ETV Bharat / state

काँग्रेस संयम पाळणारा पक्ष, वेळ आल्यावर कारवाई - बाळासाहेब थोरात

काँग्रेसच्यावतीने आज अहमदनगर येथे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत पदाधिकारी-कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. मेळाव्यानंतर माध्यमांशी बोलताना थोरात यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर टीका केली.

author img

By

Published : Mar 24, 2019, 9:36 PM IST

बाळासाहेब थोरात

अहमदनगर - राधाकृष्ण विखे-पाटील हे पुत्र सुजयसाठी गाठीभेटी घेत असल्याचे वृत्त आम्ही माध्यमात ऐकत-वाचत आहोत. वरिष्ठांना याची कल्पना असतेच. मात्र काँग्रेस पक्ष हा संयमी आणि सहिष्णुतावादी आहे पण वेळ आल्यावर निर्णय घेईल, असे सूचक विधान बाळासाहेब थोरात यांनी केले.

आम्ही काँग्रेसच्या सर्व नेते-पदाधिकाऱ्यांना आजच्या मेळाव्याबाबत कळवले होते. पण ते (विखे) राज्यस्तरीय नेते आहेत. आम्हाला हेच पाहायचे होते की मेळाव्यास कोण येतो आणि कोण येत नाही, असे सांगत थोरतांनी विखेंवर निशाणा साधला.

बाळासाहेब थोरात

या मेळाव्यास अपेक्षेप्रमाणे काँग्रेसमधल्या थोरात गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर राधाकृष्ण विखे यांनी नगर दक्षिणेत आघाडीचा प्रचार करणार नसल्याचे सांगितले असले, तरी थोरात गटाने या मतदारसंघात पूर्ण ताकदीनिशी लक्ष घातल्याचे दिसून आले.

मेळाव्यात थोरात यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवाहन करताना कोणत्याही परिस्थितीत आघाडीचे संग्राम जगताप यांना निवडून आणण्यासाठी कंबर कसा असे आवाहन केले.

शिर्डीत काँग्रेसचा मजबूत उमेदवार
शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाऊसाहेब कांबळे हे सक्षम उमेदवार आहेत. इतरही काही नावे होती मात्र सलग दोनवेळा आमदार राहिलेले कांबळे हे योग्य उमेदवार वाटल्याने पक्षाने त्यांना उमेदवारी दिली, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

जिल्ह्यात पक्षाला उभारी
आजचा मेळावा मोठ्या उत्साही वातावरणात पार पडल्याचा आनंद थोरात यांच्या चेहऱ्यावर पण दिसून येत होता. याबाबत त्यांना छेडले असता, योग्य वेळ आली की उत्साह येतो. काँग्रेस पक्षाची अशीच ओळख असून जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहे.

अहमदनगर - राधाकृष्ण विखे-पाटील हे पुत्र सुजयसाठी गाठीभेटी घेत असल्याचे वृत्त आम्ही माध्यमात ऐकत-वाचत आहोत. वरिष्ठांना याची कल्पना असतेच. मात्र काँग्रेस पक्ष हा संयमी आणि सहिष्णुतावादी आहे पण वेळ आल्यावर निर्णय घेईल, असे सूचक विधान बाळासाहेब थोरात यांनी केले.

आम्ही काँग्रेसच्या सर्व नेते-पदाधिकाऱ्यांना आजच्या मेळाव्याबाबत कळवले होते. पण ते (विखे) राज्यस्तरीय नेते आहेत. आम्हाला हेच पाहायचे होते की मेळाव्यास कोण येतो आणि कोण येत नाही, असे सांगत थोरतांनी विखेंवर निशाणा साधला.

बाळासाहेब थोरात

या मेळाव्यास अपेक्षेप्रमाणे काँग्रेसमधल्या थोरात गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर राधाकृष्ण विखे यांनी नगर दक्षिणेत आघाडीचा प्रचार करणार नसल्याचे सांगितले असले, तरी थोरात गटाने या मतदारसंघात पूर्ण ताकदीनिशी लक्ष घातल्याचे दिसून आले.

मेळाव्यात थोरात यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवाहन करताना कोणत्याही परिस्थितीत आघाडीचे संग्राम जगताप यांना निवडून आणण्यासाठी कंबर कसा असे आवाहन केले.

