ETV Bharat / state

मराठा आंदोलनाचा राम मंदिर सोहळ्याशी संबंध नाही - मनोज जरांगे

Manoj Jarange : मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून परत जाणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलीय. तसंच मराठा आंदोलनाचा राम मंदिर सोहळ्याशी काहीच संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 27, 2023, 7:20 PM IST

Manoj Jarange
Manoj Jarange
मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर Manoj Jarange : आम्ही मराठा आरक्षणासाठी 20 जानेवारीला मुंबईत उपोषणाची सुरुवात करणार आहोत. मात्र, या आंदोलनाचा राम मंदिर सोहळ्याशी काहीच संबंध नसल्याचं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. राम मंदिर सोहळा अभिमानाचा कार्यक्रम आहे, आम्ही पण धर्माला मानतो. 18 जानेवारीपर्यंत मुंबईत कलम 144 लागू असल्यानं 20 जानेवारी तारीख ठरवली. आतापर्यंत मुदत दिल्याचा 54 लाख लोकांना फायदा झालाय. आमच्या आंदोलनाचं नियोजन करण्यासाठी आम्हाला वेळ हवा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठी माणसं आहेत, त्यांना मराठ्यांशी काही देणं घेणं नाही, असा आरोप मनोज जरांगे यांनी केलाय. ते आज छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते.

गोळी घातली, तरी माघार नाही : मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे. आम्हाला वाटत नाही की, आम्हाला लवकर आरक्षण मिळेल. आम्हाला मुंबईला येण्याची हौस नाही. मात्र, मराठा समाजातील युवकांना न्याय देण्यासाठी मुंबईत यावं लागणार आहे. मुंबईत मुंग्यासारखे मराठे रस्त्यावर उतरणार आहेत. आम्हाला गोळ्या घातल्या तरी, आम्ही मागं हटणार नाही. मुंबईतील आंदोलनासाठी मराठा समाजाच्या प्रत्येकाला पायी घेऊन मुंबईत जाणार, असा निर्धार देखील मनोज जरांगे यांनी व्यक्त केलाय. एकदा आम्ही मुंबईत गेल्यावर आरक्षण घेतल्याशिवाय परतणार नाही. आरक्षण न दिल्यास युवकांचे हाल होतील. त्यामुळं मराठा आरक्षणासाठी सर्वांनी आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असं जरांगे पाटील म्हणाले.

मोदींकडून पाठ थोपटून घ्यायची : सरकारमधील मंत्री माझ्याकडं येताना चांगलं बोलतात, मात्र माघारी वेगळंच बोलतात, असं माघारी बोलू नका. नोंदी शोधताना भाषेची अडचण दूर करण्यासाठी सॉफ्टवेअर देणार असल्याचं म्हटलं होतं. ते सरकारनं दिलं का? असा प्रश्न मनोज जरांगे यांनी सरकारला विचारला. आरक्षण मिळवणं म्हणजे मुलांसाठी आयुष्याची संपत्ती जमा करणं आहे. आमच्या आयोजकांवर, आंदोलकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. नरेंद्र मोदी यांच्याकडून पाठ थोपटून घेण्यासाठी पोलीस कारवाई करत आहेत. विनाकारण गुन्हे दाखल करू नका. एकट्याचं ऐकण्यासाठी मराठ्यांचा रोष ओढून घेऊ नका, अंतरवली सारखा प्रयोग करू नका, ट्रॅक्टर चालकांवर गुन्हा दाखल करण्याचं कारण काय, असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलंय.

हेही वाचा -

  1. कसा झाला राष्ट्रवादीत राजकीय भूकंप? अजित पवारांच्या बंडखोरीमागं कुणाचा हात?
  2. अजित पवारांची निधी वाटपात मनमानी, भाजपा, शिवसेना सदस्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
  3. युवा शेतकऱ्यानं एका गुंठ्यात घेतलं 3 टनापेक्षा जास्त ऊसाचं उत्पादन, जाणून घ्या काय केल्या उपाययोजना

मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर Manoj Jarange : आम्ही मराठा आरक्षणासाठी 20 जानेवारीला मुंबईत उपोषणाची सुरुवात करणार आहोत. मात्र, या आंदोलनाचा राम मंदिर सोहळ्याशी काहीच संबंध नसल्याचं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. राम मंदिर सोहळा अभिमानाचा कार्यक्रम आहे, आम्ही पण धर्माला मानतो. 18 जानेवारीपर्यंत मुंबईत कलम 144 लागू असल्यानं 20 जानेवारी तारीख ठरवली. आतापर्यंत मुदत दिल्याचा 54 लाख लोकांना फायदा झालाय. आमच्या आंदोलनाचं नियोजन करण्यासाठी आम्हाला वेळ हवा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठी माणसं आहेत, त्यांना मराठ्यांशी काही देणं घेणं नाही, असा आरोप मनोज जरांगे यांनी केलाय. ते आज छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते.

गोळी घातली, तरी माघार नाही : मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे. आम्हाला वाटत नाही की, आम्हाला लवकर आरक्षण मिळेल. आम्हाला मुंबईला येण्याची हौस नाही. मात्र, मराठा समाजातील युवकांना न्याय देण्यासाठी मुंबईत यावं लागणार आहे. मुंबईत मुंग्यासारखे मराठे रस्त्यावर उतरणार आहेत. आम्हाला गोळ्या घातल्या तरी, आम्ही मागं हटणार नाही. मुंबईतील आंदोलनासाठी मराठा समाजाच्या प्रत्येकाला पायी घेऊन मुंबईत जाणार, असा निर्धार देखील मनोज जरांगे यांनी व्यक्त केलाय. एकदा आम्ही मुंबईत गेल्यावर आरक्षण घेतल्याशिवाय परतणार नाही. आरक्षण न दिल्यास युवकांचे हाल होतील. त्यामुळं मराठा आरक्षणासाठी सर्वांनी आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असं जरांगे पाटील म्हणाले.

मोदींकडून पाठ थोपटून घ्यायची : सरकारमधील मंत्री माझ्याकडं येताना चांगलं बोलतात, मात्र माघारी वेगळंच बोलतात, असं माघारी बोलू नका. नोंदी शोधताना भाषेची अडचण दूर करण्यासाठी सॉफ्टवेअर देणार असल्याचं म्हटलं होतं. ते सरकारनं दिलं का? असा प्रश्न मनोज जरांगे यांनी सरकारला विचारला. आरक्षण मिळवणं म्हणजे मुलांसाठी आयुष्याची संपत्ती जमा करणं आहे. आमच्या आयोजकांवर, आंदोलकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. नरेंद्र मोदी यांच्याकडून पाठ थोपटून घेण्यासाठी पोलीस कारवाई करत आहेत. विनाकारण गुन्हे दाखल करू नका. एकट्याचं ऐकण्यासाठी मराठ्यांचा रोष ओढून घेऊ नका, अंतरवली सारखा प्रयोग करू नका, ट्रॅक्टर चालकांवर गुन्हा दाखल करण्याचं कारण काय, असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलंय.

हेही वाचा -

  1. कसा झाला राष्ट्रवादीत राजकीय भूकंप? अजित पवारांच्या बंडखोरीमागं कुणाचा हात?
  2. अजित पवारांची निधी वाटपात मनमानी, भाजपा, शिवसेना सदस्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
  3. युवा शेतकऱ्यानं एका गुंठ्यात घेतलं 3 टनापेक्षा जास्त ऊसाचं उत्पादन, जाणून घ्या काय केल्या उपाययोजना
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.