ETV Bharat / state

अमरावती विधानसभा आढावा : आमदार डॉ. सुनील देशमुख यांना कोण आव्हान देणार?

राज्यात विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत. यामुळे अनेक इच्छुक मंडळी आपल्यालाच विधानसभेचे तिकीट मिळावे याकरता गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. मात्र, सध्या अमरावती मतदारसंघात सुरू असणाऱ्या रंगतदार घडामोडी पाहता आमदार डॉ. सुनील देशमुख यांना नेमके कोण आव्हान देणार याची उत्सुकता अमरावतीकरांना आहे.

author img

By

Published : Sep 4, 2019, 10:17 AM IST

Updated : Sep 4, 2019, 11:16 AM IST

रावसाहेब शेखावत आणि डॉ. सुनील देशमुख

अमरावती - देशात आणि राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षाचे नेते भाजपात प्रवेश करत आहेत. ही सर्व पळापळ लाचारी किंवा आपले काळे कृत्य झाकण्यासाठी होत आहे. असे असले तरी अमरावती विधानसभा मतदारसंघात मात्र स्वतःच्या स्वाभिमानासाठी पाच वर्षांपूर्वी काँग्रेसचे डॉ. सुनील देशमुख यांनी भाजपची दीक्षा घेतली होती.

आमचे प्रतिनिधी शशांक लावरे यांनी अमरावती मतदारसंघाचा विधानसभेसाठी ग्राऊंड झिरोवरुन घेतलेला आढावा

डॉ. सुनील देशमुख यांच्या माध्यमातून काँग्रेसचा विदर्भातील मोठा चेहरा पहिल्यांदा भाजपवासी झाला. काँग्रेसचा गड असणाऱ्या अमरावती विधानसभा मतदारसंघवर 1990 आणि 1995 च्या निवडणुकीत पहिल्यांदा भाजपचा झेंडा फडकला होता. अमरावती महापालिकेतही भाजपचे वर्चस्व होते. भाजपच्या या तगड्या आव्हानाला 1999 च्या निवडणुकीत डॉ. सुनील देशमुख यांनी छेद देत अमरावती विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा नव्याने फडकविला. आज मात्र डॉ. सुनील देशमुख यांच्या माध्यमातून अमरावती विधानसभा मतदारसंघ भाजपमय झाला आहे.

हेही वाचा-ठाणे विधानसभा आढावा : ठाणे शहराचा बालेकिल्ला कोण सर करणार? भाजप सेनेत चढाओढ

2019 च्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वी डॉ. सुनील देशमुख यांचे कट्टर विरोधक रावसाहेब शेखावत यांनी जणू नांगी टाकल्याचे वातावरण आहे. असे असताना काँग्रेसच्या हक्काची अमरावती विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांनी फिल्डिंग लावली आहे. यामुळेच बडनेरा मतदारसंघात तीन वेळा निवडणूक लढविणाऱ्या सुलभा खोडके यांची अमरावती विधानसभा मतदारसंघात एन्ट्री झाल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.

हेही वाचा-गडचिरोली विधानसभा आढावा: भाजप गड राखणार की काँग्रेसला मिळणार गतवैभव?

अद्याप अमरावती मतदारसंघात निवडणुकीसंदर्भातील वातावरण शांत असले तरी काँग्रेसमध्ये निर्माण झालेली पक्षांतर्गत खदखद तसेच डॉ. सुनील देशमुख यांच्या ऐवजी आम्हाला उमेदवारी मिळावी म्हणून भाजपच्या अकरा कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी पक्षाकडे प्रकट केलेली इच्छा, हे सर्व पाहता अमरावती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक नक्कीच रंगतदार वळण घेईल असे चित्र आहे. सध्या मतदारसंघात सुरू असणाऱ्या रंगतदार घडामोडी पाहता आमदार डॉ. सुनील देशमुख यांना नेमके कोण आव्हान देणार याची उत्सुकता अमरावतीकरांना आहे.

हेही वाचा-शिर्डी विधानसभा आढावा: विखेंना शह देण्यासाठी सत्यजित तांबे सज्ज?

