ETV Bharat / city

शहापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा

सुमारे तासभर पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी मान्सूनच्या पावसाबाबत आशावाद व्यक्त करत आहेत.

author img

By

Published : Jun 9, 2019, 8:09 PM IST

पाऊस

ठाणे - धरणाचा तालुका म्हणून शहापूर तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या डोळखांब परिसरात आज दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे शहापूरकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

शहापूर तालुक्यात भात पिकासह भाजीपाल्याचे पीक घेऊन शेतकरी कुटुंब उदरनिर्वाह करतात. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. सुमारे तासभर पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी मान्सूनच्या पावसाबाबत आशावाद व्यक्त करत आहेत.

शहापूर तालुक्यात पडलेला पाऊस

गेल्या पाच महिन्यापासून शहापूर तालुक्यातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत एकूण २९ टँकरने गावांसह पाड्यात पाणीपुरवठा केला जात आहे. चांगल्या पावसाचे आगमन झाल्यास पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार होणार आहे. तर पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागतील, असे गुंडे गावातील शेतकरी दयानंद पाटोळे यांनी सांगितले.

ठाणे - धरणाचा तालुका म्हणून शहापूर तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या डोळखांब परिसरात आज दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे शहापूरकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

शहापूर तालुक्यात भात पिकासह भाजीपाल्याचे पीक घेऊन शेतकरी कुटुंब उदरनिर्वाह करतात. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. सुमारे तासभर पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी मान्सूनच्या पावसाबाबत आशावाद व्यक्त करत आहेत.

शहापूर तालुक्यात पडलेला पाऊस

गेल्या पाच महिन्यापासून शहापूर तालुक्यातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत एकूण २९ टँकरने गावांसह पाड्यात पाणीपुरवठा केला जात आहे. चांगल्या पावसाचे आगमन झाल्यास पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार होणार आहे. तर पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागतील, असे गुंडे गावातील शेतकरी दयानंद पाटोळे यांनी सांगितले.

Intro:किट नंबर 319
कल्याण


Body:शहापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन

ठाणे :- धरणाचा तालुका म्हणून ओळख असलेल्या शहापूर तालुक्यातील दुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या डोळखांब परिसरात आज दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले, या आगमनामुळे शहापूरकरांना गरमीच्या उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे,

तालुक्यात भात पिकांसह भाजीपाल्याचे पीक घेऊन शेतकरी कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात, मात्र गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस या परिसरात झाला नसल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला होता, यंदा मात्र जिल्ह्यात सर्वात आधी या भागात सुमारे तासभर पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे,
तर दुसरीकडे गेल्या पाच महिन्यापासुन पाणीटंचाईने तालुक्यात हाहाकार उडाला आहे, सध्याच्या घडीला 29 टँकरने 200 गाव पाड्याना पाणीपुरवठा केला जातो, आता मात्र पावसाचे आगमन झाल्याने थोडीफार पाणी टंचाई दूर होण्यास मदत होणार असल्याचे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले आहे, तर शहापूर तालुक्यात पावसाच्या आगमनाने शेतकरी पेरणीच्या लगबगीला लागतील असे मत गुंडे गावातील शेतकरी दयानंद पाटोळे यांनी व्यक्त केले,

व्हिडीओ
ftp foldar -- tha, shahapur 9.6.19


Conclusion:पावसाचं आगमन
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.