ETV Bharat / elections

बारामती मतदारसंघ - राष्ट्रवादीच्या अभेद्य गडाला भाजप पाडणार का खिंडार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. तर राष्ट्रवादीच्या अभेद्य गडाला यावेळी खिंडार पाडण्याचा चंग भाजपने बांधला आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीच्या नवनाथ पडळकर यांच्याकडे ही दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांना पडणारी मते निर्णायक भूमिका बजावतील, अशी सध्या परिस्थिती आहे.

author img

By

Published : Apr 12, 2019, 2:35 PM IST

Updated : Apr 14, 2019, 5:07 PM IST

बारामती मतदारसंघ

पुणे - महाराष्ट्रातील लक्षवेधी लोकसभा मतदारसंघांपैकी बारामती हा एक प्रमुख मतदार संघ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. तर राष्ट्रवादीच्या अभेद्य गडाला यावेळी खिंडार पाडण्याचा चंग भाजपने बांधला आहे. भाजपने दौंडचे रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिल्याने बारामती लोकसभा मतदारसंघाची चुरस चांगलीच वाढली आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीच्या नवनाथ पडळकर यांच्याकडे ही दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांना पडणारी मते निर्णायक भूमिका बजावतील, अशी सध्या परिस्थिती आहे.

मागील काही दिवसांपासून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील सातत्याने बारामतीसह राज्यातल्या ४८ जागा जिंकू असा दावा करत आहेत. यंदाच्या निवडणुकीत प्रथमच भाजपकडून सुप्रिया सुळे यांना टक्कर देऊ शकेल, असा उमेदवार देण्यात आला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघ

सद्याची राजकीय परिस्थिती -

भाजपकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. कांचन कुल यांचे बारामती लोकसभा मतदारसंघात असलेले नातंगोत, आमदार कुल यांची दौंड मध्ये असलेली ताकद तसेच पुरंदरचे शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांच्याकडून होत असलेला जोरदार प्रचार सुप्रियांना धक्का देणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सोबतच भाजपकडून बारामती लोकसभा मतदार संघावर कब्जा मिळवण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि त्यांचे सहकारी बारामतीमध्ये तळ ठोकून आहेत. यामुळे या निवडणुकीची चुरस आणखीनच वाढली आहे.

या मतदारसंघांमध्ये सुप्रिया सुळे चांगलाच जोर लावताना दिसत आहेत. मागील निवडणुकांपेक्षा यंदाची निवडणूक सोपी नाही, याची जाणीव राष्ट्रवादीला झालेली दिसते. खडकवासला, दौंड, पुरंदर यासारख्या अडचणीचा ठरू शकणाऱ्या विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे डोअर टू डोअर प्रचारावर भर देताना दिसत आहेत. पुरंदर तसेच इंदापूर आणि भोर या विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस चांगली ताकद आहे. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीच्या काठीच्या राजकारणाचा फटका सुप्रिया सुळे यांना बसण्याची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रवादीकडून इथल्या काँग्रेस नेत्यांची मनधरणी करण्यात आली आहे. इंदापूरचे काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील, भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, पुरंदरचे काँग्रेसचे स्थानिक नेते आणि जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्यासोबत मनोमिलन करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलेला आहे.

भाजपकडून बारामतीमध्ये लावली जात असलेली जोरदार ताकत लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसनेही यावेळी मोठ्या गांभीर्याने बारामतीकडे लक्ष दिलेले आहे. एकंदरीतच बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा मोठ्या चुरशीची होईल असेच दिसून येत आहे.

लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या विधानसभानिहाय सध्याचे आमदार -

बारामती लोकसभेअंतर्गत येणाऱ्या ६ पैकी रासप १, राष्ट्रवादी २, काँग्रेस १, शिवसेना १, भाजप १ असे प्राबल्य आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला काँग्रेसच्या आश्वासक मदतीची गरज पडणार आहे. जिल्ह्यातील इतर संस्थांमधील सत्ता केंद्रांचा विचार केला तर पुणे जिल्हा परिषद आणि बारामती नगरपालिका ही राष्ट्रवादीकडे आहे. सासवड, इंदापूर भोर या नगरपालिका काँग्रेसकडे आणि दौंड नगरपालिका स्थानिक आघाडीने जिंकली आहे.

