ETV Bharat / city

नाशिकचे तापमान ४० अंशावर, नागरिकांची शितपेयाकडे धाव..

नाशिकमध्ये मागील काही वर्षापासून प्रचंड उकाडा वाढला आहे. यावर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस तापमानाने चाळीशी गाठली आहे.

author img

By

Published : Apr 4, 2019, 11:40 AM IST

Updated : Apr 4, 2019, 12:29 PM IST

थंडपेयाच्या दुकानावर नागरिकांची गर्दी

नाशिक - एकेकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये मागील काही वर्षापासून प्रचंड उकाडा वाढला आहे. यावर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस तापमानाने चाळीशी गाठली आहे. मागील आठ दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याने नाशिककरांना उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

थंडपेयाच्या दुकानावर नागरिकांची गर्दी


सकाळी १८ अंशावर असलेले तापमान सकाळी ११ वाजता ३५ अंशावर जाऊन पोहोचत आहे. तर १२ पर्यंत पारा ४० अंशावर जात आहे. या तळपत्या उन्हात नागरिक रस्त्यावरुन जाताना उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी, उपरणे वापरत आहेत. तर महिलादेखील स्कार्फ आणि सनकोटचा वापर करताना दिसून येत आहे.


शहरातील रस्त्यावर दुपारच्या सुमारास वर्दळ कमी झाली असून उन्हापासून बचावासाठी नागरिक सावलीचा आश्रय घेत आहेत. उन्हामुळे शरीरातील पाणी कमी होत असल्याने रस्त्यावरील थंडपेय दुकानांमध्ये गर्दी होत आहे. यामुळे लिंबूपाणी, ताक, शहाळे यांची मागणी वाढल्याने लिंबू आणि शहाळे यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. ३० रुपये दराने विकले जाणारे शहाळे ४० रुपयांवर गेले आहेत. तर लिंबांच्या किंमतीतदेखील वाढ झाली आहे. आगामी काळात उन्हाची तीव्रता वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

नाशिक - एकेकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये मागील काही वर्षापासून प्रचंड उकाडा वाढला आहे. यावर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस तापमानाने चाळीशी गाठली आहे. मागील आठ दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याने नाशिककरांना उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

थंडपेयाच्या दुकानावर नागरिकांची गर्दी


सकाळी १८ अंशावर असलेले तापमान सकाळी ११ वाजता ३५ अंशावर जाऊन पोहोचत आहे. तर १२ पर्यंत पारा ४० अंशावर जात आहे. या तळपत्या उन्हात नागरिक रस्त्यावरुन जाताना उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी, उपरणे वापरत आहेत. तर महिलादेखील स्कार्फ आणि सनकोटचा वापर करताना दिसून येत आहे.


शहरातील रस्त्यावर दुपारच्या सुमारास वर्दळ कमी झाली असून उन्हापासून बचावासाठी नागरिक सावलीचा आश्रय घेत आहेत. उन्हामुळे शरीरातील पाणी कमी होत असल्याने रस्त्यावरील थंडपेय दुकानांमध्ये गर्दी होत आहे. यामुळे लिंबूपाणी, ताक, शहाळे यांची मागणी वाढल्याने लिंबू आणि शहाळे यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. ३० रुपये दराने विकले जाणारे शहाळे ४० रुपयांवर गेले आहेत. तर लिंबांच्या किंमतीतदेखील वाढ झाली आहे. आगामी काळात उन्हाची तीव्रता वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Intro:नाशिकचं तापमान 40 अंशावर,नागरिकांची शितपेया कडे गर्दी..


Body:एकेकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या नाशिक मध्ये मागील काही वर्षापासून उन्हाळ्यात पारा 40 अंशा पुढे जाऊ लागला आहे,ह्या ही वर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस तापमामाने चाळीशी गाठली आहे,मागील आठ दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याने नाशिककर दुपारी प्रवास करणं टाळत आहे...तसेच रस्त्याच्या बाजूला थाटण्यात आलेल्या थंडपेय दुकानां मध्ये गर्दी वाढल्याचं दिसून येत आहे...

सकाळी 18 अंशावर असलेलं तापमान सकाळी 11 वाजे 35 अंशावर जाऊन पोहचत असून 12 पर्यंत पारा 40 अंशावर जात आहे..ह्या तळपत्या उन्हात नागरीक रस्त्यावरून जातांना स्वताचा बचाव करण्यासाठी टोपी,उपरणे वापरत असून महिला देखील स्कार्फ आणि सनकोट चा वापर करतांना दिसून येत आहे..
तसचे शहरातील रस्त्यावर दुपारच्या सुमारास वर्दळ कमी झाली असून उन्हापासून बचाव साठी नागरिक सावलीचा आश्रय घेत आहे,उन्हापासून शरीरातील पाणी कमी होत असल्याने रस्त्यावरील थंडपेय दुकानांमध्ये गर्दी होत आहे,ह्यांमुळे लिंबूपाणी ,ताक,शहाळे यांची मागणी वाढल्याने लिंबू आणि शहाळे यांच्या किंमतीत वाढ झाली आहे,तीस रुपये दराने विकले जाणारे शहाळे 40 रुपयांवर गेले आहेत,तर लिंबूच्या किंमतीत देखील वाढ झाली आहे,आगामी काळात उन्हाची तीव्रता वाढेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे..

-नाशिककर 2 बाईट आहेत..


Conclusion:
Last Updated : Apr 4, 2019, 12:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.