ETV Bharat / state

भंडारा वाघ हल्ला : वाघाला बेशुद्ध करण्याची वन विभागाला मिळाली परवानगी

author img

By

Published : Jan 28, 2020, 12:26 PM IST

शनिवारी बिनाखी गावातील नागरिकांवर वाघाने जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर वन विभागाने आणि गावकऱ्यांनी त्याला जंगलाच्या दिशेने पळवले. मात्र, तरीही या परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी वाघाच्या पाऊलखुणा दिसत आहेत. या वाघाला बेशुद्ध करण्याची परवानगी वन विभागाला मिळाली आहे.

वाघाला पकडण्यासाठी आंदोलन
वाघाला पकडण्यासाठी आंदोलन

भंडारा - तुमसर तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला जेरबंद करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलन केले. वनविभागाने वाघाला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. वाघाला बेशुद्ध करून पकडण्याची परवानगी वनविभागाला मिळाली असून यासाठी वन विभागाने पाच पथके तयार केली आहेत.

भंडारा वाघ हल्ला : संतप्त नागरिकांचे आंदोलन


वाघाने शनिवारी बिनाखी गावात हल्ला करून तीन लोकांना जखमी केले होते. त्यानंतर वन विभागाने आणि गावकऱ्यांनी त्याला जंगलाच्या दिशेने पळवले. मात्र, तरीही या परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी वाघाच्या पाऊलखुणा दिसत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक भीतीच्या सावटाखाली जगत असून दिवसाही शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत.

हेही वाचा - विदेशी पर्यटकांनी भारतीयांसमोर ठेवला अनोखा आदर्श

रविवारी सायंकाळी पुन्हा बिनाखी गावाच्या शिवारात हा वाघ शिरल्याची माहिती मिल मालक अनिल रहांगडाले यांनी वनविभागाला दिली. परंतु, कोणीही तिकडे फिरकले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आंदोलन केले. लवकरात लवकर वाघाला पकडण्याची आणि जखमींना मदत देण्याची मागणी त्यांनी केली.

जवळपास दहा दिवस अगोदर गोंदेखारी गावाशेजारी हा वाघ पहिल्यांदा दिसला होता. तेव्हा गावकऱ्यांनी आणि वन विभागाने वाघाला जंगलाच्या दिशेने पळवून लावले. तो जंगलात गेला असेल, असे वनविभागाला आणि गावकऱ्यांना वाटले होते. मात्र, हा वाघ जंगलात न जाता बपेरा, बिनाखी महालगाव या परिसरात फिरत होता. शनिवारी बिनाखी गावाजवळ रस्त्यावरून जाणाऱ्या बाईकवर वाघाने हल्ला चढवला. त्यानंतर जमा झालेल्या नागरिकातील एकावर जीवघेणा हल्ला केला. त्यावेळी नागरिकांनी दाखवलेल्या धाडसामुळे वाघ तिथून जंगलाच्या दिशेने पळाला. मात्र, अजूनही या परिसरात त्याच्या पाऊल खुणा दिसत आहेत.

वाघाला बेशुद्ध करण्याची परवानगी मिळाल्याने वन विभागाने 5 पथकांसह वाघाचा शोध सुरू केला आहे. मात्र, तो पकडला जात नाही तोपर्यंत या परिसरातील नागरिकांमध्ये वाघाची दहशत कायम राहणार आहे.

भंडारा - तुमसर तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला जेरबंद करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलन केले. वनविभागाने वाघाला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. वाघाला बेशुद्ध करून पकडण्याची परवानगी वनविभागाला मिळाली असून यासाठी वन विभागाने पाच पथके तयार केली आहेत.

भंडारा वाघ हल्ला : संतप्त नागरिकांचे आंदोलन


वाघाने शनिवारी बिनाखी गावात हल्ला करून तीन लोकांना जखमी केले होते. त्यानंतर वन विभागाने आणि गावकऱ्यांनी त्याला जंगलाच्या दिशेने पळवले. मात्र, तरीही या परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी वाघाच्या पाऊलखुणा दिसत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक भीतीच्या सावटाखाली जगत असून दिवसाही शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत.

हेही वाचा - विदेशी पर्यटकांनी भारतीयांसमोर ठेवला अनोखा आदर्श

रविवारी सायंकाळी पुन्हा बिनाखी गावाच्या शिवारात हा वाघ शिरल्याची माहिती मिल मालक अनिल रहांगडाले यांनी वनविभागाला दिली. परंतु, कोणीही तिकडे फिरकले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आंदोलन केले. लवकरात लवकर वाघाला पकडण्याची आणि जखमींना मदत देण्याची मागणी त्यांनी केली.