२०१४ च्या निवडणूकीचा निकाल -

२०१४च्या लोकसभा निवडणुकीचा मागोवा घेतला तर या मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीतील उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांना ५ लाख २१ हजार ५६२ मते पडली होती. तर भाजप शिवसेना आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना ४ लाख ५१ हजार ८४३ मते मिळाली होती. आपकडून उमेदवार असलेल्या निवृत्त पोलोस अधिकारी सुरेश खोपडे यांना २६ हजार ३९६ मते मिळाली होती. २०१९च्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर बारामती लोकसभा मतदार संघांमध्ये २१ लाख १२ हजार ८६२ मतदार आहेत.

मतदानावर परिणाम करणारे महत्त्वाचे पाच विषय -

मतदार संघातील औद्योगिक वसाहतींचा बारामतीसारखा विकास न होणे - पुरंदर तालुक्यातील औद्योगिक वसाहत व इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत बारामती सारखे मोठे उद्योग न आल्याने बेरोजगारांची संख्या ही वाढत आहे. याचा फटका विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंना बसू शकतो.

वाढती बेरोजगारी - या लोकसभा मतदारसंघात बेरोजगारांच्या हाताला काम मिळत नाही. शिक्षणात मात्र हा मतदारसंघ पुढे असला तरी बेरोजगारी वाढत आहे. साहजिकच याचा परिणाम मतदानावर होणार आहे.

पिण्याच्या पाण्याची टंचाई - बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर तालुक्यात पिण्याच्या व सिंचनासाठी पाण्याच्या योजना पाहिजे त्या प्रमाणात नाहीत. त्यामुळे या तालुक्यातील अनेक गावात पाण्याची तीव्रता प्रामुख्याने जाणवते, त्याचा ही परिमाण होणार आहे.

धनगर आरक्षण - बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची संख्या जास्त आहे. मात्र, आघाडी आणि युती सरकारने या समाजाला अद्यापही आरक्षण दिले नाही. मागील पंचवार्षिकमध्ये धनगर समाजाचे नेते महादेव जानकर हे निवडणूक लढले, त्यांना ४ लाख ५१ हजार मते मिळाली. त्यांनी आपल्या पदरात राज्याचे पशुसंवर्धन मंत्री पदही पाडून घेतले. मात्र आरक्षणाबाबत काहीही प्रयत्न केले नाहीत, हा मुद्दा ही कळीचा ठरणार आहे.

दौंडमधील स्थानिक प्रश्न - दौंड येथील बहुचर्चित नगर-मोरीचा प्रलंबित प्रश्न तसेच स्वच्छतेचा प्रश्न आजही कायम आहे.

खासदार सुप्रिया सुळेंच्या सकारात्मक बाजू -

  1. गावभेट दौऱ्यामुळे दांडगा जनसंपर्क
  2. महिला सबलीकरण / अपंगाना मदत
  3. केंद्रीय निधीतून सभामंडपे आणि रस्ते बांधणी
  4. शिक्षण क्षेत्रातील कामावर जास्तीचा भर

खासदारांच्या नकारात्मक बाजू -

  1. पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याच्या योजना केल्या नाहीत.
  2. बेरोजगारी कमी करता आली नाही.
  3. बारामती शहरासारखा इतर तालुक्यांचा विकास केला नाही
  4. भविष्यात व चिरकाल टिकेल असा एकही प्रकल्प उभारला नाही.
  5. सतत गावभेट दौरे मात्र त्या मानाने विकास कामे नाहीत.

भाजपच्या कांचन कुल यांच्या सकारात्मक बाजू -

  1. कांचन कुल यांचे माहेर बारामती आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या नातलगांचा फायदा होऊ शकतो.
  2. त्यांचे पती आमदार कुल यांची दौंड मध्ये असलेली ताकद.
  3. पुरंदरचे शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे हे देखील कुल यांचा जोमाने प्रचार करत आहेत.
  4. धनगर समाजाचे मते निर्णायक ठरण्याची शक्याता.

पुणे - महाराष्ट्रातील लक्षवेधी लोकसभा मतदारसंघांपैकी बारामती हा एक प्रमुख मतदार संघ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. तर राष्ट्रवादीच्या अभेद्य गडाला यावेळी खिंडार पाडण्याचा चंग भाजपने बांधला आहे. भाजपने दौंडचे रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिल्याने बारामती लोकसभा मतदारसंघाची चुरस चांगलीच वाढली आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीच्या नवनाथ पडळकर यांच्याकडे ही दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांना पडणारी मते निर्णायक भूमिका बजावतील, अशी सध्या परिस्थिती आहे.

