ETV Bharat / city

गोवा विधानसभेचे दोन दिवशीय अधिवेशन आजपासून सुरू.. सावंत सरकारचे शेवटचे अधिवेशन वादळी ठरणार

गोवा विधानसभेच्या दोन दिवशीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. सोमवार आणि मंगळवारी असणाऱ्या या दोन दिवसांत महादाई नदी, भूमिपुत्र बिल, राज्यात वाढणारी गुन्हेगारी हे महत्वाचे विषय असणार आहेत. डॉ. प्रमोद सावंत सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असल्यामुळे विरोधकही सत्ताधाऱ्यांची विविध प्रश्नावर कोंडी करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

author img

By

Published : Oct 18, 2021, 4:06 PM IST

Updated : Oct 18, 2021, 4:20 PM IST

Goa Legislative Assembly special session
Goa Legislative Assembly special session

पणजी - गोवा विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झालीआहे. दोन दिवस चालणारे हे सरकारचे शेवटचे अधिवेशन आहे. अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन फार महत्वाचे मानले जात आहे. आगामी चार महिन्यात करावयाच्या महत्वाचा कामांना या अधिवेशनात मंजुरी मिळविण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजप सरकारचा असणार आहे.

अधिवेशन वादळी होण्याची चिन्हे -

मागच्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यासोबतच भूमिपुत्र बिल, बेरोजगारी, महादेई नदीचा प्रश्न, रस्त्यावरील खड्डे, दहा हजार नोकऱ्या या मुद्यावरून विरोधक सरकारला धारेवर धरणार आहेत.

गोवा विधानसभेचे अधिवेशन
विरोधकांची तोंडे तीन दिशेला -


राज्यातील काँग्रेस, महाराष्ट्र गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड हे विरोधी पक्षच मागच्या काही दिवसांपासून एकसंग नसल्याचे चित्र दिसून येत आहे. काँग्रेसने युतीचा प्रस्ताव नाकारल्याने विरोधातच एकी नाही. त्याचा फायदा सत्ताधारी भाजपला नक्कीच होणार आहे.

हे ही वाचा - देवेंद्र फडणवीसांसारख्या समजदार नेत्याने 'याचा' विचार करावा - छगन भुजबळ



आम्ही विरोधकांचा सामना करायला तयार - उपमुख्यमंत्री

आम्ही मागच्या साडेचार वर्षात २४ हजार कोटींची कामे केली आहेत. विरोधकांना सभागृहात तोंड देण्यासाठी आणि हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी आम्ही तयार असल्याचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी सांगितले.

पणजी - गोवा विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झालीआहे. दोन दिवस चालणारे हे सरकारचे शेवटचे अधिवेशन आहे. अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन फार महत्वाचे मानले जात आहे. आगामी चार महिन्यात करावयाच्या महत्वाचा कामांना या अधिवेशनात मंजुरी मिळविण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजप सरकारचा असणार आहे.

अधिवेशन वादळी होण्याची चिन्हे -

मागच्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यासोबतच भूमिपुत्र बिल, बेरोजगारी, महादेई नदीचा प्रश्न, रस्त्यावरील खड्डे, दहा हजार नोकऱ्या या मुद्यावरून विरोधक सरकारला धारेवर धरणार आहेत.

गोवा विधानसभेचे अधिवेशन
विरोधकांची तोंडे तीन दिशेला -


राज्यातील काँग्रेस, महाराष्ट्र गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड हे विरोधी पक्षच मागच्या काही दिवसांपासून एकसंग नसल्याचे चित्र दिसून येत आहे. काँग्रेसने युतीचा प्रस्ताव नाकारल्याने विरोधातच एकी नाही. त्याचा फायदा सत्ताधारी भाजपला नक्कीच होणार आहे.

हे ही वाचा - देवेंद्र फडणवीसांसारख्या समजदार नेत्याने 'याचा' विचार करावा - छगन भुजबळ



आम्ही विरोधकांचा सामना करायला तयार - उपमुख्यमंत्री

आम्ही मागच्या साडेचार वर्षात २४ हजार कोटींची कामे केली आहेत. विरोधकांना सभागृहात तोंड देण्यासाठी आणि हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी आम्ही तयार असल्याचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी सांगितले.

Last Updated : Oct 18, 2021, 4:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.