ETV Bharat / international

अमेरिकेअर्स देणार महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना आरोग्य सुविधा, 3 पथके रवाना

author img

By

Published : Jul 29, 2021, 12:40 PM IST

Updated : Jul 29, 2021, 12:53 PM IST

अमेरिकेतील एक स्वयंसेवी (अमेरिकेअर्स) संस्था राज्यातील पूरग्रस्त आणि दरडग्रस्त भागात जिथे 200 पेक्षा जास्त नागरिकांचे बळी गेले त्या ठिकाणी वैद्यकीय सेवा पूरवणार आहे. यासाठी संस्थेकडून बुधवारी 3 आरोग्य पथके कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रत्नागिरी या बाधित जिल्ह्याकरीता रवाना झाल्या असल्याची माहिती अमेरिकेअर या सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात आली.

पूरग्रस्त भागात आरोग्य सुविधा
पूरग्रस्त भागात आरोग्य सुविधा

वॉशिंगटन - राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीने पूरस्थिती निर्माण झाली होती. तर रायगड, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी दरडी कोसळून जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या. कोल्हापूर, कराड , चिपळूण, रत्नागिरी, सागंली या ठिकाणी महापुराने जनजीवन विस्कळीत झाले. या घटनेनंतर हळूहळू पूर ओसरायला सुरुवात झाल्यानंतर या ठिकाणी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. तर आरोग्य यंत्रणेकडूनही खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. आता या दरडग्रस्त आणि पूरग्रस्त भागात अमेरिकेतील एखा समाजसेवी संस्थेकडून आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती आहे.

अमेरिकेतील एक स्वयंसेवी संस्था राज्यातील पूरग्रस्त आणि दरडग्रस्त भागात जिथे 200 पेक्षा जास्त नागरिकांचे बळी गेले त्या ठिकाणी वैद्यकीय सेवा पूरवणार आहे. यासाठी संस्थेकडून बुधवारी 3 आरोग्य पथके कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रत्नागिरी या बाधित जिल्ह्याकरीता रवाना झाल्या असल्याची माहिती अमेरिकेअर या सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात आली.

मुंबईतील अमेरिकेअर इंडिया फाऊंडेशन या संस्थेचे कर्मचारी आणि मुंबईतली स्थानिक आरोग्यसेवा देणाऱ्या एका समुहाच्या संयुक्त विद्यमाने ही आरोग्य सेवा पुरवली जाणार आहे. यामध्ये आवश्यक वैद्यकीय मदत आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 10 दिवस प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही संस्थेकडून सांगण्यात आले.

महाराष्ट्रात आलेल्या महापुराने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे हजारो नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेअर्सचे आपत्ती प्रतिसाद विभागाचे उपाध्यक्ष केट डिस्किनो यांनी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर संस्थेकडून देण्यात आलेल्या माहिती नुसार कोल्हापूर आणि रायगड जिल्ह्यासाठी आणखी दोन पथके या आठवड्यानंतर पाठवण्यात येतील. या पथकांकडून पूरबाधितांना आरोग्यसेवाचा पूरवठा केला जाईल,

पाण्यापासून होणारे आजार आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पूरग्रस्त नागरिकांना निवारा केंद्रात राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आम्ही अशा नागरिकांवर अधिक लक्ष देणार असल्याचे आणि आरोग्य सेवा पूरवणार असल्याचेही या आरोग्य पथकांकडून सांगण्यात आले.

राज्यात महापुरात 169 अधिकृत मृत्यू असून 1 जण बेपत्ता आहे, 55 जण जखमी असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे..

वॉशिंगटन - राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीने पूरस्थिती निर्माण झाली होती. तर रायगड, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी दरडी कोसळून जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या. कोल्हापूर, कराड , चिपळूण, रत्नागिरी, सागंली या ठिकाणी महापुराने जनजीवन विस्कळीत झाले. या घटनेनंतर हळूहळू पूर ओसरायला सुरुवात झाल्यानंतर या ठिकाणी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. तर आरोग्य यंत्रणेकडूनही खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. आता या दरडग्रस्त आणि पूरग्रस्त भागात अमेरिकेतील एखा समाजसेवी संस्थेकडून आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती आहे.

अमेरिकेतील एक स्वयंसेवी संस्था राज्यातील पूरग्रस्त आणि दरडग्रस्त भागात जिथे 200 पेक्षा जास्त नागरिकांचे बळी गेले त्या ठिकाणी वैद्यकीय सेवा पूरवणार आहे. यासाठी संस्थेकडून बुधवारी 3 आरोग्य पथके कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रत्नागिरी या बाधित जिल्ह्याकरीता रवाना झाल्या असल्याची माहिती अमेरिकेअर या सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात आली.

मुंबईतील अमेरिकेअर इंडिया फाऊंडेशन या संस्थेचे कर्मचारी आणि मुंबईतली स्थानिक आरोग्यसेवा देणाऱ्या एका समुहाच्या संयुक्त विद्यमाने ही आरोग्य सेवा पुरवली जाणार आहे. यामध्ये आवश्यक वैद्यकीय मदत आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 10 दिवस प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही संस्थेकडून सांगण्यात आले.

महाराष्ट्रात आलेल्या महापुराने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे हजारो नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेअर्सचे आपत्ती प्रतिसाद विभागाचे उपाध्यक्ष केट डिस्किनो यांनी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर संस्थेकडून देण्यात आलेल्या माहिती नुसार कोल्हापूर आणि रायगड जिल्ह्यासाठी आणखी दोन पथके या आठवड्यानंतर पाठवण्यात येतील. या पथकांकडून पूरबाधितांना आरोग्यसेवाचा पूरवठा केला जाईल,

पाण्यापासून होणारे आजार आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पूरग्रस्त नागरिकांना निवारा केंद्रात राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आम्ही अशा नागरिकांवर अधिक लक्ष देणार असल्याचे आणि आरोग्य सेवा पूरवणार असल्याचेही या आरोग्य पथकांकडून सांगण्यात आले.

राज्यात महापुरात 169 अधिकृत मृत्यू असून 1 जण बेपत्ता आहे, 55 जण जखमी असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे..

Last Updated : Jul 29, 2021, 12:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.