ETV Bharat / state

विम्याचा लाभ हवा असेल, तर कापूस पावसात भिजू द्या..! विमा प्रतिनिधीचा अजब सल्ला - विमा प्रतिनिधीचा अजब सल्ला

गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव, अळेगाव येथील शेतकरी पीक नुकसानीचा अर्ज देण्यासाठी विमा कंपनीचा प्रतिनीधीकडे गेले असता, रामटेके नामक प्रतिनीधीने अर्ज घेण्यास टाळाटाळ केली. तेव्हा कृषी सहाय्यकाने अर्ज घ्या, अशी विनंती केल्यानंतर प्रतिनीधीने अर्ज स्वीकारले.

विमा प्रतिनिधीचा अजब सल्ला
author img

By

Published : Nov 3, 2019, 5:22 PM IST

चंद्रपूर - गोंडपिपरीमध्ये परतीच्या पावसाने शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. तर पीक काढणीनंतर शेतमालाचे नुकसान झाले तरच विम्याचा लाभ मिळेल, असा अजब सल्ला विमा कंपनीच्या प्रतिनीधीने शेतकऱ्यांना दिला. तसेच विम्याचा लाभ हवा असेल तर कापूस पावसात भिजू द्या, असेही सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान

हेही वाचा - चंद्रपुरात दुचाकीची समोरा-समोर धडक, एक मृत

गोंडपिपरी तालुक्याला परतीच्या पावसाने झोडपून काढले. शेकडो हेक्टरमधील धानपिक जमिनीवर लोळले. हातात येणाऱ्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. सरकार मदत करेल ही आस बळीराजाला आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामेही सुरु आहेत. मात्र, गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव, अळेगाव येथील शेतकरी पिक नुकसानीचा अर्ज देण्यासाठी विमा कंपनीचा प्रतिनीधीकडे गेले असता, रामटेके नामक प्रतिनीधीने अर्ज घेण्यास टाळाटाळ केली. तेव्हा कृषी सहाय्यकाने अर्ज घ्या, अशी विनंती केल्यानंतर प्रतिनीधीने अर्ज स्वीकारले.

हेही वाचा - धक्कादायक! पीठगिरणीत अडकल्याने धडापासून मुंडके झाले वेगळे; चंद्रपुरातील घटना

कृषी सहाय्यकांनी पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून पीक नुकसानीचे अर्ज विमा प्रतिनीधीकडे देण्याच्या सूचना दिल्या. त्यावेळी दरवर्षी पीक विमा आम्ही भरतो. मात्र, नुकसान भरपाई कधीच मिळत नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला.

चंद्रपूर - गोंडपिपरीमध्ये परतीच्या पावसाने शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. तर पीक काढणीनंतर शेतमालाचे नुकसान झाले तरच विम्याचा लाभ मिळेल, असा अजब सल्ला विमा कंपनीच्या प्रतिनीधीने शेतकऱ्यांना दिला. तसेच विम्याचा लाभ हवा असेल तर कापूस पावसात भिजू द्या, असेही सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान

हेही वाचा - चंद्रपुरात दुचाकीची समोरा-समोर धडक, एक मृत

गोंडपिपरी तालुक्याला परतीच्या पावसाने झोडपून काढले. शेकडो हेक्टरमधील धानपिक जमिनीवर लोळले. हातात येणाऱ्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. सरकार मदत करेल ही आस बळीराजाला आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामेही सुरु आहेत. मात्र, गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव, अळेगाव येथील शेतकरी पिक नुकसानीचा अर्ज देण्यासाठी विमा कंपनीचा प्रतिनीधीकडे गेले असता, रामटेके नामक प्रतिनीधीने अर्ज घेण्यास टाळाटाळ केली. तेव्हा कृषी सहाय्यकाने अर्ज घ्या, अशी विनंती केल्यानंतर प्रतिनीधीने अर्ज स्वीकारले.

