ETV Bharat / state

प्रदीर्घ कालावधीनंतर जिल्ह्यात पावसाची सर्वदूर हजेरी

प्रदीर्घ कालावधीनंतर भंडारा जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना नवीन जीवनदान मिळाले आहे. नागरिकांनाही असह्य उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

author img

By

Published : Jul 25, 2019, 11:01 PM IST

प्रदीर्घ कालावधीनंतर भंडारा जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली

भंडारा - 20 ते 25 दिवसांच्या कालावधीनंतर भंडारा जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना नवीन जीवनदान मिळेल. नागरिकांनाही असह्य उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र हा पाऊस दररोज यावा, अशी अपेक्षा नागरिक करत आहेत.

प्रदीर्घ कालावधीनंतर भंडारा जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली
जून महिन्यात भंडारा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. चार-पाच दिवस सलग पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी धानाची लागवड केली, मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली होती. मागील 20 दिवसांपासून पिकांना पाऊस न मिळाल्याने पिके करपायला लागली होती. त्यामुळे शेतकरी मोठ्या आतुरतेने पावसाची वाट पाहत होता. तसेच नागरिकांनाही उकड्याचा त्रास सहन करावा लागत होता. सुरुवातीला तुमसर तालुक्यामध्ये आणि एक तासाच्या कालावधीनंतर संपूर्ण जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. दररोज पावसाने दमदार हजेरी लावली तरच शेतातील परे जगतील आणि त्यांची रोवणी ही शक्य होईल. जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरीच्या केवळ ४९ टक्केच पाऊस पडला आहे.

भंडारा - 20 ते 25 दिवसांच्या कालावधीनंतर भंडारा जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना नवीन जीवनदान मिळेल. नागरिकांनाही असह्य उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र हा पाऊस दररोज यावा, अशी अपेक्षा नागरिक करत आहेत.

प्रदीर्घ कालावधीनंतर भंडारा जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली
जून महिन्यात भंडारा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. चार-पाच दिवस सलग पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी धानाची लागवड केली, मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली होती. मागील 20 दिवसांपासून पिकांना पाऊस न मिळाल्याने पिके करपायला लागली होती. त्यामुळे शेतकरी मोठ्या आतुरतेने पावसाची वाट पाहत होता. तसेच नागरिकांनाही उकड्याचा त्रास सहन करावा लागत होता. सुरुवातीला तुमसर तालुक्यामध्ये आणि एक तासाच्या कालावधीनंतर संपूर्ण जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. दररोज पावसाने दमदार हजेरी लावली तरच शेतातील परे जगतील आणि त्यांची रोवणी ही शक्य होईल. जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरीच्या केवळ ४९ टक्केच पाऊस पडला आहे.
Intro:Anc : जवळपास 20 ते 25 दिवसाच्या कालावधीनंतर भंडारा जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पर्‍यांना नवीन जीवनदान मिळेल आणि नागरिकांनाही असाह्य उकळ्यापासून दिलासा मिळेल, मात्र हा पाऊस दररोज आणि दमदार यावं याची प्रतीक्षा नागरिक करीत आहेत.


Body:जून 29 पासून भंडारा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली पुढचे चार-पाच दिवस सलग पाऊस आल्याने शेतकरी राजा खुश झाला आणि त्याने धानाची लागवड केली मात्र त्यानंतर वरून राजा रुसला आणि पावसाने दडी मारली.
मागील 20 दिवसांपासून या पाऱ्यांना पाऊस न मिळाल्याने परे करपायला लागली होती बऱ्याच शेतकऱ्यांची परे पूर्ण पुणे करपली होती त्यामुळे शेतकरी मोठ्या आतुरतेने या पावसाची वाट पाहत होता तसेच पाऊस येत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात उकाडा निर्माण झाला असल्याने नागरिकांना या उकड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.
सायंकाळनंतर काळे ढग जमून आले सुरुवातीला तुमसर तालुक्यांमध्ये पाऊस बरसला एक तासाच्या कालावधीनंतर संपूर्ण जिल्ह्यात या पावसाने हजेरी लावली मात्र फक्त आज हा पाऊस येऊन चालणार नाही तर दररोज या पावसाने दमदार हजेरी लावावी तरच शेतकऱ्याचे परे जगतील आणि त्यांची रोवणी ही शक्य होईल. जिल्ह्यात आता पर्यंत सरासरीच्या केवळ 49 टक्केच पाऊस पडला आहे त्यामुळे अजून बराच पावसाची गरज जिह्याला आहे.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.