ETV Bharat / city

Goa Assembly Election : गोव्यात पहिल्यांदाच जातीय समीकरणाच्या आधारे लढवली जातेय निवडणूक!

author img

By

Published : Jan 26, 2022, 7:44 AM IST

गोव्यात कधीही यापूर्वी जातीय गणितांवर निवडणूक लढवली गेली नाही. पहिल्यांदाच ही निवडणूक जातीय गणितांवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आम आदमी पक्षाने याला तोंड फोडल्यानंतर भारतीय जनता पक्षानेही त्यांची री ओढली आहे. गोव्यातील भंडारी समाज सर्वात अधिक आहे. त्यामुळे भाजपानेही आता भंडारी समाजाच्या लोकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

पणजी - गोवा विधानसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. सर्वच पक्षांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू केली असताना आता गोव्याची निवडणूक जातीय गणितांवर होणार का? याची चर्चा रंगू लागली आहे. भारतातल्या निवडणुका या जातीय समीकरणाच्या आधारावर लढल्या जातात, असे म्हटले जाते. उत्तर प्रदेश आणि बिहार सारख्या राज्यांमध्ये ही बाब प्रकर्षाने जाणवते. मात्र गोव्यासारख्या छोट्या राज्यात जातीय समीकरण यांवर निवडणुका लढवल्या गेल्याचं फारसं बोललं जात नाही. मात्र यंदा आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी अमित पालेकर या भंडारी समाजाच्या उमेदवाराला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करून जातीय समीकरण जुळवायला सुरुवात केली आहे. या निमित्तानं नेमकी गोव्यातील जातीय समीकरण काय आहेत आणि ती खरंच जुळवली जाणार का हे जाणून घेऊया...

गोव्यात पहिल्यांदाच जातीय समीकरणाच्या आधारे लढवली जातेय निवडणुकीत!

गोव्यातील जातनिहाय मतदारांची संख्या

गोव्यामध्ये हिंदू मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. ६५ टक्के हिंदू मतदार आहेत. त्यापाठोपाठ ख्रिश्चन मतदारांची संख्या ३० टक्के आहे. मुस्लिम मतदारांची संख्या अत्यंत कमी म्हणजे २.८१ टक्के इतकी आहे. तर अन्य जातीतील लोकांची संख्या २.१९ टक्के इतकी आहे. मात्र हिंदू मतदारांमध्ये विविध १९ उपजातीचा समावेश आहे. ज्यामध्ये ओबीसी समाजाचा वाटा ३० ते ४० टक्के इतका आहे. गोव्यातील मतदारांची एकूण संख्या साडेअकरा लाख आहे. यापैकी ओबीसी समाजाची लक्षणीय मतदार आहेत. हिंदू समाजातील भंडारी हा सर्वात मोठा घटक गोव्यात मानला जातो. ओबीसी समाजाचे असलेले प्राबल्य पाहून आता राजकीय पक्षांनी आपली गणित मांडायला सुरुवात केली. ज्यामध्ये आपने सर्वात आधी उडी घेत भंडारी समाजाच्या अमित पालेकर या उमेदवाराला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित केले आहे.

भंडारी समाजाला मुख्यमंत्रीपदाची अत्यल्प संधी -

मतदारांच्या एकूण संख्येमध्ये भंडारी समाजाची मतदार संख्या सर्वाधिक असली तरी या समाजातील आमदाराला मुख्यमंत्रीपदी फार कमी संधी मिळाल्याचं बोललं जातं. रवी नाईक हे एकमेव भंडारी समाजाचे उमेदवार मुख्यमंत्री झाले होते. त्यालाही आता २८ वर्ष लोटल्याचे वरिष्ठ पत्रकार किशोर नाईक गावकर सांगतात. ओबीसी मध्ये जवळ-जवळ १९ घटक आहेत त्यापैकी भंडारी समाज हा सर्वात मोठा घटक आहे. मात्र, तरीही या समाजाला फारसे प्रतिनिधित्व मिळाले नाही, असे किशोर नाईक गावकर सांगतात. गोव्यामध्ये जातीचे राजकारण फारसे केले गेले नाही. यामुळेच या मुद्द्यांकडे कुणी फारसं गांभीर्यानं पाहिलं नाही असही नाईक सांगतात.

