ETV Bharat / city

नांदगाव येथे कांदा चाळीला लागलेल्या आगीत ३ हजार क्विंटल कांदा जळून खाक

आगीचे कारण अस्पष्ट असले तरी ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या कांदाचाळी शेजारीच काही घरे आहेत. वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

author img

By

Published : May 10, 2019, 7:24 PM IST

आगीत झालेले कांद्याचे नुकसान

नाशिक - नांदगाव येथील कांदा चाळीला लागलेल्या आगीत ३ हजरा क्विंटल कांदा जळून खाक झाला. आज (शुक्रवारी) दुपारी ही घटना घडली. यामध्ये व्यापाऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अस्पष्ट असले तरी ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

नांदगाव-मालेगाव महामार्गावर साहेबराव खैरनार यांच्या ३ कांद्याच्या चाळी आहेत. त्यांनी २ दिवसांपूर्वी शेतकऱ्यांकडून ३ हजार क्विंटल कांदा खरेदी करून चाळीत साठवून ठेवला होता. आज दुपारी त्यातील एका चाळीला आग लागली. ही आग इतर दोन्ही चाळीपर्यंत पसरली.

घटनेची माहिती मिळताच नांदगाव आणि मनमाडचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र तोपर्यंत तिन्ही कांदाचाळी जळून खाक झाल्या होत्या. यामध्ये व्यापाऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या कांदाचाळी शेजारीच काही घरे आहेत. वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

नाशिक - नांदगाव येथील कांदा चाळीला लागलेल्या आगीत ३ हजरा क्विंटल कांदा जळून खाक झाला. आज (शुक्रवारी) दुपारी ही घटना घडली. यामध्ये व्यापाऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अस्पष्ट असले तरी ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

नांदगाव-मालेगाव महामार्गावर साहेबराव खैरनार यांच्या ३ कांद्याच्या चाळी आहेत. त्यांनी २ दिवसांपूर्वी शेतकऱ्यांकडून ३ हजार क्विंटल कांदा खरेदी करून चाळीत साठवून ठेवला होता. आज दुपारी त्यातील एका चाळीला आग लागली. ही आग इतर दोन्ही चाळीपर्यंत पसरली.

घटनेची माहिती मिळताच नांदगाव आणि मनमाडचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र तोपर्यंत तिन्ही कांदाचाळी जळून खाक झाल्या होत्या. यामध्ये व्यापाऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या कांदाचाळी शेजारीच काही घरे आहेत. वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

Intro:नाशिक मधील नांदगाव येथे व्यापाऱ्यांच्या कांद्या चाळीला आग लागून 3000 किट्टल कांदा जळून खाक झाल्याची घटना आज दुपारी नांदगाव येथे घडलीय


Body:नांदगाव मालेगाव महामार्गावर साहेबराव खैरनार या व्यापाऱ्यांच्या तीन कांद्याचाळी असून त्यांनी दोन दिवसापूर्वी शेतकऱ्यांकडून तीन हजार क्विंटल कांदा खरेदी करून चाळीत साठवून ठेवला होता आज दुपारी एका चाळीला आग लागली आणि पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले


Conclusion:घटनेची माहिती मिळाल्यानंतर नांदगाव व मनमाडचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले मात्र तोपर्यंत तिन्ही कांदाचाळी जळून खाक होऊन व्यापाऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे कांदा शेजारी काही घरे होती अग्निशमन दलाने वेळीच आग आटोक्यातआणल्यामुळे पुढील अनर्थ टळला
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.