ETV Bharat / state

बीडमध्ये बोगस मतदारांवरुन राडा, मतदारांना अडवून दमदाटी

मतदारांना पाटोदाचे मतदान राजुरीत कसे म्हणत संदीप क्षिरसागर यांनी अडवले होते. या वेळीचा व्हिडिओ व्हायरल झाला.

author img

By

Published : Oct 21, 2019, 3:10 PM IST

मतदारांना अडवून दमदाटी

बीड - बीड विधानसभा मतदार संघातील राजुरी येथे मतदानाच्या दरम्यान गोंधळ निर्माण झाला होता. या वेळी मतदारांच्या ओळख पत्रावरुन बाचाबाची देखील झाली. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. सदरील व्हिडिओ बीड विधानसभा मतदारसंघातील राजुरी येथील आहे. यावेळी मतदारांना पाटोदाचे मतदान राजुरीत कसे म्हणत संदीप क्षिरसागर यांनी अडवले होते.

मतदारांना अडवून दमदाटी

बोगस मतदारांवरुन बीडमध्ये क्षीरसागर गटात जुंपली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्यावर बोगस मतदानासाठी त्यांच्या महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचा वापर करत असल्याचा आरोप केला आहे. जयदत्त क्षीरसागर हे त्यांच्या महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना बोगस मतदानासाठी आणत असल्याचा आरोप संदीप यांनी केला आहे.

हेही वाचा- विरोधी पक्ष दिसतच नाही, निवडणुकीमध्ये भाजप शिवसेनेचे वर्चस्व - पियूष गोयल

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार - 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750, महिला मतदार - 4 कोटी 28 लाख 43 हजार 635, तृतीयपंथी मतदार- 2 हजार 634 आहेत, दिव्यांग मतदार - 3 लाख 96 हजार आहेत, सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत.

या निवडणुकीसाठी राज्यभरात तब्बल 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.

बीड - बीड विधानसभा मतदार संघातील राजुरी येथे मतदानाच्या दरम्यान गोंधळ निर्माण झाला होता. या वेळी मतदारांच्या ओळख पत्रावरुन बाचाबाची देखील झाली. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. सदरील व्हिडिओ बीड विधानसभा मतदारसंघातील राजुरी येथील आहे. यावेळी मतदारांना पाटोदाचे मतदान राजुरीत कसे म्हणत संदीप क्षिरसागर यांनी अडवले होते.

मतदारांना अडवून दमदाटी

बोगस मतदारांवरुन बीडमध्ये क्षीरसागर गटात जुंपली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्यावर बोगस मतदानासाठी त्यांच्या महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचा वापर करत असल्याचा आरोप केला आहे. जयदत्त क्षीरसागर हे त्यांच्या महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना बोगस मतदानासाठी आणत असल्याचा आरोप संदीप यांनी केला आहे.

हेही वाचा- विरोधी पक्ष दिसतच नाही, निवडणुकीमध्ये भाजप शिवसेनेचे वर्चस्व - पियूष गोयल

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार - 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750, महिला मतदार - 4 कोटी 28 लाख 43 हजार 635, तृतीयपंथी मतदार- 2 हजार 634 आहेत, दिव्यांग मतदार - 3 लाख 96 हजार आहेत, सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत.

या निवडणुकीसाठी राज्यभरात तब्बल 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.

Intro:बीड..

बीड विधानसभा मतदार संघातील राजुरी येथे मतदानाच्या दरम्यान गोंधळ निर्माण झाला होता. या वेळी मतदारांच्या ओळख पत्रावरून बाचाबाची देखील झाली. परिस्थिती नियंत्रणात आहे. सदरील व्हिडिओ बीड विधानसभा मतदारसंघातील राजुरी येथील आहे....
यावेळी मतदार यांना पाटोदा चे मतदान राजुरी तसे असे म्हणत संदीप क्षिरसागर यांनी यांनी अडवले होते.Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.