अहमदनगर : जिल्ह्यातील भोकर येथील मुस्लीम मुलीशी लग्न murder for marrying Muslim girl Ahmadnagar केले म्हणून अपहरण करण्यात आलेल्या दीपक बर्डे या आदिवासी युवकाचा आरोपींनी खून Deepak Barde Murder Case केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी kidnapping murder marrying muslim girl Ahmadnagar दिपकचा मृतदेह गोदावरी नदी पात्रात फेकून dead bodies thrown in Godavari river दिल्याचे अटक केलेल्या आरोपींनी कबुली दिली आहे. श्रीरामपूर पोलिसांनी दीपकचा मृतदेह शोधण्यासाठी विशेष पथक नेमले असून सहा बोटींद्वारे शोध घेतला जात असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे. Deepak Barde dead body search operation
मुलीच्या मामाची दीपकला मारहाण - श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील आदिवासी भिल्ल समाजातील दीपक बर्डे याचे एका मुस्लीम युवतीसोबत प्रेम होते. मुलीच्या घरच्यांचा याला विरोध असताना दोघांनी लग्न केले. आपल्या मुलीने लग्न केल्याची माहिती घरच्यांना समजल्यावर त्यांनी दीपकला मारहाण करत त्याच्या ताब्यातून त्या मुलीला परत घेऊन गेले होते. तसेच मुलीला पुण्याला तिच्या मामाकडे ठेवले गेले. याची माहिती मिळाल्यावर दीपक मित्रांसोबत पुण्याला गेला. मुलीच्या मामाने दीपकला मारहाण करून त्याचे अपहरण केल्याचा आरोप त्याच्या मित्रांनी केला होता. दिपकच्या वडिलांच्या फिर्यादीनंतर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी सात जणांना अटक केली. आता या आरोपींनी दीपक बर्डेचा खून केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी गोदावरी नदीपात्रात मृतदेह शोधण्यासाठी शोधमोहीम सुरु केली आहे.
आदिवासी तरुणाच्या हत्येचे प्रकरण तापणार - तीन दिवसांपूर्वी भाजप नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूरात हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आली होती आणि पोलिसांनी तत्काळ तपास करण्यासाठी दबाव वाढवण्यात आला होता. आता तपासात दिपकची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिल्या नंतर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मजनू शेख, इम्रान अब्बास शेख, समीर अहमद शेख, अजित शेख यांना अटक केली. आरोपींकडे कसून चौकशी सुरू होती. या माहितीच्या अनुषंगाने तपास करण्यात येत आहे. लव्ह जिहादमुळे श्रीरामपूर तालुका आधीच चर्चेत आला आहे. आता त्यात या नवा प्रकरणाची भर पडली आहे. मुस्लीम तरुणीशी महिनाभरापूर्वी विवाह करणारा तरुण बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी आधीच घातपातचा संशय व्यक्त केला होता. त्यात अटकेतील आरोपींनी खुनाची कबुली दिल्याने हे प्रकरण आणखीच तापण्याची चिन्हं आहेत. दोषींवर कारवाई केली नाही तर हिंदू संघटना तीव्र आंदोलन छेडण्याची शक्यता आहे. त्यामुळे लव्ह जिहादच्या मुद्यावरुन बदनाम होणारे श्रीरामपूर यातून कधी बाहेर पडणार असा प्रश्न आहे.