अमरावती विधानसभा मतदार संघ 2014 चा निकाल

डॉक्टर सुनील देशमुख भाजप - 84 हजार 33
रावसाहेब शेखावत काँग्रेस - 48 हजार 961
अख्तर मिर्झा नवीन बॅग बसपा - 11 हजार 585
प्रदीप बाजड शिवसेना -8 256
गणेश खारकर - 1 हजार 30


मतदार संख्या

पुरुष - 1 लाख 74 हजार 57
महिला - 1 लाख 64 हजार 671
तृतीयपंथी - 13
एकुण मतदार- 3 लाख 23 हजार 242

अमरावती - देशात आणि राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षाचे नेते भाजपात प्रवेश करत आहेत. ही सर्व पळापळ लाचारी किंवा आपले काळे कृत्य झाकण्यासाठी होत आहे. असे असले तरी अमरावती विधानसभा मतदारसंघात मात्र स्वतःच्या स्वाभिमानासाठी पाच वर्षांपूर्वी काँग्रेसचे डॉ. सुनील देशमुख यांनी भाजपची दीक्षा घेतली होती.

आमचे प्रतिनिधी शशांक लावरे यांनी अमरावती मतदारसंघाचा विधानसभेसाठी ग्राऊंड झिरोवरुन घेतलेला आढावा

डॉ. सुनील देशमुख यांच्या माध्यमातून काँग्रेसचा विदर्भातील मोठा चेहरा पहिल्यांदा भाजपवासी झाला. काँग्रेसचा गड असणाऱ्या अमरावती विधानसभा मतदारसंघवर 1990 आणि 1995 च्या निवडणुकीत पहिल्यांदा भाजपचा झेंडा फडकला होता. अमरावती महापालिकेतही भाजपचे वर्चस्व होते. भाजपच्या या तगड्या आव्हानाला 1999 च्या निवडणुकीत डॉ. सुनील देशमुख यांनी छेद देत अमरावती विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा नव्याने फडकविला. आज मात्र डॉ. सुनील देशमुख यांच्या माध्यमातून अमरावती विधानसभा मतदारसंघ भाजपमय झाला आहे.

हेही वाचा-ठाणे विधानसभा आढावा : ठाणे शहराचा बालेकिल्ला कोण सर करणार? भाजप सेनेत चढाओढ

2019 च्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वी डॉ. सुनील देशमुख यांचे कट्टर विरोधक रावसाहेब शेखावत यांनी जणू नांगी टाकल्याचे वातावरण आहे. असे असताना काँग्रेसच्या हक्काची अमरावती विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांनी फिल्डिंग लावली आहे. यामुळेच बडनेरा मतदारसंघात तीन वेळा निवडणूक लढविणाऱ्या सुलभा खोडके यांची अमरावती विधानसभा मतदारसंघात एन्ट्री झाल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.

हेही वाचा-गडचिरोली विधानसभा आढावा: भाजप गड राखणार की काँग्रेसला मिळणार गतवैभव?

अद्याप अमरावती मतदारसंघात निवडणुकीसंदर्भातील वातावरण शांत असले तरी काँग्रेसमध्ये निर्माण झालेली पक्षांतर्गत खदखद तसेच डॉ. सुनील देशमुख यांच्या ऐवजी आम्हाला उमेदवारी मिळावी म्हणून भाजपच्या अकरा कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी पक्षाकडे प्रकट केलेली इच्छा, हे सर्व पाहता अमरावती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक नक्कीच रंगतदार वळण घेईल असे चित्र आहे. सध्या मतदारसंघात सुरू असणाऱ्या रंगतदार घडामोडी पाहता आमदार डॉ. सुनील देशमुख यांना नेमके कोण आव्हान देणार याची उत्सुकता अमरावतीकरांना आहे.

हेही वाचा-शिर्डी विधानसभा आढावा: विखेंना शह देण्यासाठी सत्यजित तांबे सज्ज?

