ETV Bharat / sports

IND vs ENG 2nd T20 : इंग्लंडवर 49 धावांनी विजय मिळवत भारताने मालिकेवर केला कब्जा

भारताने दुसऱ्या टी-20 ( IND vs ENG 2nd T20 ) सामन्यात इंग्लंडचा 49 धावांनी पराभव केला. यासह भारताने तीन सामन्यांच्या T20I मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. 171 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव 17 षटकात 121 धावांवर आटोपला. रविवारी (10 जुलै) अखेरचा टी-20 सामना खेळवला जाणार आहे.

author img

By

Published : Jul 10, 2022, 12:10 PM IST

IND
IND

बर्मिंगहॅम: भारत विरुद्ध इंग्लंड ( IND vs ENG ) संघात तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना शनिवारी पार पडला. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात भारताने इंग्लंडवर 49 धावांनी विजय ( India won by 49 runs ) मिळवला. त्याचबरोबर भारतीय संघाने मालिकेत 2-0 ने विजय आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला 171 धावांचे लक्ष्य दिले होते. परंतु इंग्लंडचा संघ 121 धावांवर आटोपला.

या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला ऋषभ पंत ( Batsman Rishabh Pant ) आणि रोहित शर्मा ही नवी सलामी जोडी डावाची उतरली होती. या जोडीने स्फोटक सुरुवात केली. कारण भारताने अवघ्या पाच षटकांत पहिल्या विकेट्साठी 49 धावा केल्या होत्या. मात्र यानंतर भारताच्या विकेट सातत्याने पडल्यामुळे 89धावांवर संघाने पाच विकेट गमावल्या. यादरम्यान विराट कोहली (1), सूर्यकुमार यादव (15) आणि हार्दिक पांड्या (12) काहीही न करता लवकर बाद झाले.

यावेळी फलंदाजीला आलेल्या रवींद्र जडेजा आणि दिनेश कार्तिक या जोडीने विकेट पडण्याची प्रक्रिया थांबवली. मात्र, यादरम्यान दिनेशने संथ खेळी खेळल्याने तो 17 चेंडूत केवळ 12 धावाच करू शकला. मात्र दुसऱ्या टोकाकडून रवींद्र जडेजाने ( All-rounder Ravindra Jadeja ) आक्रमक वृत्ती स्वीकारत डाव पुढे नेण्याचे काम सुरूच ठेवले. सतत पडणाऱ्या विकेट्समध्ये जडेजाने आपली विकेट वाचवली आणि गोलंदाजांवरही हल्ला चढवला. त्याने 29 चेंडूंमध्ये पाच चौकारांच्या मदतीने 46 धावांची नाबाद खेळी खेळली, ज्यामुळे टीम इंडियाने निर्धारित 20 षटकांत 8 गडी गमावून 170 धावा केल्या.

171 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या इंग्लंड संघाच्या फलंदाजीचे वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने ( Fast bowler Bhuvneshwar Kumar ) पॉवरप्लेमध्ये पुन्हा एकदा कंबरडे मोडले. पहिल्याच चेंडूवर त्याने धडाकेबाज फलंदाज जेसन रॉयला रोहितच्या हाती झेलबाद केले. यानंतर भुवीने आपल्या दुसऱ्याच षटकात इंग्लिश कर्णधार जोस बटलरलाही (4) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

जसप्रीत बुमराह ( Fast bowler Jaspreet Bumrah ) आणि युझवेंद्र चहल यांनी राहिलेले काम पूर्ण केले. बुमराहने प्रथम लियाम लिव्हिंगस्टोन (15) आणि सॅम कुरन (2) यांना बाद केले. यानंतर चहलने डेव्हिड मलान (19) आणि हॅरी ब्रूक (8) यांना बाद केले. या यजमान संघाने अवघ्या 60 धावांवर 6 प्रमुख फलंदाज गमावले होते. इथून सामना पूर्णपणे टीम इंडियाकडे झुकला होता. मात्र, मोईन अली (35) आणि डेव्हिड विली (38) या जोडीने शेवटपर्यंत झुंजण्याचे धाडस दाखवले. पण त्याच्या संघाला विजयापर्यंत पोहचवण्यात ते अपयशी ठरले. इंग्लंडचा संपूर्ण संघ केवळ 121 धावांवर गुंडाळला गेला. त्यामुळे भारताने हा सामना 49 धावांनी जिंकून मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली.