शिर्डीत काँग्रेसचा मजबूत उमेदवार
शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाऊसाहेब कांबळे हे सक्षम उमेदवार आहेत. इतरही काही नावे होती मात्र सलग दोनवेळा आमदार राहिलेले कांबळे हे योग्य उमेदवार वाटल्याने पक्षाने त्यांना उमेदवारी दिली, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

जिल्ह्यात पक्षाला उभारी
आजचा मेळावा मोठ्या उत्साही वातावरणात पार पडल्याचा आनंद थोरात यांच्या चेहऱ्यावर पण दिसून येत होता. याबाबत त्यांना छेडले असता, योग्य वेळ आली की उत्साह येतो. काँग्रेस पक्षाची अशीच ओळख असून जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहे.

Intro:अहमदनगर- काँग्रेस संयम पाळणारा पक्ष, पण वेळ आल्यावर कारवाई करतो..-माजी मंत्री थोरात यांचे राधाकृष्ण विखें बाबत सूचक वक्तव्य


Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे

अहमदनगर- काँग्रेस संयम पाळणारा पक्ष, पण वेळ आल्यावर कारवाई करतो..-माजी मंत्री थोरात यांचे राधाकृष्ण विखें बाबत सूचक वक्तव्य

अहमदनगर- आज काँग्रेसच्या वतीने नगर इथे माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत पदाधिकारी-कार्यकर्ता मेळावा घेतला. मेळाव्यात नंतर माध्यमांशी बोलताना थोरात यांनी अपेक्षेप्रमाणे राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला. विखे हे पुत्र सुजय साठी गाठीभेटी घेत असल्याचे वृत्त आम्ही माध्यमात ऐकत-वाचत आहोत. वरिष्ठांना याची कल्पना जातच सतेज मात्र काँग्रेस पक्ष हा संयमी आणि सहिष्णुतावादी आहेझ पण वेळ आल्यावर निर्णय घेईल असे सूचक विधान थोरात यांनी केले. आम्ही काँग्रेसच्या सर्व नेते-पदाधिकाऱ्यांना आजच्या मेळाव्या बाबत कळवले होते पण ते (विखे) राज्यस्तरीय नेते आहेत. आम्हाला हेच पहायचे होते की मेळाव्यास कोण येतो आणि कोण येत नाही, असे सांगत थोरतांनी विखेंवर निशाणा साधला.
या मेळाव्यास अपेक्षे प्रमाणे काँग्रेस मधल्या थोरात गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते. त्याच बरोबर राधाकृष्ण विखे यांनी नगर दक्षिणेत आपण आघाडीचा प्रचार करणार नसल्याचे सांगितले असले तरी थोरात गटाने या मतदारसंघात पूर्ण ताक्तीनिशी लक्ष घातल्याचे दिसून आले.
मेळाव्यात थोरात यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवाहन करताना कोणत्याही परिस्थितीत आघाडीचे संग्राम जगताप यांना निवडून आणण्यासाठी कंबर कसा असे आवाहन केले.

शिर्डीत काँग्रेसचा मजबूत उमेदवार.. -थोरात
-शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाऊसाहेब कांबळे हे सक्षम उमेदवार आहेत. इतरही काही नावे होती मात्र सलग दोन वेळेला आमदार राहिलेले कांबळे हे वरीष्ठते नुसार योग्य उमवडवर7वाटल्याने पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे.

जिल्ह्यात पक्षाला उभारी आणि उत्साह..-थोरात
-आजच्या मेळावा मोठ्या उत्साही वातावरणात पार पडल्याचा आनंद थोरात यांच्या चेहऱ्यावर पण दिसून येत होता. याबाबत त्यांना छेडले असता, पक्ष योग्य वेळ आली की उत्साहात येतो. कांग्रेस पक्षाची अशीच ओळख असून जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात कार्यकर्ते जोमाने कामाला लागल्याचे सांगत एक प्रकारे विखेंवर शरसंधान साधले.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.


Conclusion:अहमदनगर- काँग्रेस संयम पाळणारा पक्ष, पण वेळ आल्यावर कारवाई करतो..-माजी मंत्री थोरात यांचे राधाकृष्ण विखें बाबत सूचक वक्तव्य
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.