मागील काही दिवसांपासून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील सातत्याने बारामतीसह राज्यातल्या ४८ जागा जिंकू असा दावा करत आहेत. यंदाच्या निवडणुकीत प्रथमच भाजपकडून सुप्रिया सुळे यांना टक्कर देऊ शकेल, असा उमेदवार देण्यात आला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघ

सद्याची राजकीय परिस्थिती -

भाजपकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. कांचन कुल यांचे बारामती लोकसभा मतदारसंघात असलेले नातंगोत, आमदार कुल यांची दौंड मध्ये असलेली ताकद तसेच पुरंदरचे शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांच्याकडून होत असलेला जोरदार प्रचार सुप्रियांना धक्का देणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सोबतच भाजपकडून बारामती लोकसभा मतदार संघावर कब्जा मिळवण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि त्यांचे सहकारी बारामतीमध्ये तळ ठोकून आहेत. यामुळे या निवडणुकीची चुरस आणखीनच वाढली आहे.

या मतदारसंघांमध्ये सुप्रिया सुळे चांगलाच जोर लावताना दिसत आहेत. मागील निवडणुकांपेक्षा यंदाची निवडणूक सोपी नाही, याची जाणीव राष्ट्रवादीला झालेली दिसते. खडकवासला, दौंड, पुरंदर यासारख्या अडचणीचा ठरू शकणाऱ्या विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे डोअर टू डोअर प्रचारावर भर देताना दिसत आहेत. पुरंदर तसेच इंदापूर आणि भोर या विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस चांगली ताकद आहे. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीच्या काठीच्या राजकारणाचा फटका सुप्रिया सुळे यांना बसण्याची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रवादीकडून इथल्या काँग्रेस नेत्यांची मनधरणी करण्यात आली आहे. इंदापूरचे काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील, भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, पुरंदरचे काँग्रेसचे स्थानिक नेते आणि जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्यासोबत मनोमिलन करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलेला आहे.

भाजपकडून बारामतीमध्ये लावली जात असलेली जोरदार ताकत लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसनेही यावेळी मोठ्या गांभीर्याने बारामतीकडे लक्ष दिलेले आहे. एकंदरीतच बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा मोठ्या चुरशीची होईल असेच दिसून येत आहे.

लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या विधानसभानिहाय सध्याचे आमदार -

बारामती लोकसभेअंतर्गत येणाऱ्या ६ पैकी रासप १, राष्ट्रवादी २, काँग्रेस १, शिवसेना १, भाजप १ असे प्राबल्य आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला काँग्रेसच्या आश्वासक मदतीची गरज पडणार आहे. जिल्ह्यातील इतर संस्थांमधील सत्ता केंद्रांचा विचार केला तर पुणे जिल्हा परिषद आणि बारामती नगरपालिका ही राष्ट्रवादीकडे आहे. सासवड, इंदापूर भोर या नगरपालिका काँग्रेसकडे आणि दौंड नगरपालिका स्थानिक आघाडीने जिंकली आहे.

२०१४ च्या निवडणूकीचा निकाल -

२०१४च्या लोकसभा निवडणुकीचा मागोवा घेतला तर या मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीतील उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांना ५ लाख २१ हजार ५६२ मते पडली होती. तर भाजप शिवसेना आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना ४ लाख ५१ हजार ८४३ मते मिळाली होती. आपकडून उमेदवार असलेल्या निवृत्त पोलोस अधिकारी सुरेश खोपडे यांना २६ हजार ३९६ मते मिळाली होती. २०१९च्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर बारामती लोकसभा मतदार संघांमध्ये २१ लाख १२ हजार ८६२ मतदार आहेत.

मतदानावर परिणाम करणारे महत्त्वाचे पाच विषय -

मतदार संघातील औद्योगिक वसाहतींचा बारामतीसारखा विकास न होणे - पुरंदर तालुक्यातील औद्योगिक वसाहत व इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत बारामती सारखे मोठे उद्योग न आल्याने बेरोजगारांची संख्या ही वाढत आहे. याचा फटका विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंना बसू शकतो.

वाढती बेरोजगारी - या लोकसभा मतदारसंघात बेरोजगारांच्या हाताला काम मिळत नाही. शिक्षणात मात्र हा मतदारसंघ पुढे असला तरी बेरोजगारी वाढत आहे. साहजिकच याचा परिणाम मतदानावर होणार आहे.

पिण्याच्या पाण्याची टंचाई - बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर तालुक्यात पिण्याच्या व सिंचनासाठी पाण्याच्या योजना पाहिजे त्या प्रमाणात नाहीत. त्यामुळे या तालुक्यातील अनेक गावात पाण्याची तीव्रता प्रामुख्याने जाणवते, त्याचा ही परिमाण होणार आहे.