हेही वाचा - Cricketer Ravindra Jadeja : अष्टपैलू रवींद्र जडेजा सीएसकेला ठोकणार राम-राम? पाहा काय आहे कारण..

बर्मिंगहॅम: भारत विरुद्ध इंग्लंड ( IND vs ENG ) संघात तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना शनिवारी पार पडला. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात भारताने इंग्लंडवर 49 धावांनी विजय ( India won by 49 runs ) मिळवला. त्याचबरोबर भारतीय संघाने मालिकेत 2-0 ने विजय आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला 171 धावांचे लक्ष्य दिले होते. परंतु इंग्लंडचा संघ 121 धावांवर आटोपला.

या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला ऋषभ पंत ( Batsman Rishabh Pant ) आणि रोहित शर्मा ही नवी सलामी जोडी डावाची उतरली होती. या जोडीने स्फोटक सुरुवात केली. कारण भारताने अवघ्या पाच षटकांत पहिल्या विकेट्साठी 49 धावा केल्या होत्या. मात्र यानंतर भारताच्या विकेट सातत्याने पडल्यामुळे 89धावांवर संघाने पाच विकेट गमावल्या. यादरम्यान विराट कोहली (1), सूर्यकुमार यादव (15) आणि हार्दिक पांड्या (12) काहीही न करता लवकर बाद झाले.

यावेळी फलंदाजीला आलेल्या रवींद्र जडेजा आणि दिनेश कार्तिक या जोडीने विकेट पडण्याची प्रक्रिया थांबवली. मात्र, यादरम्यान दिनेशने संथ खेळी खेळल्याने तो 17 चेंडूत केवळ 12 धावाच करू शकला. मात्र दुसऱ्या टोकाकडून रवींद्र जडेजाने ( All-rounder Ravindra Jadeja ) आक्रमक वृत्ती स्वीकारत डाव पुढे नेण्याचे काम सुरूच ठेवले. सतत पडणाऱ्या विकेट्समध्ये जडेजाने आपली विकेट वाचवली आणि गोलंदाजांवरही हल्ला चढवला. त्याने 29 चेंडूंमध्ये पाच चौकारांच्या मदतीने 46 धावांची नाबाद खेळी खेळली, ज्यामुळे टीम इंडियाने निर्धारित 20 षटकांत 8 गडी गमावून 170 धावा केल्या.

171 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या इंग्लंड संघाच्या फलंदाजीचे वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने ( Fast bowler Bhuvneshwar Kumar ) पॉवरप्लेमध्ये पुन्हा एकदा कंबरडे मोडले. पहिल्याच चेंडूवर त्याने धडाकेबाज फलंदाज जेसन रॉयला रोहितच्या हाती झेलबाद केले. यानंतर भुवीने आपल्या दुसऱ्याच षटकात इंग्लिश कर्णधार जोस बटलरलाही (4) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

जसप्रीत बुमराह ( Fast bowler Jaspreet Bumrah ) आणि युझवेंद्र चहल यांनी राहिलेले काम पूर्ण केले. बुमराहने प्रथम लियाम लिव्हिंगस्टोन (15) आणि सॅम कुरन (2) यांना बाद केले. यानंतर चहलने डेव्हिड मलान (19) आणि हॅरी ब्रूक (8) यांना बाद केले. या यजमान संघाने अवघ्या 60 धावांवर 6 प्रमुख फलंदाज गमावले होते. इथून सामना पूर्णपणे टीम इंडियाकडे झुकला होता. मात्र, मोईन अली (35) आणि डेव्हिड विली (38) या जोडीने शेवटपर्यंत झुंजण्याचे धाडस दाखवले. पण त्याच्या संघाला विजयापर्यंत पोहचवण्यात ते अपयशी ठरले. इंग्लंडचा संपूर्ण संघ केवळ 121 धावांवर गुंडाळला गेला. त्यामुळे भारताने हा सामना 49 धावांनी जिंकून मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली.

हेही वाचा - Cricketer Ravindra Jadeja : अष्टपैलू रवींद्र जडेजा सीएसकेला ठोकणार राम-राम? पाहा काय आहे कारण..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.