ETV Bharat / state

उस्मानाबादमध्ये रंगणार 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - उस्मानाबाद

93 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये होणार असल्याची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले यांनी केली आहे.

उस्मानाबादमध्ये रंगणार 93 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन
author img

By

Published : Jul 22, 2019, 4:25 PM IST

Updated : Jul 22, 2019, 5:17 PM IST

औरंगाबाद - 93 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये होणार असल्याची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले यांनी केली आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. जानेवारी 2020 मध्ये हे साहित्य संमेलन होणार आहे.

उस्मानाबादमध्ये रंगणार 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

औरंगाबादच्या मराठवाडा साहित्य परिषद कार्यालयात 93 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन घेण्याबाबत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील विविध साहित्य मंडळाचे सर्वच सदस्य उपस्थित होते. जवळपास दीड तास चाललेल्या बैठकीत जानेवारी महिन्यात साहित्य संमेलन घेण्याबाबत एक निर्णय घेण्यात आला.

गेली 8 वर्षे उस्मानाबादला साहित्य संमेलनाची प्रतिक्षा होती. मात्र, कधी दुष्काळ तर कधी अजून काही यामुळे ते डावलले जात होते. मात्र, यावेळी 19 सदस्यांचे एकमत झाल्याने साहित्य संमेलन उस्मानाबादला रंगणार असल्याचे घोषित झाले. त्यामुळे उस्मानाबादला साहित्य संमेलनाचा मान मिळाल्यामुळे आनंद झाल्याचे कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितले.

याबरोबरच नाशिकच्या साहित्य प्रेमींनीदेखील साहित्य संमेलन नाशिकमध्ये भरवण्याची मागणी केली होती. मात्र, सर्व सदस्यांनी यावेळी उस्मानाबादला साहित्य संमेलन घेण्याबाबत सहमती दर्शवली असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले यांनी सांगितले. जानेवारी 2020 मध्ये हे साहित्य संमेलन होणार असून तारीख अद्याप निश्चित झाली नाही.

औरंगाबाद - 93 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये होणार असल्याची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले यांनी केली आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. जानेवारी 2020 मध्ये हे साहित्य संमेलन होणार आहे.

उस्मानाबादमध्ये रंगणार 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

औरंगाबादच्या मराठवाडा साहित्य परिषद कार्यालयात 93 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन घेण्याबाबत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील विविध साहित्य मंडळाचे सर्वच सदस्य उपस्थित होते. जवळपास दीड तास चाललेल्या बैठकीत जानेवारी महिन्यात साहित्य संमेलन घेण्याबाबत एक निर्णय घेण्यात आला.

गेली 8 वर्षे उस्मानाबादला साहित्य संमेलनाची प्रतिक्षा होती. मात्र, कधी दुष्काळ तर कधी अजून काही यामुळे ते डावलले जात होते. मात्र, यावेळी 19 सदस्यांचे एकमत झाल्याने साहित्य संमेलन उस्मानाबादला रंगणार असल्याचे घोषित झाले. त्यामुळे उस्मानाबादला साहित्य संमेलनाचा मान मिळाल्यामुळे आनंद झाल्याचे कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितले.

याबरोबरच नाशिकच्या साहित्य प्रेमींनीदेखील साहित्य संमेलन नाशिकमध्ये भरवण्याची मागणी केली होती. मात्र, सर्व सदस्यांनी यावेळी उस्मानाबादला साहित्य संमेलन घेण्याबाबत सहमती दर्शवली असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले यांनी सांगितले. जानेवारी 2020 मध्ये हे साहित्य संमेलन होणार असून तारीख अद्याप निश्चित झाली नाही.

Intro:93 वं अखिल भारतीय साहित्य संमेलन उस्मानाबादला होणार असल्याची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले यांनी केली, औरंगाबादेत पत्रकार परिषद घेत त्यांनी ही घोषणा केली, जानेवारी 2020 मध्ये हे साहित्य संमेलन होणार आहे, यावेळी साहित्य संमेलन घेण्याचा मान उस्मानाबादला देण्यात आला.

Body:गेली 8 वर्ष उस्मानाबाद ला प्रतीक्षा होती मात्र कधी दुष्काळ तर कधी अजून काही या मूळ ते डावलल्या जातं होतं मात्र यावेळी 19 सदस्यांच एकमत झाले आणि अखेर साहित्य संमेलन उस्मानाबाद ला रंगणार हे घोषित झालं, उस्मानाबाद ला कदाचित आता पर्यंत ऐपत नसावी म्हणून मिळालं नसेल मात्र यावेळी हा निर्णय झाला याचा आनंद असल्याचं सुद्धा कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितलंConclusion:औरंगाबादच्या मराठवाडा साहित्य परिषद कार्यालयात 93 वं अखिल भारतीय साहित्य संमेलन घेण्याबाबत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील विविध साहित्य मंडळाचे सर्वच सदस्य उपस्थित राहिले होते. जवळपास दीड तास चालल्या बैठकीत जानेवारी महिन्यात साहित्य संमेलन घेण्याबाबत एक निर्णय घेण्यात आला. गेल्या आठ वर्षांपासून उस्मानाबादला साहित्य संमेलन घ्याव अशी मागणी उस्मानाबाद येथील साहित्य प्रेमींची होती. मात्र दुष्काळामुळे उस्मानाबादला साहित्य संमेलन घेण्याच टाळण्यात येत होत. त्याचबरोबर नाशिकच्या साहित्य प्रेमींनी देखील साहित्य संमेलन नाशिकला भरवण्याची मागणी केली होती मात्र सर्व सदस्यांनी यावेळी उस्मानाबादला साहित्य संमेलन घेण्याबाबत सहमती दर्शवली असल्याच महामंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले यांनी सांगितलं. जानेवारी 2020 मध्ये हे साहित्य संमेलन होणार असून तारीख निश्च्छित अद्याप झालेली नाही. मात्र यावेळी मान मिळाल्याने उस्मानाबाद साहित्य संमेलन सदस्यांनी मात्र आनंद व्यक्त केलाय.

byte - कौतिकराव ठाले पाटील - अध्यक्ष मराठवाडा साहित्य मंडळ
byte - नितीन तावडे - अध्यक्ष उस्मानाबाद शाखा
(feed send from ftp)
mh_aur_1_sahitya_sammelan_vis & byte
Last Updated : Jul 22, 2019, 5:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.