औरंगाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणू विरोधात लढण्यासाठी देशातील जनतेला रविवारी रात्री ९ वाजता दिवे लावा, असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनला जिल्ह्यातील कन्नड येथे घराघरातून प्रतिसाद मिळाला. येथील प्रत्येक घरात दिवाळी साजरी व्हावी, असे दृश्य होते.
कोरोना विषाणू विरोधात लढण्यासाठी नागरिकांमध्ये प्रेरणा निर्माण व्हावी, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात जनतेला लाईट बंद करून काही वेळासाठी टॉर्च, दिवे, मेणबत्ती लावण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला.
![public respond to pm modi's lighting lamp in aurangabad](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/9_05042020214708_0504f_1586103428_795.jpg)