हे जातीचे नव्हे समाजाचे राजकारण - पालेकर

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित केल्यानंतर आपचे भंडारी समाजाचे उमेदवार अमित पालेकर यांनी सांगितले की, आम आदमी पार्टी ने समाजाला अपेक्षित असलेल्या विकास कामांसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र स्थानिक राजकारणात बहुजन समाजाला फारसे प्रतिनिधित्व मिळाले नाही. त्यांची संख्या मोठी असूनही मानाचं स्थान मिळालं नाही. त्यामुळे आम आदमी पार्टीने जरी भंडारी समाजाचा उमेदवार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित केला असला तरी, हे जातीचे राजकारण नाही तर एका समाजाला प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी असलेलं राजकारण आहे, असा दावा अमित पालेकर यांनी केला आहे.

पहिल्यांदाच होणार जातीय गणितांवर निवडणूक -

गोव्यात कधीही यापूर्वी जातीय गणितांवर निवडणूक लढवली गेली नाही. पहिल्यांदाच ही निवडणूक जातीय गणितांवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आम आदमी पक्षाने याला तोंड फोडल्यानंतर भारतीय जनता पक्षानेही त्यांची री ओढली आहे. गोव्यातील भंडारी समाज सर्वात अधिक आहे. त्यामुळे भाजपानेही आता भंडारी समाजाच्या लोकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सावळ यांनी व्यक्त केली आहे. गोव्यात ओबीसींच्या १८ जाती असून त्यात भंडारी समाजाचे लोक सर्वाधिक आहेत. त्यानंतर खारवा समाज आणि त्यानंतर अनुसूचित जाती जमातींची संख्या १२ टक्के इतकी असल्याचेही सावळ यांनी सांगितले.

कोणत्याही पक्षाने ओबीसींचा विचार केला नाही - नाईक

गोव्यात मोठ्या संख्येने ओबीसी समाजाचे प्राबल्य आहे. मात्र गोवा स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत एकाही राजकीय पक्षाने ओबीसी समाजाला प्राधान्य दिले नाही. सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसी समाजाचा केवळ वापर करून घेतला. अशा परिस्थितीत ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आपली भेट घेतली आणि ओबीसी समाजाला सन्मान देण्याचे आश्वासन दिले आहे अशी माहिती गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी दिली आहे. जो पक्ष आपल्या समाजाला सन्मान प्राप्त करून दिली त्याला पाठिंबा देण्याचा समाजाचा विचार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गोव्यात ओबीसी समाजात भंडारी जातीचे प्रमाण ६० टक्के असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पणजी - गोवा विधानसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. सर्वच पक्षांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू केली असताना आता गोव्याची निवडणूक जातीय गणितांवर होणार का? याची चर्चा रंगू लागली आहे. भारतातल्या निवडणुका या जातीय समीकरणाच्या आधारावर लढल्या जातात, असे म्हटले जाते. उत्तर प्रदेश आणि बिहार सारख्या राज्यांमध्ये ही बाब प्रकर्षाने जाणवते. मात्र गोव्यासारख्या छोट्या राज्यात जातीय समीकरण यांवर निवडणुका लढवल्या गेल्याचं फारसं बोललं जात नाही. मात्र यंदा आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी अमित पालेकर या भंडारी समाजाच्या उमेदवाराला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करून जातीय समीकरण जुळवायला सुरुवात केली आहे. या निमित्तानं नेमकी गोव्यातील जातीय समीकरण काय आहेत आणि ती खरंच जुळवली जाणार का हे जाणून घेऊया...

गोव्यात पहिल्यांदाच जातीय समीकरणाच्या आधारे लढवली जातेय निवडणुकीत!

गोव्यातील जातनिहाय मतदारांची संख्या

गोव्यामध्ये हिंदू मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. ६५ टक्के हिंदू मतदार आहेत. त्यापाठोपाठ ख्रिश्चन मतदारांची संख्या ३० टक्के आहे. मुस्लिम मतदारांची संख्या अत्यंत कमी म्हणजे २.८१ टक्के इतकी आहे. तर अन्य जातीतील लोकांची संख्या २.१९ टक्के इतकी आहे. मात्र हिंदू मतदारांमध्ये विविध १९ उपजातीचा समावेश आहे. ज्यामध्ये ओबीसी समाजाचा वाटा ३० ते ४० टक्के इतका आहे. गोव्यातील मतदारांची एकूण संख्या साडेअकरा लाख आहे. यापैकी ओबीसी समाजाची लक्षणीय मतदार आहेत. हिंदू समाजातील भंडारी हा सर्वात मोठा घटक गोव्यात मानला जातो. ओबीसी समाजाचे असलेले प्राबल्य पाहून आता राजकीय पक्षांनी आपली गणित मांडायला सुरुवात केली. ज्यामध्ये आपने सर्वात आधी उडी घेत भंडारी समाजाच्या अमित पालेकर या उमेदवाराला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित केले आहे.

