ETV Bharat / state

'दहा रुपयांची भीक टाकण्याइतका महाराष्ट्र भिकारी झाला नाही'

पैठण विधानसभेचे उमेदवार दत्ता गोर्डे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी गागाभट्ट चौकात खासदार अमोल कोल्हेंच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी १० रुपयांच्या जेवणाच्या थाळीवरून शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला.

author img

By

Published : Oct 17, 2019, 8:04 AM IST

डॉ. अमोल कोल्हे

औरंगाबाद - महाराष्ट्राचा युवक सांगतो 10 रुपयांची भीक आमच्या समोर टाकण्याइतका महाराष्ट्र भिकारी झालेला नाही. मनगटात ताकद आहे. हिम्मत द्यायचीच असेल, तर 10 रुपयांच्या थाळीची भीक देऊ नका. आमच्या हक्काचा रोजगार द्या. रोजगार दिला, तर 10 रुपयाची काय, 100 रुपयांची थाळी घेण्याची आमची कुवत आहे, असे म्हणत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेच्या 10 रुपयांच्या थाळीवर हल्लाबोल केला. पैठण विधानसभेचे उमेदवार दत्ता गोर्डे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी गागाभट्ट चौकात खासदार कोल्हेंच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

'दहा रुपयांची भीक टाकण्याइतका महाराष्ट्र भिकारी झाला नाही'

सरकारकडे रोजगार मंत्रालय आहे. या रोजगार मंत्रालयाने काय केले? असाही प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. युती सरकारने कर्जमाफीच्या फुसक्या गप्पा मारून लोकांना ऊल्लू बनवले. कोणालाच कर्जमाफीचा फायदा झाला नाही. या सरकारमुळे उलट राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, या फसव्या आश्वासन देणाऱ्या सरकारला झोप लागली होती का? असा सवाल देखील कोल्हे यांनी यावेळी उपस्थित केला.

हे वाचलं का? - पवार साहेबांनी काय केलं हे 'उपऱ्यां'नी विचारू नये; मोदी-शाहांवर कोल्हेंचा निशाणा

मत मागण्यासाठी आधी ऑनलाईन अर्ज करा -
शेतकऱ्याचे कर्ज माफीसाठी एक नाही, तर 66 किचकट अटी ऑनलाईन अर्जासाठी टाकल्या. आता मत मागायला शिवसेना, भाजपचे लोक येतील त्यांना सांगा आधी ऑनलाइन अर्ज करा. येतांनी आधार कार्ड सोबत आना. मग मत मागायला या, तेव्हा आम्ही विचार करून मतदान करू. आम्ही कर्ज माफी मागायला दारात आलो होतो. तेव्हा वेळ तुमची होती. आता आमची वेळ आहे, असे ठणकावून सांगा, अशी युक्ती देखील यावेळी अमोल कोल्हे यांनी सांगितली.

हे वाचलं का? - किती बी ताण येत नाही बाण; अमोल कोल्हेचा शिवसेनेवर घणाघात

जाहिरात बघून सरकार विकत घ्यायचे नसते -
'हिच वेळ आहे महाराष्ट्र घडवण्याची' अशी जाहिरातबाजी शिवसेना करते. मात्र, जाहीरात बघून साबण, तेल विकत घ्यायचे असते. सरकार नाही, असा टोला देखील अमोल कोल्हे यांनी यावेळी लगावला. त्यातच विद्यमान सरकार म्हणतंय राम मंदिर बांधू. मात्र, निवडणुकीमध्ये राम मंदिराचा मुद्दा पुढे केला जात आहे. राम मंदिर झालेच पाहीजे. मात्र, आधी शेतकऱ्यांचा प्रश्न निकाली काढावा. राम मंदिर बांधून तरुणांना रोजगार मिळणार आहे का? शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल का? असा प्रश्न देखील खासदार कोल्हेंनी यावेळी उपस्थित केला.

