अमरावती - पावसाळा लागला की शेताच्या बांधावर विविध प्रकारच्या पौष्टीक रानभाज्या उगवत असतात. या रानभाज्या आरोग्यासाठी अति उत्तम असतात. सोबतच अनेक आजारांवर औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांचे महत्व दिवसेंदिवस कमी होत चाललं आहे. मात्र ग्रामीण भागापासून ते शहरा पर्यतच्या लोकांना रानभाज्याचे महत्व कळावे या हेतुने राज्यसरकार कडून रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. अमरावती मधेही आज कृषी विभागाच्या वतीने भव्य रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात शेतकऱ्यांनी तबल ५३ प्रकारच्या रानभाज्या या विक्रीसाठी आणल्या होत्या. या महोत्सवातही मेळघाटातील रानभाज्याचा डंका पाहायला मिळाला. या कार्यक्रमाचे उट्घाटन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले.
राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतुन रानभाज्याचा महोत्सव हा 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान राज्यभरात राबवला जातो. त्याच पार्श्वभूमीवर या महोत्सवाचे आयोजन आज अमरावती जवळील वलगाव येथे करन्यात आले होते. यावेळी बोलताना मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की दिवसेंदिवस आपण रासायनिक कडे वळलो आहे. त्यामुळे नैसर्गिक आणि पौष्टीक रानभाज्या मागे पडत चालल्या आहे. परंतु आता या महोत्सवाच्या माध्यमातून मात्र लोकांना या रानभाज्याचे महत्व कळत आहे. प्रत्येकांनी पावसाळ्यात रानभाज्या या खाल्या पाहिजे, असेही मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.
![रानभाजी महोत्सव](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-am-01-amravati-10016_14082021152023_1408f_1628934623_1035.jpg)
रानभाज्याच्या मार्केटिंग ला चालना देणार -