हेही वाचा - धक्कादायक! पीठगिरणीत अडकल्याने धडापासून मुंडके झाले वेगळे; चंद्रपुरातील घटना

कृषी सहाय्यकांनी पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून पीक नुकसानीचे अर्ज विमा प्रतिनीधीकडे देण्याच्या सूचना दिल्या. त्यावेळी दरवर्षी पीक विमा आम्ही भरतो. मात्र, नुकसान भरपाई कधीच मिळत नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला.

Intro:पिक विम्याचा लाभ हवा असेल तर वेचणी झालेला कापूस पावसात भिजू द्या..! विमा प्रतिनिधीचा बळीराजाला अजबच सल्ला.

चंद्रपूर

अतिवृष्टी आणि परतीचा पावसाने शेतमालाचे मोठे नुकसान झाले. परंतु विमा कंपनीच्या नजरेत हे नुकसानच नाही. पिक काढणीनंतर हातात आलेल्या शेतमालाचे नुकसान झाले तरच विम्याचा लाभ मिळेल. लाभ हवा असेल तर वेचणी झालेला कापूस पावसात भिजू द्या असा अजब सल्ला विमा कंपनीच्या प्रतिनीधीने शेतकऱ्यांना दिला.
हातात आलेल्या शेतमालाचे कोणता शेतकरी नुकसान करुन घेईल ? असा प्रति सवाल करित शेतकर्यांनी संताप व्यक्त केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी पंचायत समिती सभागृहात हा प्रकार घडला आहे.

गोंडपिपरी तालूक्याला परतीचा पावसाने अक्षरशः झोडपून काढले. शेकडो हेक्टर मधील धानपिक जमिनीवर लोळले आहे. हातात येणारे पिकाचे नुकसान झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. सरकार मदत करेल ही आस बळीराजाला आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सूरु आहेत. परंतु अतिवृष्टी आणि परतीचा पावसाने झालेले नुकसान,खरे पाहता नुकसानच नाही,असे विमा कंपनी म्हणते. गोंडपिपरी तालूक्यातील डोंगरगाव,अळेगाव येथिल शेतकऱ्यांनी पिक नुकसानीचा अर्ज देण्यासाठी विमा कंपनीचा प्रतिनीधीकडे गेले असता रामटेके नामक प्रतिनीधीने अर्ज घेण्यास टाळाटाळ केली. कृषी सहाय्यकाने अर्ज घ्या अशी विनंती केल्यावर त्या प्रतिनीधीने अर्ज स्विकारले. हा प्रकार गोंडपिपरी पंचायत समितीचा सभागृहात घडला. पिक विमा काढलेल्या शेतकर्यांशी संपर्क साधून कृषी सहाय्यकांनी पिक नुकसानीचा अर्ज विमा प्रतिनीधीकडे देण्याचा सूचना शेतकऱ्यांना केल्या.1 नोव्हेंबरला गोंडपिपरी तहसिलदारांनी पिकांच्या नुकसानी संदर्भात तातळीची सभा घेतली होती. या सभेत विमा प्रतिनीधी उपस्थित होता. डोंगरगाव,अळेगाव येथिल शेतकऱ्यांनी गोंडपिपरी पंचायत समितीचे सभागृह गाठले. विमा प्रतिनीधी रामटेके यांना अर्ज देण्यासाठी गेले असता अर्ज घेण्यास टाळाटाळ केली असे शेतकरी सांगतात. सभागृहात उपस्थित कृषी सहाय्याने अर्ज घेवून घ्या असे सांगितल्यावर त्या प्रतिनीधीने अर्ज स्विकारले. अतिवृष्टी,परतीचा पावसाने शेतमालाचे नुकसान झाल्यास विमाचा लाभ मिळत नाही. लाभ हवा असेल तर वेचनी झालेला कापूस पावसात भिजू द्या असा सल्लाही त्या प्रतिनीधीने शेतकऱ्यांना दिला. यावर शेतकरी चांगलेच संतापले. दरवर्षी पिक विमा आम्ही भरतोय.मात्र कधीच नुकसान भरपाई मिळाली नाही. या पिक विम्याचा काय उपयोग असा संतप्त सवाल करित शेतकऱ्यांनी प्रतिनीधींला धारेवर धरले होते.Body:विडीओ बाईट
शेतकरी,डोंगरगावConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.