औरंगाबाद - महाराष्ट्राचा युवक सांगतो 10 रुपयांची भीक आमच्या समोर टाकण्याइतका महाराष्ट्र भिकारी झालेला नाही. मनगटात ताकद आहे. हिम्मत द्यायचीच असेल, तर 10 रुपयांच्या थाळीची भीक देऊ नका. आमच्या हक्काचा रोजगार द्या. रोजगार दिला, तर 10 रुपयाची काय, 100 रुपयांची थाळी घेण्याची आमची कुवत आहे, असे म्हणत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेच्या 10 रुपयांच्या थाळीवर हल्लाबोल केला. पैठण विधानसभेचे उमेदवार दत्ता गोर्डे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी गागाभट्ट चौकात खासदार कोल्हेंच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

'दहा रुपयांची भीक टाकण्याइतका महाराष्ट्र भिकारी झाला नाही'

सरकारकडे रोजगार मंत्रालय आहे. या रोजगार मंत्रालयाने काय केले? असाही प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. युती सरकारने कर्जमाफीच्या फुसक्या गप्पा मारून लोकांना ऊल्लू बनवले. कोणालाच कर्जमाफीचा फायदा झाला नाही. या सरकारमुळे उलट राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, या फसव्या आश्वासन देणाऱ्या सरकारला झोप लागली होती का? असा सवाल देखील कोल्हे यांनी यावेळी उपस्थित केला.

हे वाचलं का? - पवार साहेबांनी काय केलं हे 'उपऱ्यां'नी विचारू नये; मोदी-शाहांवर कोल्हेंचा निशाणा

मत मागण्यासाठी आधी ऑनलाईन अर्ज करा -
शेतकऱ्याचे कर्ज माफीसाठी एक नाही, तर 66 किचकट अटी ऑनलाईन अर्जासाठी टाकल्या. आता मत मागायला शिवसेना, भाजपचे लोक येतील त्यांना सांगा आधी ऑनलाइन अर्ज करा. येतांनी आधार कार्ड सोबत आना. मग मत मागायला या, तेव्हा आम्ही विचार करून मतदान करू. आम्ही कर्ज माफी मागायला दारात आलो होतो. तेव्हा वेळ तुमची होती. आता आमची वेळ आहे, असे ठणकावून सांगा, अशी युक्ती देखील यावेळी अमोल कोल्हे यांनी सांगितली.

हे वाचलं का? - किती बी ताण येत नाही बाण; अमोल कोल्हेचा शिवसेनेवर घणाघात

जाहिरात बघून सरकार विकत घ्यायचे नसते -
'हिच वेळ आहे महाराष्ट्र घडवण्याची' अशी जाहिरातबाजी शिवसेना करते. मात्र, जाहीरात बघून साबण, तेल विकत घ्यायचे असते. सरकार नाही, असा टोला देखील अमोल कोल्हे यांनी यावेळी लगावला. त्यातच विद्यमान सरकार म्हणतंय राम मंदिर बांधू. मात्र, निवडणुकीमध्ये राम मंदिराचा मुद्दा पुढे केला जात आहे. राम मंदिर झालेच पाहीजे. मात्र, आधी शेतकऱ्यांचा प्रश्न निकाली काढावा. राम मंदिर बांधून तरुणांना रोजगार मिळणार आहे का? शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल का? असा प्रश्न देखील खासदार कोल्हेंनी यावेळी उपस्थित केला.

Intro:पैठण येथे खा अमोल कोल्हे यांचा शिवसेना वर दहा रुपयाची थळीवर जोरदार हल्ला.

१६ हजार शेतक-यांच्या आत्महत्त्येस कारणीभूत असणा-या सरकारला जागा दखवा ...डॉ. खा कोल्हे