अमरावती विधानसभा मतदार संघ 2014 चा निकाल

डॉक्टर सुनील देशमुख भाजप - 84 हजार 33
रावसाहेब शेखावत काँग्रेस - 48 हजार 961
अख्तर मिर्झा नवीन बॅग बसपा - 11 हजार 585
प्रदीप बाजड शिवसेना -8 256
गणेश खारकर - 1 हजार 30


मतदार संख्या

पुरुष - 1 लाख 74 हजार 57
महिला - 1 लाख 64 हजार 671
तृतीयपंथी - 13
एकुण मतदार- 3 लाख 23 हजार 242

Intro:देशात आणि राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षाचे नेते भाजपात डेरेदाखल होत आहेत. ही सर्व पळापळ लाचारी किंवा आपले काळे कृत्य झाकण्यासाठी होत असली तरी अमरावती विधानसभा मतदारसंघात मात्र स्वतःच्या स्वाभिमानासाठी पाच वर्षांपूर्वी काँग्रेसचे डॉ. सुनील देशमुख यांनी भाजपची दीक्षा घेतली. डॉ. सुनील देशमुख यांच्या माध्यमातून काँग्रेसचा विदर्भातील मोठा चेहरा पहिल्यांदा भाजपवासी झाला. काँग्रेसचा गड असणाऱ्या अमरावती विधानसभा मतदारसंघ 1990 आणि 1995 च्या निवडणुकीत पहिल्यांदा भाजपचा झेंडा फडकला होता. अमरावती महापालिकेतही भाजपचे वर्चस्व होते. भाजपच्या या तगड्या आव्हानाला 1999च्या निवडणुकीत डॉ. सुनील देशमुख यांनी छेद देत अमरावती विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा नव्याने फडकविला. आज मात्र डॉ. सुनील देशमुख यांच्या माध्यमातून अमरावती विधानसभा मतदारसंघ भाजपमय झाला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वी डॉ.सुनील देशमुख यांचे कट्टर विरोधक रावसाहेब शेखावत यांनी जणू नांगी टाकली आहे असे वातावरण असताना काँग्रेसच्या हक्काची अमरावती विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांनी फिल्डिंग लावली आहे. यामुळेच बडनेरा मतदार संघात तीन वेळा निवडणूक लढविणाऱ्या सुलभा खोडके यांची अमरावती विधानसभा मतदार संघात एन्ट्री झाल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. अद्याप अमरावती मतदारसंघात निवडणुकीसंदर्भातील वातावरण शांत असले तरी काँग्रेसमध्ये निर्माण झालेली पक्षांतर्गत खदखद, डॉ.सुनील देशमुख यांच्या ऐवजी आम्हाला उमेदवारी मिळावी म्हणून भाजपच्या अकरा कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी पक्षाकडे प्रकट केलेली इच्छा पाहता अमरावती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक नक्कीच रंगतदार वळण घेईल असे आज तरी वाटते आहे.सध्या मतदारसंघात सुरू असणाऱ्या रंगतदार घडामोडी पाहता आमदार डॉ. सुनील देशमुख यांना नेमके कोण आव्हान देणार याची उत्सुकता अमरावतीकरांना आहे