धनगर आरक्षण - बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची संख्या जास्त आहे. मात्र, आघाडी आणि युती सरकारने या समाजाला अद्यापही आरक्षण दिले नाही. मागील पंचवार्षिकमध्ये धनगर समाजाचे नेते महादेव जानकर हे निवडणूक लढले, त्यांना ४ लाख ५१ हजार मते मिळाली. त्यांनी आपल्या पदरात राज्याचे पशुसंवर्धन मंत्री पदही पाडून घेतले. मात्र आरक्षणाबाबत काहीही प्रयत्न केले नाहीत, हा मुद्दा ही कळीचा ठरणार आहे.

दौंडमधील स्थानिक प्रश्न - दौंड येथील बहुचर्चित नगर-मोरीचा प्रलंबित प्रश्न तसेच स्वच्छतेचा प्रश्न आजही कायम आहे.

खासदार सुप्रिया सुळेंच्या सकारात्मक बाजू -

  1. गावभेट दौऱ्यामुळे दांडगा जनसंपर्क
  2. महिला सबलीकरण / अपंगाना मदत
  3. केंद्रीय निधीतून सभामंडपे आणि रस्ते बांधणी
  4. शिक्षण क्षेत्रातील कामावर जास्तीचा भर

खासदारांच्या नकारात्मक बाजू -

  1. पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याच्या योजना केल्या नाहीत.
  2. बेरोजगारी कमी करता आली नाही.
  3. बारामती शहरासारखा इतर तालुक्यांचा विकास केला नाही
  4. भविष्यात व चिरकाल टिकेल असा एकही प्रकल्प उभारला नाही.
  5. सतत गावभेट दौरे मात्र त्या मानाने विकास कामे नाहीत.

भाजपच्या कांचन कुल यांच्या सकारात्मक बाजू -

  1. कांचन कुल यांचे माहेर बारामती आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या नातलगांचा फायदा होऊ शकतो.
  2. त्यांचे पती आमदार कुल यांची दौंड मध्ये असलेली ताकद.
  3. पुरंदरचे शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे हे देखील कुल यांचा जोमाने प्रचार करत आहेत.
  4. धनगर समाजाचे मते निर्णायक ठरण्याची शक्याता.
Intro:mh pune 02 10 baramati loksabha profile pkg 7201348Body:mh pune 02 10 baramati loksabha profile pkg 7201348



Anchor

महाराष्ट्रातील लक्षवेधी लोकसभा मतदारसंघांपैकी पुणे जिल्ह्यातला बारामती लोकसभा मतदारसंघ हा प्रामुख्याने एक आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा या निवडणुकीतपणाला लागली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य गड असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात यावेळी विजयश्री खेचून आणायचीच असा चंग भाजपने बांधला आहे गेल्या पाच-सहा महिन्यापासूनच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील सातत्याने बारामतीसह राज्यातल्या 48 जागा जिंकू असा दावा करत आहेत यंदाच्या निवडणुकीत प्रथमच भाजपकडून सुप्रिया सुळे यांना टक्कर देऊ शकेल असा उमेदवार देण्यात आलाय भाजपने दौंडचे रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिल्याने बारामती लोकसभा मतदार संघाची चुरस चांगलीच वाढली आहे कांचन कुल यांचं बारामती लोकसभा मतदारसंघात असलेले नातंगोत आमदार कुल यांची दौंड मध्ये असलेली ताकद तसेच पुरंदरचे शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांच्याकडून होत असलेला जोरदार प्रचार यासोबतच भाजपकडून बारामती लोकसभा मतदार संघावर कब्जा मिळवण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील तसेच त्यांचे सहकारी बारामतीमध्ये तळ ठोकून आहेत यामुळे या निवडणुकीची चुरस आणखीनच वाढली आहे या मतदारसंघांमध्ये सुप्रिया सुळे चांगलाच जोर लावताना दिसत आहेत मागील निवडणुकांपेक्षा यंदाची निवडणूक सोपी नाही याची जाणीव राष्ट्रवादीला झालेली दिसते खडकवासला दौंड पुरंदर यासारख्या अडचणीचा ठरू शकणाऱ्या विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे डोल टू डोअर प्रचारावर भर देताना दिसत आहेत पुरंदर तसेच इंदापूर आणि भोर या विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस चांगली ताकद आहे मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीच्या काठीच्या राजकारणाचा फटका सुप्रिया सुळे यांना बसण्याची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रवादीकडून इथल्या काँग्रेस नेत्यांची मनधरणी करण्यात आली आहे इंदापूरचे काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे पुरंदरचे काँग्रेसचे स्थानिक नेते आणि जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्यासोबत मनोमिलन करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलेला आहे भाजपकडून बारामतीमध्ये लावली जात असलेली जोरदार ताकत लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने ही यावेळी मोठ्या गांभीर्याने बारामती कडे लक्ष दिलेले आहे एकंदरीतच बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा मोठ्या चुरशीची होईल असेच दिसून येत आहे 2014च्या लोकसभा निवडणुकीचा मागोवा घेतला तर या मतदारसंघात कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेसच्या आघाडीतील उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांना ५,२१,५६२ मते पडली होती तर भाजप शिवसेना आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना ४,५१,८४३ मते मिळाली होती आणि आप कडून उमेदवार असलेल्या निवृत्त पोलोस अधिकारी सुरेश खोपडे यांना २६३९६ मते मिळाली होती.....