जवळपास दहा दिवस अगोदर गोंदेखारी गावाशेजारी हा वाघ पहिल्यांदा दिसला होता. तेव्हा गावकऱ्यांनी आणि वन विभागाने वाघाला जंगलाच्या दिशेने पळवून लावले. तो जंगलात गेला असेल, असे वनविभागाला आणि गावकऱ्यांना वाटले होते. मात्र, हा वाघ जंगलात न जाता बपेरा, बिनाखी महालगाव या परिसरात फिरत होता. शनिवारी बिनाखी गावाजवळ रस्त्यावरून जाणाऱ्या बाईकवर वाघाने हल्ला चढवला. त्यानंतर जमा झालेल्या नागरिकातील एकावर जीवघेणा हल्ला केला. त्यावेळी नागरिकांनी दाखवलेल्या धाडसामुळे वाघ तिथून जंगलाच्या दिशेने पळाला. मात्र, अजूनही या परिसरात त्याच्या पाऊल खुणा दिसत आहेत.

वाघाला बेशुद्ध करण्याची परवानगी मिळाल्याने वन विभागाने 5 पथकांसह वाघाचा शोध सुरू केला आहे. मात्र, तो पकडला जात नाही तोपर्यंत या परिसरातील नागरिकांमध्ये वाघाची दहशत कायम राहणार आहे.

Intro:Body:Anc :- तुमसर तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला जेरबंद करण्याच्या मागणीला घेऊन या परिसरातील नागरिकांनी आंदोलन केले. वनविभाग ही या वाघाला पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहे. यासाठी वाघाला बेशुद्ध करून पकडण्याची परवानगी वनविभागाला मिळाली असून वन विभागाचे पाच पथक तयार करण्यात आले असून वाघाचा शोध घेणे सुरू आहे. या वाघाच्या दहशतीमुळे सायंकाळी 6 नंतर नागरिकांनी बाहेर निघणे टाळले आहे तसेच शेतांवर सुद्धा जाणे सध्या बंद केले आहे.
शनिवारी या वाघाने बिनाखी गावात हल्ला करून तीन लोकांना जखमी केले होते त्यानंतर वन विभागाने गावकऱ्यांनी त्याला जंगलाच्या दिशेने पळवले मात्र तरीही या परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या पाऊलखुणा दिसत आहेत त्यामुळे परिसरातील नागरिक या वाघाच्या दहशतीखाली जगत आहेत.
रविवारी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान बिनाकी गावाच्या शिवारात असलेल्या हा वाघ शिरला मिल मालक अनिल रहांगडाले यांनी वनविभागाला याची माहिती दिली परंतु कोणीही तिकडे आले नाही त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आंदोलन करीत लवकरात लवकर पकडण्याची आणि जखमींना लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी केली.

जवळपास 10 दिवसा अगोदर तुमचं तालुक्यातील गोंदेखारी गावाशेजारी हा वाघ पहिल्यांदा दिसला गावकऱ्यांनी आणि वन विभागाने या वाघाला जंगलाच्या दिशेने पळवून लावले तू जंगलात गेला असेल अशी अपेक्षा वनविभागाने आणि गावकऱ्यांनी केली मात्र वाघ जंगलात न जाता बपेरा बिनाकी महालगाव या परिसरात फिरत होता त्यात शनिवारी 25 तारखेला बिनाकी गावाजवळ रस्त्यावरून जाणाऱ्या बाईक वर हल्ला चढविला त्यानंतर जमा झालेल्या नागरिकांची एकावर धाव घेत जीवघेणा हल्ला केला मात्र नागरिकांनी दाखवलेल्या धाडसमुळे वाघ तिथून जंगलाच्या दिशेने पळाला मात्र तो जंगलात न जाता अजूनही या परिसरात असल्याच् पाऊल खुणा दिसत आहेत.
वन विभागाने 5 पथकासह त्याचा शोध सुरू केला आहे तसेच शार्प शूटर च्या माध्यमातून त्याला बेशुद्ध करण्याचे काम वन विभागाने सुरू केले आहे मात्र जो पर्यंत त्याला पकडल्या जात नाही तो पर्यंत या परिसरातील नागरिकांमध्ये वाघाची दहशत कायम राहणार आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.