Body: 1999 च्या विधानसभा निवडणुकीत डॉ.सुनील देशमुख यांनी भाजपचे जगदीश गुप्ता यांचा जवळपास दहा हजार मतांनी पराभव करून अमरावती शहरात आपले वर्चस्व निर्माण केले. 1999 ते 2004 पर्यंत डॉ. सुनील देशमुख यांनी अमरावती विधानसभा मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलला. 2004 च्या निवडणुकीत डॉ.सुनील देशमुख यांना अमरावतीकरांनी पुन्हा एकदा संधी दिली. 2004 च्या निवडणुकीत डॉक्टर सुनील देशमुख यांनी भाजपचे जगदीश गुप्ता यांचा जवळपास 32 हजार मतांनी पराभव केला होता. विशेष म्हणजे त्यावेळी राज्याच्या मंत्रिमंडळात डॉ. सुनील देशमुख यांना अर्थ आणि जलसंवर्धन राज्यमंत्री म्हणून मोठी जबाबदारी मिळाली होती. 2004 ते 2009 या काळात अमरावती शहराचा विकासात्मक कायापालट झाला. शहराचा विकास कशाला म्हणतात हे पहिल्यांदा अमरावतीकरांनी अनुभवले. दरम्यानच्या काळात अमरावतीच्या प्रतिभाताई पाटील या देशाच्या राष्ट्रपती झाल्या आणि 2007-08 मध्ये पहिल्यांदा रावसाहेब शेखावत यांची अमरावतीच्या राजकारणात एन्ट्री झाली. 2009 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अमरावतीच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. अमरावती मतदारसंघातून हद्दपार झालेली काँग्रेस पुन्हा एकदा जिवंत करून अमरावतीला विकासाची गती देणारे डॉ. सुनील देशमुख यांना डावलून काँग्रेसने रावसाहेब शेखावत यांना उमेदवारी दिली. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत डॉ. सुनील देशमुख हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले. राष्ट्रपती पुत्राच्या विरोधात डॉ.सुनील देशमुख यांचीही निवडणूक देशभर चर्चेचा विषय ठरली होती. अतिशय अटीतटीच्या झालेल्या निवडणूक डॉ. सुनील देशमुख यांचा अवघ्या 5 हजार 614 मतांनी पराभव झाला होता. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष आपल्याला संधी देईल असा विश्वास डॉक्टर सुनील देशमुख यांना होता. काँग्रेस श्रेष्ठींकडून ग्रीन सिग्नल मिळण्याची त्यांनी अखेरपर्यंत वाट पाहिली. काँग्रेसचा कल यावेळीही रावसाहेब शेखावत यांच्या बाजूने दिसत असल्याने डॉ.सुनील देशमुख यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि यानंतर अमरावती शहराचे वातावरण चांगलेच तापायला लागले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सर्वत्र मोदी लाट असताना अमरावती विधानसभा मतदारसंघात मात्र मोदी लाटेपेक्षाही डॉ.सुनील देशमुख यांचाच झंजावात पाहायला मिळाला. 2014 च्यानिवडणूकीत डॉ.सुनील देशमुख यांना 84 हजार 33 तर काँग्रेसच्या रावसाहेब शेखावत यांना 48 हजार 961 मत पडलीत. 35 हजार 72 मतांनी डॉ. सुनील देशमुख यांनी मोठा विजय मिळविला.
2014 च्या निवडणुकीत अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे मतदारसंघातून वीरेंद्र जगताप आणि तिवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर या दोन काँग्रेसच्या आमदारांनी भाजपच्या लाटेतही मोठा विजय खेचून आणला. अमरावती विधानसभा मतदारसंघ काँग्रेसने डॉ.सुनील देशमुख यांना उमेदवारी दिली असती तर 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार म्हणून डॉ.सुनील देशमुख यांचा विक्रमी विजय झाला असता असे त्यावेळी अनेकांचे म्हणणे होते. भाजपमध्ये आल्यावर डॉ. सुनील देशमुख यांनी अमरावती महापालिकेवर त्यांनीच 2001 मध्ये भाजपचा झेंडा उतरवून जो काँग्रेसचा झेंडा फडकवला होता तो 2016 च्या महापालिका निवडणुकीत खाली उतरवून भाजपचा झेंडा नव्याने फडकवला. खरंतर काँग्रेसमध्ये असतानाच डॉ. सुनील देशमुख यांनी अमरावती विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जे काही प्रयत्न केले होते ते पाच वर्षे थांबलेले प्रयत्न 2014 नंतर पुन्हा करावे लागले. आज अमरावती विमानतळ विस्तारीकरणाचा प्रश्न सुटला असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकतेच या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. बडनेरा मतदार संघात असणारा ऑक्सीजन पार्क हेसुद्धा डॉ. सुनील देशमुख यांच्या प्रयत्नाने साकारले जात आहे. अमरावती शहर आणि जिल्ह्यातील मोठे नाव असणाऱ्या डॉ. सुनील देशमुख यांना भाजपने हवी तशी संधी दिली नाही अशी खंत अनेक जण व्यक्त करीत असले तरी अमरावती शहराच्या विकासासाठी आपण हवे ते सर्व प्रयत्न केले आणि आपली पाच वर्षातील कामे जनतेसमोर खुली आहेत असे आमदार डॉ.सुनील देशमुख म्हणतात.
