ETV Bharat / sports

बांगलादेशला मुशफिकुरने तारले; पहिल्या टी २० सामन्यात भारताचा पराभव - भारत विरूद्ध बांगलादेश क्रिकेट सामना

भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला टी २० सामना दिल्लीत सुरू आहे. या सामन्यात बांगलादेशने भारताला ७ विकेटने हरवले.

टी २० सामन्यात बांग्लादेशने भारताला ७ विकेटने हरवले.
author img

By

Published : Nov 3, 2019, 8:55 PM IST

Updated : Nov 3, 2019, 11:26 PM IST

नवी दिल्ली - भारत विरुद्ध बांगलादेश टी २० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला आहे. बांगलादेशच्या मुश्फिकुर रहीमच्या शेवटच्या दोन षटकातील धमाकेदार फलंदाजीमुळे बांगलादेशने ७ गडी राखून विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत बांगलादेश ३-० ने पुढे आहे. मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी होणार आहे.

cricket
बांगलादेशला मुशफिकुरने तारले; पहिल्या टी २० सामन्यात भारताचा पराभव

१४९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्याच चेंडूवर चौकार लगावणारा लिटन दास पहिल्या षटकात माघारी परतला. त्याने ४ चेंडूत ७ धावा केल्या. दमदार फटकेबाजी करणारा मोहम्मद नईमदेखील मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. २ चौकार आणि १ षटकार लगावत त्याने २८ चेंडूत २६ धावा केल्या. पण शिखर धवनने त्याचा झेल टिपत त्याला माघारी धाडले. पहिले दोन गडी लवकर बाद झाल्यानंतर सौम्या सरकार आणि मुश्फिकुर रहीम यांनी बांगलादेशला सावरले.

सामना रंगतदार अवस्थेत असताना खेळपट्टीवर स्थिरावलेला सौम्या सरकार त्रिफळाचीत झाला. १ चौकार आणि २ षटकार खेचत त्याने ३५ चेंडूत ३९ धावा केल्या. पण मोक्याच्या क्षणी खलीलने त्याचा त्रिफळा उडवला. त्याने मुश्फिकुरने सगळा भार आपल्या खांद्यावर घेत तडाखेबाज खेळी केली. त्याने ४३ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकार खेचत नाबाद ६० धावा केल्या. मुश्फिकुर ३६ चेंडूत ३८ धावांवर असताना क्रुणाल पांड्याने त्याचा झेल सोडला होता. त्याचा फटका भारताला बसला. भारताकडून चहर, चहल आणि खलीलने १-१ बळी टिपला.

बांगलादेशने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच षटकात माघारी परतला. पहिल्या षटकाच्या पहिल्या पाच चेंडूत रोहितने दोन चौकार लगावले. मात्र, शेवटच्या चेंडूवर तो पायचीत झाला. त्याने ५ चेंडूत ९ धावा केल्या. रोहितनंतर के एल राहुलच्या रुपात भारताला दुसरा धक्का बसला. चेंडूचा अंदाज न आल्याने त्याने मारलेला फटका थेट फिल्डरच्या हातात गेला आणि तो झेलबाद झाला. त्याने १७ चेंडूत १५ धावा केल्या. त्यानंतर श्रेयस अय्यर झेलबाद झाला. तर, धाव घेण्यावरून गोंधळ झाल्यानं शिखर धवनच्या रुपाने भारताला चौथा धक्का बसला. तर, या सामन्यात प्रथमच संधी मिळालेला शिवम दुबे एक धाव करून माघारी परतला.

नवी दिल्ली - भारत विरुद्ध बांगलादेश टी २० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला आहे. बांगलादेशच्या मुश्फिकुर रहीमच्या शेवटच्या दोन षटकातील धमाकेदार फलंदाजीमुळे बांगलादेशने ७ गडी राखून विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत बांगलादेश ३-० ने पुढे आहे. मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी होणार आहे.

cricket
बांगलादेशला मुशफिकुरने तारले; पहिल्या टी २० सामन्यात भारताचा पराभव

१४९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्याच चेंडूवर चौकार लगावणारा लिटन दास पहिल्या षटकात माघारी परतला. त्याने ४ चेंडूत ७ धावा केल्या. दमदार फटकेबाजी करणारा मोहम्मद नईमदेखील मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. २ चौकार आणि १ षटकार लगावत त्याने २८ चेंडूत २६ धावा केल्या. पण शिखर धवनने त्याचा झेल टिपत त्याला माघारी धाडले. पहिले दोन गडी लवकर बाद झाल्यानंतर सौम्या सरकार आणि मुश्फिकुर रहीम यांनी बांगलादेशला सावरले.