भंडारी समाजाला मुख्यमंत्रीपदाची अत्यल्प संधी -

मतदारांच्या एकूण संख्येमध्ये भंडारी समाजाची मतदार संख्या सर्वाधिक असली तरी या समाजातील आमदाराला मुख्यमंत्रीपदी फार कमी संधी मिळाल्याचं बोललं जातं. रवी नाईक हे एकमेव भंडारी समाजाचे उमेदवार मुख्यमंत्री झाले होते. त्यालाही आता २८ वर्ष लोटल्याचे वरिष्ठ पत्रकार किशोर नाईक गावकर सांगतात. ओबीसी मध्ये जवळ-जवळ १९ घटक आहेत त्यापैकी भंडारी समाज हा सर्वात मोठा घटक आहे. मात्र, तरीही या समाजाला फारसे प्रतिनिधित्व मिळाले नाही, असे किशोर नाईक गावकर सांगतात. गोव्यामध्ये जातीचे राजकारण फारसे केले गेले नाही. यामुळेच या मुद्द्यांकडे कुणी फारसं गांभीर्यानं पाहिलं नाही असही नाईक सांगतात.

हे जातीचे नव्हे समाजाचे राजकारण - पालेकर

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित केल्यानंतर आपचे भंडारी समाजाचे उमेदवार अमित पालेकर यांनी सांगितले की, आम आदमी पार्टी ने समाजाला अपेक्षित असलेल्या विकास कामांसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र स्थानिक राजकारणात बहुजन समाजाला फारसे प्रतिनिधित्व मिळाले नाही. त्यांची संख्या मोठी असूनही मानाचं स्थान मिळालं नाही. त्यामुळे आम आदमी पार्टीने जरी भंडारी समाजाचा उमेदवार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित केला असला तरी, हे जातीचे राजकारण नाही तर एका समाजाला प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी असलेलं राजकारण आहे, असा दावा अमित पालेकर यांनी केला आहे.

पहिल्यांदाच होणार जातीय गणितांवर निवडणूक -

गोव्यात कधीही यापूर्वी जातीय गणितांवर निवडणूक लढवली गेली नाही. पहिल्यांदाच ही निवडणूक जातीय गणितांवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आम आदमी पक्षाने याला तोंड फोडल्यानंतर भारतीय जनता पक्षानेही त्यांची री ओढली आहे. गोव्यातील भंडारी समाज सर्वात अधिक आहे. त्यामुळे भाजपानेही आता भंडारी समाजाच्या लोकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सावळ यांनी व्यक्त केली आहे. गोव्यात ओबीसींच्या १८ जाती असून त्यात भंडारी समाजाचे लोक सर्वाधिक आहेत. त्यानंतर खारवा समाज आणि त्यानंतर अनुसूचित जाती जमातींची संख्या १२ टक्के इतकी असल्याचेही सावळ यांनी सांगितले.

कोणत्याही पक्षाने ओबीसींचा विचार केला नाही - नाईक

गोव्यात मोठ्या संख्येने ओबीसी समाजाचे प्राबल्य आहे. मात्र गोवा स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत एकाही राजकीय पक्षाने ओबीसी समाजाला प्राधान्य दिले नाही. सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसी समाजाचा केवळ वापर करून घेतला. अशा परिस्थितीत ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आपली भेट घेतली आणि ओबीसी समाजाला सन्मान देण्याचे आश्वासन दिले आहे अशी माहिती गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी दिली आहे. जो पक्ष आपल्या समाजाला सन्मान प्राप्त करून दिली त्याला पाठिंबा देण्याचा समाजाचा विचार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गोव्यात ओबीसी समाजात भंडारी जातीचे प्रमाण ६० टक्के असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.