औरंगाबाद :कॉग्रेस .राष्ट्रवादी व रिपाई महाआघाडिचे पैठण विधानसभेचे उमेदवार दत्ता गोर्डे यांच्या प्रचारार्थ दि १५ मंगळवार रोजी गागाभट्ट चौक येथे आयोजित सभेत शिवसेनेची दहा रुपयाची थाली सुरु करु अशी घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या 10 रुपयांच्या थालीचा चांगलाच खरतडून समाचार पैठण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय गोर्डे यांच्या प्रचार सभेत घेतला यावेळी ते म्हणाले महाराष्ट्राचा युवक सांगतो दहा रुपयाची भीक आमच्या समोर टाकण्याइतका महाराष्ट्र भिकारी झालेला नाही मनगटात ताकत आहे उरात हीमत द्यायचीच असेल तर दहा रुपयाची थाळीची भीक देऊ नका आमच्या हक्काचा रोजगार द्या जर रोजगार दिला तर दहा रुपयाची काय शंभर रुपयाची थाळी घेण्याची आमची कुवत आहे.सरकारकडे रोजगार मंत्रालय आहे या रोजगार मंत्रालय ने काय केलं असाही प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला तर युती सरकारने कर्ज माफिच्या फुसक्या गप्पा मारून लोकांना ऊल्लू बनवले असून कोणालाच कर्ज माफिचा फायदा झाला नसून या सरकार मुळे उलट राज्यात १६ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू या फसव्या आश्वासन देणाऱ्या सरकारला झोप लागली होती का, शेतकऱ्याचे कर्ज माफीसाठी एक नाही तर 66 किचकट अटी ऑनलाइन अर्जा साठी टाकल्या आता मत मागायला शिवसेना भाजपाचे लोक येथील त्यांना सांगा आधी ऑनलाइन अर्ज करा येतांनी आधार कार्ड सोबत आना मग मत मागायला या तेंव्हा आम्ही तत्त्वत हा विचार करून मतदान करू
जेव्हा आम्ही दारात आलो होतो कर्ज माफी मागायला तेव्हा वेळ तुमची होती अशा सरकारला त्यांची जागा दाखवा असे प्रतिपादन आयोजित सभेत केले Body:यावेळी माजी मंत्री अनिल पटेल ,आ .सतिष चव्हाण ,माजी आमदार चंद्रकांत घोडके . रविंद्र काळे .अप्पासाहेब निर्मळ.विनोद तांबे विलास शेळके, आदींची प्रमुख उपस्थिती होती .
कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना उमेदवार दत्ता गोर्डे़नी शिवसेनेचे आमदार संदिपान भुमरेवर निशाना साधत २५ वर्षात भुमरेंनी तालुका भकास केला असून मला फक्त पाच वर्ष संधी द्या मी तुम्हाला विकास काय असतो ! तो दाखवतो अशी भावनिक साद घातली .

तर पुढे बोलतांना डॉ .खा .अमोल कोल्हे म्हणाले की शिवसेना जाहिरात बाजी करते की हिच वेळ आहे महाराष्ट्र घडवण्याची .तर मग अतापर्यंत याच सरकार होत .तेव्हा काय दिवे लावले .अहो ! जाहिरात बघून साबन व तेल विकत घेयाचं असतं .सरकार नाही असा मार्मीक टोला देखील त्यानी लगावला .त्यातच पैठण शहरात अशिया खंडातील सर्वात विशाल जलाशय आहे व तरी देखील तालुक्यात दोनशे टॅकर सुरू आहेत .त्यातच पैठणचं वैभव असणारी पैठणीसाडी हि मुळ ईथली असून तिचं क्लस्टर येवला येथे निर्माण होवून हजारो हातांना रोजगार मिळतो मात्र तुमच्याकडे लोकप्रतिनिधी उदासिन आहेत हे तुमचं दुर्दैव आहे .असा आमदार तुम्ही पुन्हा निवडून देवू नका .विद्यमान सरकार म्हणतंय राम मंदिर बांधू .जरूर बांधा पण लेकिन मौका सबको मिलता है ,आता वेळ आमची आहे असे सांगून निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिराचा मुद्दा पुढे करत आता राम मंदिर बांधण्याचे हालचाल सुरू करता,राम मंदिर तर झालंच पाहिजे पण आधी शेतकऱ्यांचा प्रश्न निकाली काढावा राम मंदिर बांधून तरुणांना रोजगार मिळेल का ? शेतकऱ्यांच्या कर्जमाफी होईल का?, तरुणांनो तुम्हीच आता विचार करायची वेळ आली आहे या फसव्या सरकारच्या भावनिकतेला आता साद घालू नका असे बोलून पैठण मतदार संघात नवीन चेहर्याला राष्ट्रवादी ने संधी दिली त्यासाठी हवा बदला आणि राष्ट्रवादीला संधी द्या नक्कीच या संधीचं सोनं दत्ता गोर्डे यांच्या रूपाने होईल असे आश्वासन देतो.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.