थित होत आहे. Conclusion:यावरून गोशाळेचे संचालकांचे या कडे सपशेल दुर्लक्ष करीत असल्याचे प्रकर्षाने समोर येतेय. तसेच अनुदान मिळाल्या नंतर गायरणातील गोशाळा हलवून गावा लगत असलेल्या गोशाळा चालकांच्या शेतात शेड उभारण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी देखील अतीशय कमी जागा आहे. त्यामुळे येथील गुरांची भयंकर दुरवस्था होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.