सामना रंगतदार अवस्थेत असताना खेळपट्टीवर स्थिरावलेला सौम्या सरकार त्रिफळाचीत झाला. १ चौकार आणि २ षटकार खेचत त्याने ३५ चेंडूत ३९ धावा केल्या. पण मोक्याच्या क्षणी खलीलने त्याचा त्रिफळा उडवला. त्याने मुश्फिकुरने सगळा भार आपल्या खांद्यावर घेत तडाखेबाज खेळी केली. त्याने ४३ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकार खेचत नाबाद ६० धावा केल्या. मुश्फिकुर ३६ चेंडूत ३८ धावांवर असताना क्रुणाल पांड्याने त्याचा झेल सोडला होता. त्याचा फटका भारताला बसला. भारताकडून चहर, चहल आणि खलीलने १-१ बळी टिपला.

बांगलादेशने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच षटकात माघारी परतला. पहिल्या षटकाच्या पहिल्या पाच चेंडूत रोहितने दोन चौकार लगावले. मात्र, शेवटच्या चेंडूवर तो पायचीत झाला. त्याने ५ चेंडूत ९ धावा केल्या. रोहितनंतर के एल राहुलच्या रुपात भारताला दुसरा धक्का बसला. चेंडूचा अंदाज न आल्याने त्याने मारलेला फटका थेट फिल्डरच्या हातात गेला आणि तो झेलबाद झाला. त्याने १७ चेंडूत १५ धावा केल्या. त्यानंतर श्रेयस अय्यर झेलबाद झाला. तर, धाव घेण्यावरून गोंधळ झाल्यानं शिखर धवनच्या रुपाने भारताला चौथा धक्का बसला. तर, या सामन्यात प्रथमच संधी मिळालेला शिवम दुबे एक धाव करून माघारी परतला.

Intro:Body:

पहिल्या टी-20 सामन्यात भारताचे बांगलादेशसमोर 149 धावांचे आव्हान



दिल्ली - भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला टी २० सामना दिल्लीत सुरू आहे. या सामन्यात भारताने ६ गडी बाद बांगलादेशसमोर १४९ धावांचं आव्हान ठेवले आहे.

बांगलादेशने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच षटकात माघारी परतला. पहिल्या षटकाच्या पहिल्या पाच चेंडूत रोहितने दोन चौकार लगावले. मात्र, शेवटच्या चेंडूवर तो पायचीत झाला. त्याने ५ चेंडूत ९ धावा केल्या. रोहीतनंतर के एल राहुलच्या रुपात भारताला दुसरा धक्का बसला. चेंडूचा अंदाज न आल्याने त्याने मारलेला फटका थेट फिल्डरच्या हातात गेला आणि तो झेलबाद झाला. त्याने १७ चेंडूत १५ धावा केल्या. त्यानंतर श्रेयस अय्यर झेलबाद झाला. तर, धाव घेण्यावरून गोंधळ झाल्यानं शिखर धवनच्या रुपाने भारताला चौथा धक्का बसला. तर, या सामन्यात प्रथमच संधी मिळालेला शिवम दुबे एक धाव करून माघारी परतला आहे.



पुढील वर्षी होणाऱ्या टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाकडून विविध खेळाडूंची चाचपणी सुरू आहे. या मालिकेत अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे बांगलादेशचा संघ सर्वात अनुभवी खेळाडू शाकिब अल हसन याच्या अनुपस्थितीत ही मालिका खेळत आहे. रोहित शर्मा भारतीय संघाचे तर, शाकिबच्या अनुपस्थित महमूदुल्लाह बांगलादेशचे नेतृत्व करत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेला समोर ठेऊन दोन्ही संघ युवा खेळाडूंवर आपले नशीब आजमावत आहेत.



दिल्लीतील 'प्रदूषणाच्या' गोंधळात आज भारत विरूद्ध बांगलादेश या संघांमध्ये पहिला टी-२० सामना रंगत आहे. गेले काही दिवस दिल्लीतील प्रदूषणामुळे या सामन्याला अनेक लोकांनी नकारघंटा दिली होती. मात्र, बीसीसीआयचा नवीन अध्यक्ष सौरव गांगुलीने 'ऐनवेळी सामन्याचे ठिकाण बदलणे अशक्य' असल्याचा कौल दिल्यानंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला होता. दिल्लीतील प्रदुषणाने धोक्याची पातळी गाठली आहे. मात्र, तरीही भारत-बांगलादेश सामना दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडीयमवर खेळवला जात आहे.




Conclusion:
Last Updated : Nov 3, 2019, 11:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.