2019 च्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर बारामती लोकसभा मतदार संघांमध्ये 21 लाख 12862 इतके मतदान आहे




* लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या विधानसभानिहाय सध्याचे आमदार :-



*लोकसभेअंतर्गत येणाऱ्या ६ पैकी रासप १ ,राष्ट्रवादी २,कॉग्रेस१ ,शिवसेना १,भाजप १ असे प्राबल्य आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसच्या आश्वासक मदतीची गरज पडणार आहे जिल्ह्यातील इतर संस्थांमधील सत्ता केंद्रांचा विचार केला तर पुणे जिल्हा परिषद आणि बारामती नगरपालिका ही राष्ट्रवादीकडे आहे सासवड, इंदापूर भोर या नगरपालिका कॉग्रेसकडे आणि दौंड नगरपालिका स्थानिक आघाडीने जिंकली आहे.




मतदानावर परिणाम करणारे महत्त्वाचे पाच विषय :-



१) औद्योगिक वसाहतींचा बारामती सारखा विकास न होणे पुरंदर तालुक्यातील औद्योगिक वसाहत व इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत बारामती सारखे मोठे उद्योग न आल्याने बेरोजगारांची संख्या ही वाढत आहे. याचा फटका खासदारांना बसू शकतो.



२) वाढती बेरोजगारी- या लोकसभा मतदारसंघात बेरोजगारांच्या हाताला काम मिळत नाही शिक्षणात मात्र हा मतदारसंघ पुढे असला तरी बेरोजगारी वाढत आहे साहजिकच याचा फटका मतदानावर होणार आहे.





३ )दौंड येथील बहुचर्चित नगर मोरीचा प्रलंबित प्रश्न तसेच स्वच्छतेचा प्रश्न आजही कायम आहे.



४) पिण्याच्या पाण्याची टंचाई - बारामती इंदापूर दौंड पुरंदर तालुक्यात पिण्याच्या व सिंचनासाठी पाण्याच्या योजना पाहिजे त्या प्रमाणात नाहीत त्यामुळे या तालुक्यातील अनेक गावात पाण्याची तीव्रता प्रामुख्याने जाणवते त्याचा ही परिमाण होणार आहे.



५ ) धनगर आरक्षण :- बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची संख्या जास्त आहे मात्र आघाडी आणि युती सरकारने या समाजाला अद्याप ही आरक्षण दिले नाही मागील पंचवार्षिक मध्ये धनगर समाजाचे नेते महादेव जानकर हे निवडणूक लढले त्यांना ४लाख ५१ हजार मते मिळाली त्यांनी आपल्या पदरात राज्याचे पशुसंवर्धन मंत्री पद पाडून घेतले मात्र आरक्षणाबाबत काहीही प्रयत्न केले नाहीत हा मुद्दा ही कळीचा ठरणार आहे.



* खासदारांच्या सकारात्मक बाजु :-

१) गावभेट दौऱ्यामुळे दांडगा जनसंपर्क

२) महिला सबलीकरण / अपंगाना मदत

३) केंद्रीय निधीतून सभामंडपे आणि रस्ते तयार केली.

४) शिक्षण क्षेत्रातील कामावर जास्तीचा भर

५)

खासदारांच्या नकारात्मक बाजु :-

१) पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याच्या योजना केल्या नाहीत

२) बेरोजगारी कमी करता आली नाही

३) बारामती शहरासारखा इतर तालुक्यांचा विकास केला नाही

४) भविष्यात व चिरकाल टिकेल असा एकही प्रकल्प उभारला नाही.

५) सतत गावभेट दौरे मात्र त्या मानाने विकास कामे नाहीत..



Byte अमोल निलाखे, स्थानिक पत्रकार

Byte राजेंद्र गलांडे, स्थानिक पत्रकार

Byte अमोल तोरणे, राजकीय विश्लेषकConclusion:
Last Updated : Apr 14, 2019, 5:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.