आमदार डॉ.सुनील देशमुख यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पराभूत करू आणि पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा अमरावती मतदारसंघात पडकवू असा विश्वास व्यक्त करीत माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जनसंपर्क चांगलाच वाढविला होता. 2014 च्या निवडणुकीत रावसाहेब शेखावत यांनी दगा दिल्याचा आरोप यावेळी आमदार रवी राणा यांनी केला होता मात्र यावेळी नवनीत राणा यांच्या प्रचारात अमरावती शहरात रावसाहेब शेखावत यांनी मोठी आघाडी घेतली होती. अमरावती विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्यापेक्षा नवनीत राणा यांना 27 हजाराचे मताधिक्य मिळाले. यामुळे रावसाहेब शेखावत यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला होता. अमरावती शहरात पांडुरंग महोत्सवाचे आयोजन करून रावसाहेब शेखावत यांनी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली होती. असे असताना अचानक रावसाहेब शेखावत अमरावती शहरातून जणू नाहीसे झाले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती ठीक नसल्याने रावसाहेब शेखावत पुण्याला आहेत असे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत होते. अमरावती झालेल्या काँग्रेसच्या महा पर्दाफाश यात्रेतही रावसाहेब शेखावत गैरहजर होते. रावसाहेब शेखावत यांना विधानसभा निवडणुकीसंदर्भात विचारले असता सध्या राजकारणावर बोलण्याची आपली कुठलीच मानसिकता नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान अमरावती मतदारसंघात यावेळी काँग्रेसने मुस्लिम व्यक्तीला उमेदवारी द्यावी अशी मागणी मुस्लिम समाजातून ताकदीने समोर आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे महा पर्दाफाश सभेच्या निमित्ताने अमरावतीत आले असता काँग्रेसमधील मुस्लिम कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर काँग्रेसचे शहर अल्पसंख्यांक अध्यक्ष एजाज पहिलवान यांना उमेदवारी मिळावी अशी जोरदार मागणी केली होती. एजाज पहिलवान यांच्यासह मुस्लिम समुदायाच्या शिष्टमंडळाने रावसाहेब शेखावत यांच्या घरी जाऊन यावेळी काँग्रेसची उमेदवारी अमरावती शहरातून मुस्लिम व्यक्तीला मिळावी यासाठी आपणच पुढाकार घेऊन पक्षश्रेष्ठींकडे मागणी करावी अशी विनंती केली. अमरावती विधानसभा मतदारसंघात एकूण 1 लाख 4 हजाराच्या जवळ मुस्लिम मतदारांची संख्या असून काँग्रेसने मुस्लिम उमेदवार म्हणून मला निवडणूक लढवण्याची संधी द्यावी मी निश्चितच निवडून येईल असा विश्वास एजाज पैलवान यांनी व्यक्त केला आहे. रावसाहेब शेखावत यांनी सुद्धा मला उमेदवारी मिळाली तर निष्ठेने काम करू असा शब्द दिला असल्याचे एजाज पैलवान यांचे म्हणणे आहे.
रावसाहेब शेखावत यांचे अचानक शांत होणे, जनसंपर्क, जनसंवाद बंद कर यामागे नेमके काय कारण असावे हे एक कोडेच आहे. लोकसभा निवडणुक काळात रावसाहेब शेखावत आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांच्या संवादाची ऑडिओ क्लिप वायरल झाली होती. या क्लिप मध्ये तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर यांना पराभूत कसे करता येईल याबाबत रावसाहेब शेखावत आणि दिनेश सूर्यवंशी यांच्या झालेली चर्चा खळबळ उडवणारी ठरली. आज आमदार यशोमती ठाकूर यांच्याकडे काँग्रेसचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष हे पद आले आहे. यासोबतच रावसाहेब शेखावत यांच्यावर त्यांची जवळची मंडळी चांगलीच नाराज झाली असल्यामुळे रावसाहेब शेखावत यांनी निवडणुकीचा नाद सोडला असल्याचे काँग्रेस कार्यकर्ते बोलत आहेत. अमरावती शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष विश्वासराव देशमुख आणि युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर देशमुख यांनी अमरावती मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार तयारी केली आहे. हे असे सरे होत असताना अमरावती विधानसभा मतदारसंघात रावसाहेब शेखावत हेच काँग्रेसचे उमेदवार असतील असा विश्वास अमरावती शहर काँग्रेसचे अध्यक्ष किशोर बोरकर यांनी व्यक्त केला आहे.
