ETV Bharat / sports

MI vs RCB: मुंबईचे बंगळुरूपुढे १८८ धावांचे आव्हान - RCB

बंगळुरू-मुंबई संघ अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहेत.

आयपीएलचे संघ
author img

By

Published : Mar 28, 2019, 7:42 PM IST

Updated : Mar 28, 2019, 10:01 PM IST

बंगळुरु - चिन्नास्वामी स्टेडियम येथे सुरू असलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने बंगळुरूच्या संघापुढे १८८ धावांचे आव्हान दिले आहे. बंगळुरूच्या गोलंदाजांनी भेदक मारा केल्याने मुंबईने २० षटकात ८ बाद १८७ धावा करता आल्या. मुंबई इंडियन्सचा संघ युझवेंद्र चहलच्या फिरकी जाळ्यात अडकला. त्याने ३८ धावा देत महत्वपूर्ण ४ बळी घेतले.

विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईची सलामी जोडी रोहित-डी कॉक यांनी बंगळुरूच्या गोलंदाजांवर हल्ला केला. त्यांनी ५४ धावांची सलामी दिली. रोहित शर्माने ३३ चेंडूत ४८ धावा केल्या. त्याचे अर्धशतक २ धावांनी हुकले. त्यात १ षटकार आणि ८ चौकारांचा समावेश होता. डी कॉकने २० चेंडूत २३ तर युवराज सिंगने १२ चेंडूत २३ धावांचे योगदान दिले.

युवराज चहलच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात बाद झाला. सूर्यकुमार यादवने झटपट ३८ धावा झोडपून काढल्या. त्यानंतर किरोन पोलार्ड आणि कृणाल पंड्या यांनी चाहत्यांना निराशा केली. हार्दिक पंड्याने शेवटच्या षटकात सिराजला २ षटकार खेचत मुंबईची धावगती वाढवली. पंड्याने १४ चेंडूत ३ षटकारांसह ३२ धावा कुटल्या.

बंगळुरूकडून उमेश यादवने भेदक मारा करत मुंबईच्या २ फलंदाजांना बाद केले. मोहम्मद सिराजने २ गडी बाद करत सुरेख साथ दिली. नवदीप सैनी आणि कॉलिन डी ग्रँडहोम यांना एकही गडी टिपता आला नाही.

बंगळुरु - चिन्नास्वामी स्टेडियम येथे सुरू असलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने बंगळुरूच्या संघापुढे १८८ धावांचे आव्हान दिले आहे. बंगळुरूच्या गोलंदाजांनी भेदक मारा केल्याने मुंबईने २० षटकात ८ बाद १८७ धावा करता आल्या. मुंबई इंडियन्सचा संघ युझवेंद्र चहलच्या फिरकी जाळ्यात अडकला. त्याने ३८ धावा देत महत्वपूर्ण ४ बळी घेतले.

विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईची सलामी जोडी रोहित-डी कॉक यांनी बंगळुरूच्या गोलंदाजांवर हल्ला केला. त्यांनी ५४ धावांची सलामी दिली. रोहित शर्माने ३३ चेंडूत ४८ धावा केल्या. त्याचे अर्धशतक २ धावांनी हुकले. त्यात १ षटकार आणि ८ चौकारांचा समावेश होता. डी कॉकने २० चेंडूत २३ तर युवराज सिंगने १२ चेंडूत २३ धावांचे योगदान दिले.

युवराज चहलच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात बाद झाला. सूर्यकुमार यादवने झटपट ३८ धावा झोडपून काढल्या. त्यानंतर किरोन पोलार्ड आणि कृणाल पंड्या यांनी चाहत्यांना निराशा केली. हार्दिक पंड्याने शेवटच्या षटकात सिराजला २ षटकार खेचत मुंबईची धावगती वाढवली. पंड्याने १४ चेंडूत ३ षटकारांसह ३२ धावा कुटल्या.

बंगळुरूकडून उमेश यादवने भेदक मारा करत मुंबईच्या २ फलंदाजांना बाद केले. मोहम्मद सिराजने २ गडी बाद करत सुरेख साथ दिली. नवदीप सैनी आणि कॉलिन डी ग्रँडहोम यांना एकही गडी टिपता आला नाही.

Intro:Body:

MI vs RCB:  नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

बंगळूरु - आयपीएलच्या सातव्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स लढत सुरू आहे. बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळण्यात येत आहे. यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

बंगळुरू-मुंबई संघ अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहेत. दोन्ही संघाना पहिल्याच सामन्यात पराभवास सामोरे जावे लागले आहे.  याला या सामन्यात संधी मिळाली आहे. 



बुलेटिनसाठी

आयपीएलमध्ये आज सामन्यात बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर  मुंबई इंडियन्स आणि बंगळुरू रॉयल चॅलेजर्स (आरसीबी) संघात लढत सुरू 

नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत


Conclusion:
Last Updated : Mar 28, 2019, 10:01 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.