अमरावती जिल्हा आणि अमरावती शहर काँग्रेसमध्ये कुठलाही ताळमेळ नसणे, जिल्ह्यात काँग्रेसचे दोन आमदार असताना त्यांच्यासोबत शहर काँग्रेस आणि रावसाहेब शेखावत यांचा हवा तसा संवाद नसणे अशा सर्व परिस्थिती अमरावती शहरात काँग्रेसची अवस्था अतिशय वाईट असल्याचे चित्र आहे. अमरावती विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे देऊळ पाण्यात असल्याने अमरावती मतदारसंघ काँग्रेस ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेससाठी सुटावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके हे प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे संजय घोडके यांच्या पत्नी आणि बडनेराविधानसभा मतदार संघाच्या माजी आमदार सुलभा खोडके या गत एक महिन्यापासून चांगल्याच सक्रिय झाले आहेत. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत सुलभा खोडके या बडनेरा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. 2009 आणि 2014 च्या रवी राणा यांनी सुलभा खोडके यांचा दारुण पराभव केला. त्यामूळे आता सुलभा खोडके यांनी बडनेरा विधानसभा मतदारसंघाचा नाद सोडला. बडनेरा विधानसभा मतदारसंघाच्या फेररचनेत अमरावती शहरातील राधानगर ते विदर्भ महाविद्यालय परिसराचा भाग हा बडनेरा मतदार संघातून अमरावती मतदारसंघात आला आहे. आपले मतदार हे राधानगर ते विदर्भ महाविद्यालय परिसरात मोठ्या संख्येने असल्याने आपण यावेळी विधानसभा निवडणुक अमरावती मतदारसंघातूनच लढवणार असे सुलभा खोडके यांचे म्हणणे आहे.
2014 च्या निवडणूकित भाजप आणि शिवसेनेची युती झाली नव्हती. त्यावेळी प्रदीप बाजड हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून अमरावती विधानसभा मतदार संघात निवडणूक रिंगणात होते. त्यांना केवळ 8 हजार 256 मते मिळाली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी लगतच्या बडनेरा विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी धुमाकूळ घातला असताना अमरावती विधानसभा मतदारसंघात मात्र शिवसेना चिडीचुप आहे. अमरावती विधानसभा मतदारसंघात आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांच्या विरोधात या निवडणुकीत रावसाहेब शेखावत नसतील का? एजाज पहिलवान यांना काँग्रेस उमेदवारी देईल का? काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत काँग्रेसच्या हक्काचा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटेल का? असे अनेक प्रश्न आहेत. आमदार डॉ. सुनील देशमुख यांच्याऐवजी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी भाजपातील 11 जणांनी पक्षश्रेष्ठींकडे इच्छा व्यक्त केली आहे. भाजपचे प्रदेश प्रवक्ते आणि आमदार गिरीश व्यास यांनी शहरात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी अमरावतीच्या माजी महापौर किरण महल्ले आणि नगरसेवक सुरेखा लुंगारे यांनीही उमेदवारी मिळावी अशी इच्छा पक्षाकडे व्यक्त केली. 3 लाख 23 हजार 242 मतदारसंख्या असणाऱ्या अमरावती विधानसभा मतदारसंघात सुमारे एक लाख चार हजाराच्या आसपास मुस्लिम मतदार आहेत आणि दलित मतदारांची संख्या 45 हजाराच्या जवळपास आहे. जात आणि धर्माचे समीकरण पाहता कुठल्याही लाटेच्या भरवशावर अमरावती विधानसभा मतदारसंघात कोणीही निवडून येऊ शकतो असे म्हणणे धाडसाचे ठरेल. यामुळेच आमदार डॉ.सुनील देशमुख यांच्याऐवजी इतर कोणाचा उमेदवार म्हणून भाजप विचार करेल असे अजिबात वटत नाही. हे तितकेच खरे आहे. डॉक्टर सुनील देशमुख यांच्या विरोधात तगडे आव्हान नेमके कोण उभे करणार याची प्रतीक्षा सगळ्यांनाच आहे.



अमरावती विधानसभा मतदार संघ 2014चा निकल

डॉक्टर सुनील देशमुख भाजप 84 हजार 33
रावसाहेब शेखावत काँग्रेस 48 हजार 961
अख्तर मिर्झा नवीन बॅग बसपा 11 हजार 585
प्रदीप बाजड शिवसेना 8 256
गणेश खारकर 1 हजार 30

मतदार संख्या

पुरुष 1 लाख 74 हजार 57
महिला 1 लाख 64 हजार 671
तृतीयपंथी 13
एकुण मतदार 3 लाख 23 हजार 242


Conclusion:
Last Updated : Sep 4, 2019, 11:16 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.